शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

ध्यास हिरवाईचा

By admin | Updated: May 6, 2015 05:28 IST

तरुणाईने मनात आणले तर काय होऊ शकते, हे ‘प्रयास’ कामातून स्पष्ट होते. या तरुणांनी हिरवे स्वप्न पाहिले आणि साकारही केले.

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रवि चौधरी नावाचा तरुण प्रजासत्ताक दिनाच्या एनसीसी संचलनासाठी दिल्लीला गेला होता. राष्ट्रपती भवनातील मेजवानीप्रसंगी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणातून प्रेरणा घेत त्याने काही तरी वेगळे करण्याचा ध्यास घेतला. वेगळे काय करावे यातून पर्यावरण रक्षणाची कल्पना पुढे आली. सुभाष चव्हाण हा मित्र साथीला होता. औरंगाबाद शहरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंग करीत असताना, त्यांनी तो परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे काम हाती घेतले आणि हळूहळू मित्रांचा हा कंपू पर्यावरणाची चळवळ बनत गेला, तसा गोगाबाबा विद्यापीठाचा डोंगर प्लास्टिकमुक्त होत गेला. वर्षभर यात गेले आणि पुढे कल्पना सुचली, झाडे लावण्याची. पहिल्या वर्षी २५ झाडे लावली; पण जगले एक. मात्र, यामुळे या तरुणांनी नाउमेद न होता १०० झाडे लावली आणि वर्षभर त्यांची निगा राखली. ९९ झाडे जगली तसा यांचा उत्साह वाढला. त्याच वेळी आपली ओळख असावी म्हणून ‘प्रयास युथ फाउण्डेशन’ असे नामकरण झाले.‘प्रयास’ने उद्दिष्ट ठेवले हा परिसर पाच वर्षांत हिरवा करण्याचे. याच पाच वर्षांत बाहेरून कोणतीही मदत न घेता ‘प्रयास’च्या युवकांनी या परिसरात थोडीथोडकी नव्हे, तर ७०० झाडे लावली, जगविली आणि वाढविली आहेत. युवक काय करू शकतो याचे हे उदाहरण. आज या चळवळीत ५० जण सक्रिय आहेत. दर रविवारी सकाळी ६ वाजता गोगाबाबा टेकडी परिसरात हे युवक एकत्र येतात आणि या झाडांना पाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम करतात. यासाठी त्यांना तीन ते साडेतीन हजार लिटर पाणी लागते आणि हे पाणी ते हातपंपाने उपसतात आणि बादली भरून झाडाला टाकतात. हे श्रमदान नियमित चालू असते.बकऱ्या, जनावरे खाणार नाहीत अशा झाडांची निवड करणे, देशी झाडेच लावणे हा आग्रह असल्याने करंज, काशीद या झाडांची निवड केली; पण वड, पिंपळ अशा झाडांचाही विचार केला. प्रत्येक झाडाला टॅग लावून त्याच्या वाढीचे निरीक्षण करणे, त्याला खतपाणी देत निगा राखणे, या सर्वांची नोंद ठेवण्याचे कामही चालू केले. त्याचे फलित म्हणजे या ओसाड माळरानावर ७०० झाडे जगली असून, येत्या दोन-पाच वर्षांत हा परिसर हिरवागार दिसेल; पण हा प्रवास सोपा नव्हता. या काळात जनावरांनी झाडांचे नुकसान केले, विघ्नसंतोषी मंडळींनी झाडे उपटून फेकली. या सर्व संकटांवर मात करीत हा परिसर हिरवा करण्याचा ध्यास ‘प्रयास’ने घेतला.‘प्रयास’ची काही मंडळी शिक्षण, नोकरीनिमित्ताने बाहेर गेली; पण मनाने आजही ती झाडांसह सदस्यांशी जोडलेली आहे. अनेकजण ‘आपल्या’ झाडांची चौकशी करतात. ‘प्रयास’मध्ये प्रवेश मिळविणे सोपे नाही. नवीन सदस्य आला तर किमान चार आठवडे त्याच्या सहभागावर निरीक्षण असते. श्रमदान करतो का? येण्याचा उद्देश काय? खरोखरच अशा कामाची आवड आहे का? याची खातरजमा केली जाते. श्रमदानामुळे हौशी मंडळी टिकाव धरीत नाहीत. कारण येथे प्रथम श्रमदान आणि नंतर चर्चा असा नियम आहे. या सर्व कामांसाठी निधी उभारण्याची अनोखी पद्धत आहे. रविवारी १० मिनिटे उशिरा येणाऱ्यांना १० रुपये दंड आकारला जातो. शिवाय वाढदिवस, विवाह अशाप्रसंगी ‘प्रयास’ला देणगी मिळते. यातूनच खर्च चालतो. आज ‘प्रयास’ तरुणांचा असला तरी शाळकरी मुलांपासून ते निवृत्त झालेल्या मंडळींपर्यंत यात सहभागी आहेत. तरी १८ ते २५ वयोगटातील ९० टक्के सदस्य दिसतात. रवि चौधरी, प्रीतेश गवस, सपना कुलकर्णी, ऋचिता वझूरकर, सुमित तीर्थ, ऋषिकेश लोळगे, संदीप इंगळे ही ‘प्रयास’ची कोअर टीम.याशिवाय हा गट वृक्षतोड रोखण्याचेही काम करतो. शहरात कोठे वृक्षतोड होत असेल तर यांना त्वरित माहिती मिळते. कारण यांनी आपले ‘नेटवर्क’ तयार केले आहे. लगेचच ही माहिती संबंधित खात्याला कळविली जाते. याशिवाय रक्तदान शिबिर आयोजित करणे, शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, पक्षिनिरीक्षण, फटाक्यांविना दिवाळी, पर्यावरणपूरक होळी असेही उपक्रम हाती घेणाऱ्या या तरुणाईने हिरव्या स्वप्नाचा ध्यास घेतला आहे.- सुधीर महाजन