शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

हरवलेली कौशल्ये

By admin | Updated: February 4, 2017 04:35 IST

काही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेकाही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या आणि वेताच्या सुबक वस्तू बनविणाऱ्या बुरुडांच्या घरांचा उल्लेख आला. कथा वाचतानाच ‘वहाणा’ कथेत चपलांचा कारखाना निघाल्याने ज्याची स्वप्ने हरवतात अशा दादाजी चांभाराची व्यथा जाणवली. श्रीधर शनवारे यांच्या ‘बहुरूपी’ कवितेतील अनेक नकला वठवणाऱ्या लोककलावंतांची आठवण झाली. लोकसंस्कृतीमधील अनेक धूसर आठवणी जाग्या झाल्या. कालौघात हरवत जाणारे त्यांचे कौशल्य आठवले.याच काळात नात्यातील ज्या घरी वंशपरंपरेने गोंधळाची रीत आवर्जून पार पाडली जाते, त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. नवरात्रात अंबा, दुर्गा यांच्या अवतारकथा ते कुशलतेने सादर करत होते. संबळ, तुणतुणे यांच्या तालावर लयबद्ध नृत्य करीत सप्तशृंगीदेवीची आराधना सुरू होती. अंगात लांब झगा, गळ्यात मण्यांच्या माळा, पगडीसारखी भरजरी टोपी घालून मध्यम वयाचे ते गोंधळी तल्लीन होऊन गात होते. वंशपरंपरेने चालत आलेला हा वारसा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होतो असे समजले. ज्याची छबी तुकारामांवरच्या मालिकेतून पाहिली तो ‘दान पावलं’ म्हणून गात लोकांना सूर्योदयाची वर्दी देणारा वासुदेव काही वर्षांपूर्वी नाशिकला अवचित बघायला मिळाला. आज काळाच्या ओघात मागे पडलेल्या कला आणि व्यवसाय मनात तरळायला लागले. खूप वर्षांपूर्वी दिवाळीच्या तयारीला लागलेल्या गृहिणी अन्न कळकेल, खराब होईल या भीतीने कल्हई उडालेल्या पितळेच्या जड पातेल्या, ताटं, झाकण्या वेगळ्या काढून ठेवत. कल्हईवाला अगदी बिनतारी संदेश पाठवल्यासारखा त्या सुमारास येई. कोल्हाटी आणि माकडवालेही याच सुमारास येत. मुलांच्या घोळक्याच्या साक्षीने, मुलांची दिलखुलास दाद घेत त्यांचे भांड्यांना कल्हई करण्याचे काम चालायचे. तन् ... तन्... असा तारेचा मंजूळ आवाज आला की पिंजारी दादांच्या मागे मागे मुलांचा घोळका असे. आमच्या आजोळी कापसाच्या खोलीत त्यांचे कापूस पिंजण्याचे काम चालायचे. त्याचे कसब पाहण्यासारखे असायचे.झबल्यासारख्या कुडत्यावर रंगीबेरंगी कापडाचे तुकडे आणि आरसे यांचे सुरेख भरतकाम करणाऱ्या स्त्रिया फण्या, माळा विकताना क्वचित दिसत. इरावतीबाई कर्वेंनी त्यांचा लमाणी आणि वंजारी म्हणून उल्लेख ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात केला आहे. कधी टोपलीभर बांगड्या घेऊन कासार यायचा. या साऱ्यांच्या आठवणी धूसर झाल्या कारण या परंपरा शहरात तरी खंडित झाल्या. परंपरेतून संस्कृतीचा लवचिक प्रवाह वाहत असतो. ‘पोटापुरते देई। मागणे लई नाही’ असे जगणारे आणि घरपोच सेवा आणि मनोरंजन देणारे ते परस्परावलंबी सहजीवन आज आपल्या विविधांगी संस्कृतीतून हरवले आहे.