शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

एलजीबीटीक्यू+ समुदायाचे डेटिंग ॲप, फसवणूक आणि पोलिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 07:32 IST

जिथे अन्यायाची दाद मागायला जावे तिथेच एलजीबीटीक्यू+ समुदायाविषयीच्या पुरेशा माहितीअभावी चेष्टा आणि टिंगल वाट्याला येणार असेल, तर कसे चालेल?

- राजू इनामदार

आपल्यातल्या ‘वेगळ्या लिंगभावाची’ची नैसर्गिक भावना हा गुन्हा/अपराध नसल्याचा भारतातील एलजीबीटीक्यू+ समुदायाचा लढा काही प्रमाणात यश मिळवता झाला आणि  समलिंगी असणे हा गुन्हा समजणारे घटनेतील ३७७ कलम रद्द केले गेले. ही पावले पडत असली आणि तिचे अत्यंत स्वागतार्ह पडसाद पॉप्युलर कल्चरमध्ये उमटत असले, तरी अजून कितीतरी वाटचाल बाकी आहे.

समाज  हळूहळू का होईना बदलत असताना पोलिस मात्र त्यांची वृत्ती बदलायला तयार नाहीत, हे पुण्यातल्या एका घटनेत नुकतेच निदर्शनाला आले.  या समुदायातील थोड्या वरच्या वर्तुळात वावरणाऱ्या व्यक्तींचे एक डेटिंग ॲप आहे. त्यावरून एलजीबीटीक्यू+ समुदायातील व्यक्तींशी संपर्क साधला जातो. त्यानंतर वेळ वगैरे घेऊन डेट ठरवली जाते. भेट होते, मात्र तिथे या व्यक्तींना वेगळाच अनुभव मिळतो. ‘मी पोलिस आहे, असे धंदे करतोस का, चल पोलिस स्टेशनला!’ ‘तुझ्यावर केस करावी लागेल’, ‘तुझ्या पालकांना सांगावे लागेल’.. अशा धमक्या दिल्या जातात व नंतर पैसे उकळले जातात. अशी फसवणूक झालेल्या काही जणांनी पोलिसांकडे तक्रार केली, पण त्यांना न्याय मिळणे दूरच; ‘समलिंगी असणे हा आता आपल्या देशात गुन्हा नाही’ हेच संबंधित पोलिसांना माहिती नव्हते. त्यांनी तक्रार करायला आलेल्यांची चेष्टा केली. अशी काही तक्रार असते हेच अमान्य केले आणि त्यांना शब्दश: पोलिस ठाण्यातून घालवून दिले.

एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या हितरक्षणासाठी अशोक रावकवी यांनी ३२ वर्षांपूर्वी स्थापन केलेली ‘द हमसफर’ ही संस्था पहिली. आता पुण्यात ‘युतक’, नागपुरात ‘सारथी’, मुंबईत ‘बिंदू क्वेअर’ अशा अनेक संस्था काम करतात. पोलिसांकडून होत असलेले दुर्वर्तन सध्या या सर्व संस्थांच्या केंद्रस्थानी आहे. पुण्यातील घटनेवरून ‘युतक’ या संस्थेचे कार्यकर्ते पोलिस अधीक्षकांना भेटायला गेले, त्यावेळी त्यांनी पोलिसांना याबाबत जागरूक करण्याची गरज आहे हे मान्य केले. मात्र, पुढे काहीच नाही. युतकच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की काहीच होत नाही हे लक्षात आल्यावर अशा फसवणुकीचे प्रकार वाढायला लागले आहेत. तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले की तिथे चेष्टा होते, लक्ष दिले जात नाही, एफआयआर नोंदवून घ्या म्हटले तर ‘नाही घेता येणार’ अशी उत्तरे मिळतात!

भारतीय समाज एकजिनसी नाही. एकाचवेळी आपला देश एकोणिसाव्या, विसाव्या, एकविसाव्या आणि बाविसाव्या शतकात जगत असतो, असे म्हणतात, ते खोटे नव्हे! अशा समाजात लिंगभेदाबद्दलच्याच जाणिवा अद्यापही फार भेदभावजनक असताना  आपले वेगळे अस्तित्व स्वीकारायला लावण्याचा एलजीबीटीक्यू+ समुदायाचा लढा किती अडचणीचा असेल, याची कल्पना सहज करता येऊ शकते. आपल्या लिंग जाणिवा ‘वेगळ्या’ आहेत याची स्पष्ट जाणीव होणे, नंतर स्वत:पुरते ते वास्तव स्वीकारणे, नंतर त्याबद्दल खुलेपणाने बोलणे आणि जोडीदाराची, सहजीवनाची, प्रेम आणि स्वीकाराची भूक शमवण्यासाठी प्रयत्न करणे हे सारेच निभावताना या समुदायातील व्यक्तींना किती मानसिक ऊर्जा खर्चावी लागते याचा थोडाफार अंदाज नवे सिनेमे आणि त्याहीपेक्षा वेब मालिकांमधून समाजाला येऊ लागला आहे.

आधी अविश्वास, मग तिरस्कार, मग विचार आणि स्वीकार या सगळ्या पायऱ्या चढताना दमछाक होणाऱ्या या समुदायाच्या वाटेत अन्याय्य कायद्यांचे काटेही आहेतच. अशा परिस्थितीत बदलत्या लोकभावनेला अधिक आकार देण्याची जबाबदारी सर्वच यंत्रणांनी कसोशीने पार पाडली पाहिजे. यात पोलिस अग्रभागी असले पाहिजेत कारण त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. जिथे अन्यायाची दाद मागायला जावे तिथेच केवळ पुरेशा माहितीअभावी चेष्टा आणि टिंगल वाट्याला येणार असेल, तर कसे चालेल? पोलिसांचे प्रबोधन करायलाही आता ‘युतक’सारख्या संस्थांनाच पुढाकार घ्यावा लागू नये म्हणजे मिळवले! युतक किंवा अशा अन्य संस्थांच्या कार्यक्रमात लोक येतात त्यांची संख्या अलीकडे वाढू लागलीय. प्रत्यक्षात समाजात असा मोकळेपणा येत असताना पोलिसांची मदत मिळाली नाही तर पुन्हा एकदा ही माणसं उपेक्षेच्या गर्तेत फेकली जातील. तसे होऊ नये म्हणून वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :LGBTएलजीबीटीfraudधोकेबाजी