शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ध्यास हिरवाईचा

By admin | Updated: May 6, 2015 05:28 IST

तरुणाईने मनात आणले तर काय होऊ शकते, हे ‘प्रयास’ कामातून स्पष्ट होते. या तरुणांनी हिरवे स्वप्न पाहिले आणि साकारही केले.

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रवि चौधरी नावाचा तरुण प्रजासत्ताक दिनाच्या एनसीसी संचलनासाठी दिल्लीला गेला होता. राष्ट्रपती भवनातील मेजवानीप्रसंगी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणातून प्रेरणा घेत त्याने काही तरी वेगळे करण्याचा ध्यास घेतला. वेगळे काय करावे यातून पर्यावरण रक्षणाची कल्पना पुढे आली. सुभाष चव्हाण हा मित्र साथीला होता. औरंगाबाद शहरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंग करीत असताना, त्यांनी तो परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे काम हाती घेतले आणि हळूहळू मित्रांचा हा कंपू पर्यावरणाची चळवळ बनत गेला, तसा गोगाबाबा विद्यापीठाचा डोंगर प्लास्टिकमुक्त होत गेला. वर्षभर यात गेले आणि पुढे कल्पना सुचली, झाडे लावण्याची. पहिल्या वर्षी २५ झाडे लावली; पण जगले एक. मात्र, यामुळे या तरुणांनी नाउमेद न होता १०० झाडे लावली आणि वर्षभर त्यांची निगा राखली. ९९ झाडे जगली तसा यांचा उत्साह वाढला. त्याच वेळी आपली ओळख असावी म्हणून ‘प्रयास युथ फाउण्डेशन’ असे नामकरण झाले.‘प्रयास’ने उद्दिष्ट ठेवले हा परिसर पाच वर्षांत हिरवा करण्याचे. याच पाच वर्षांत बाहेरून कोणतीही मदत न घेता ‘प्रयास’च्या युवकांनी या परिसरात थोडीथोडकी नव्हे, तर ७०० झाडे लावली, जगविली आणि वाढविली आहेत. युवक काय करू शकतो याचे हे उदाहरण. आज या चळवळीत ५० जण सक्रिय आहेत. दर रविवारी सकाळी ६ वाजता गोगाबाबा टेकडी परिसरात हे युवक एकत्र येतात आणि या झाडांना पाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम करतात. यासाठी त्यांना तीन ते साडेतीन हजार लिटर पाणी लागते आणि हे पाणी ते हातपंपाने उपसतात आणि बादली भरून झाडाला टाकतात. हे श्रमदान नियमित चालू असते.बकऱ्या, जनावरे खाणार नाहीत अशा झाडांची निवड करणे, देशी झाडेच लावणे हा आग्रह असल्याने करंज, काशीद या झाडांची निवड केली; पण वड, पिंपळ अशा झाडांचाही विचार केला. प्रत्येक झाडाला टॅग लावून त्याच्या वाढीचे निरीक्षण करणे, त्याला खतपाणी देत निगा राखणे, या सर्वांची नोंद ठेवण्याचे कामही चालू केले. त्याचे फलित म्हणजे या ओसाड माळरानावर ७०० झाडे जगली असून, येत्या दोन-पाच वर्षांत हा परिसर हिरवागार दिसेल; पण हा प्रवास सोपा नव्हता. या काळात जनावरांनी झाडांचे नुकसान केले, विघ्नसंतोषी मंडळींनी झाडे उपटून फेकली. या सर्व संकटांवर मात करीत हा परिसर हिरवा करण्याचा ध्यास ‘प्रयास’ने घेतला.‘प्रयास’ची काही मंडळी शिक्षण, नोकरीनिमित्ताने बाहेर गेली; पण मनाने आजही ती झाडांसह सदस्यांशी जोडलेली आहे. अनेकजण ‘आपल्या’ झाडांची चौकशी करतात. ‘प्रयास’मध्ये प्रवेश मिळविणे सोपे नाही. नवीन सदस्य आला तर किमान चार आठवडे त्याच्या सहभागावर निरीक्षण असते. श्रमदान करतो का? येण्याचा उद्देश काय? खरोखरच अशा कामाची आवड आहे का? याची खातरजमा केली जाते. श्रमदानामुळे हौशी मंडळी टिकाव धरीत नाहीत. कारण येथे प्रथम श्रमदान आणि नंतर चर्चा असा नियम आहे. या सर्व कामांसाठी निधी उभारण्याची अनोखी पद्धत आहे. रविवारी १० मिनिटे उशिरा येणाऱ्यांना १० रुपये दंड आकारला जातो. शिवाय वाढदिवस, विवाह अशाप्रसंगी ‘प्रयास’ला देणगी मिळते. यातूनच खर्च चालतो. आज ‘प्रयास’ तरुणांचा असला तरी शाळकरी मुलांपासून ते निवृत्त झालेल्या मंडळींपर्यंत यात सहभागी आहेत. तरी १८ ते २५ वयोगटातील ९० टक्के सदस्य दिसतात. रवि चौधरी, प्रीतेश गवस, सपना कुलकर्णी, ऋचिता वझूरकर, सुमित तीर्थ, ऋषिकेश लोळगे, संदीप इंगळे ही ‘प्रयास’ची कोअर टीम.याशिवाय हा गट वृक्षतोड रोखण्याचेही काम करतो. शहरात कोठे वृक्षतोड होत असेल तर यांना त्वरित माहिती मिळते. कारण यांनी आपले ‘नेटवर्क’ तयार केले आहे. लगेचच ही माहिती संबंधित खात्याला कळविली जाते. याशिवाय रक्तदान शिबिर आयोजित करणे, शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, पक्षिनिरीक्षण, फटाक्यांविना दिवाळी, पर्यावरणपूरक होळी असेही उपक्रम हाती घेणाऱ्या या तरुणाईने हिरव्या स्वप्नाचा ध्यास घेतला आहे.- सुधीर महाजन