शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली कौशल्ये

By admin | Updated: February 4, 2017 04:35 IST

काही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेकाही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या आणि वेताच्या सुबक वस्तू बनविणाऱ्या बुरुडांच्या घरांचा उल्लेख आला. कथा वाचतानाच ‘वहाणा’ कथेत चपलांचा कारखाना निघाल्याने ज्याची स्वप्ने हरवतात अशा दादाजी चांभाराची व्यथा जाणवली. श्रीधर शनवारे यांच्या ‘बहुरूपी’ कवितेतील अनेक नकला वठवणाऱ्या लोककलावंतांची आठवण झाली. लोकसंस्कृतीमधील अनेक धूसर आठवणी जाग्या झाल्या. कालौघात हरवत जाणारे त्यांचे कौशल्य आठवले.याच काळात नात्यातील ज्या घरी वंशपरंपरेने गोंधळाची रीत आवर्जून पार पाडली जाते, त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. नवरात्रात अंबा, दुर्गा यांच्या अवतारकथा ते कुशलतेने सादर करत होते. संबळ, तुणतुणे यांच्या तालावर लयबद्ध नृत्य करीत सप्तशृंगीदेवीची आराधना सुरू होती. अंगात लांब झगा, गळ्यात मण्यांच्या माळा, पगडीसारखी भरजरी टोपी घालून मध्यम वयाचे ते गोंधळी तल्लीन होऊन गात होते. वंशपरंपरेने चालत आलेला हा वारसा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होतो असे समजले. ज्याची छबी तुकारामांवरच्या मालिकेतून पाहिली तो ‘दान पावलं’ म्हणून गात लोकांना सूर्योदयाची वर्दी देणारा वासुदेव काही वर्षांपूर्वी नाशिकला अवचित बघायला मिळाला. आज काळाच्या ओघात मागे पडलेल्या कला आणि व्यवसाय मनात तरळायला लागले. खूप वर्षांपूर्वी दिवाळीच्या तयारीला लागलेल्या गृहिणी अन्न कळकेल, खराब होईल या भीतीने कल्हई उडालेल्या पितळेच्या जड पातेल्या, ताटं, झाकण्या वेगळ्या काढून ठेवत. कल्हईवाला अगदी बिनतारी संदेश पाठवल्यासारखा त्या सुमारास येई. कोल्हाटी आणि माकडवालेही याच सुमारास येत. मुलांच्या घोळक्याच्या साक्षीने, मुलांची दिलखुलास दाद घेत त्यांचे भांड्यांना कल्हई करण्याचे काम चालायचे. तन् ... तन्... असा तारेचा मंजूळ आवाज आला की पिंजारी दादांच्या मागे मागे मुलांचा घोळका असे. आमच्या आजोळी कापसाच्या खोलीत त्यांचे कापूस पिंजण्याचे काम चालायचे. त्याचे कसब पाहण्यासारखे असायचे.झबल्यासारख्या कुडत्यावर रंगीबेरंगी कापडाचे तुकडे आणि आरसे यांचे सुरेख भरतकाम करणाऱ्या स्त्रिया फण्या, माळा विकताना क्वचित दिसत. इरावतीबाई कर्वेंनी त्यांचा लमाणी आणि वंजारी म्हणून उल्लेख ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात केला आहे. कधी टोपलीभर बांगड्या घेऊन कासार यायचा. या साऱ्यांच्या आठवणी धूसर झाल्या कारण या परंपरा शहरात तरी खंडित झाल्या. परंपरेतून संस्कृतीचा लवचिक प्रवाह वाहत असतो. ‘पोटापुरते देई। मागणे लई नाही’ असे जगणारे आणि घरपोच सेवा आणि मनोरंजन देणारे ते परस्परावलंबी सहजीवन आज आपल्या विविधांगी संस्कृतीतून हरवले आहे.