शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक ऊर्जेचे जतन करू या!

By admin | Updated: July 10, 2016 03:47 IST

आपण क्रोधासारख्या विध्वंसक भावनेच्या आहारी जातो, तेव्हा नेमके चुकीचे व टोकाचे निर्णय घेतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण खूप चुकलो. त्या क्षणी स्वत:ला सावरता आले नाही

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर आपण क्रोधासारख्या विध्वंसक भावनेच्या आहारी जातो, तेव्हा नेमके चुकीचे व टोकाचे निर्णय घेतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण खूप चुकलो. त्या क्षणी स्वत:ला सावरता आले नाही, पण आपल्या हातातून खूप काही निसटून गेले, आपण खूप काही गमावून बसलो. म्हणूनच भावनांचे नियोजन करताना थोरा-मोठ्यांचा एक साधासरळ, शांतपणे विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला खूप मोलाचा ठरतो. अनेक अस्वस्थ करणाऱ्या आणि जीव गुदमरून टाकणाऱ्या अनुभवातून बाहेर येण्याचा उपाय आपण स्वत:च शोधला, तर कदाचित आपण स्वत:ला स्वस्थचित्त व शांतचित्त करू शकतो. जवळजवळ प्रत्येक जण माणूस म्हणून तसा अपूर्णच आहे. आजही आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्या अनेक भावनांचा निचरा व्हायचा आहे. अशा वेळी दु:खद अतृप्त भावनांना मनाच्या खोल कप्प्यात दबवून ठेवायचा प्रयोगच चुकीचा आहे. नकारात्मक भावना वेळोवेळी उफाळणारच, पण त्या दबवून टाकण्यापेक्षा त्यांना झेलत एक नवा धडा शिकता येतो का, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी या भावनांचे स्वरूप आपल्याला बदलता आले पाहिजे. कारण त्या भावनांना आपण त्या क्षणी दाबू, पण नंतर पुन्हा त्या उफाळातील त्या वेळी त्या जास्त पेटतील. वेगळे रूपही धारण करतील. कुणाचा राग कुणावर काढला जातो. रागाचे स्वरूप काही वेळा जीवघेणेसुद्धा होऊ शकते. सुरुवातीला त्या दाबता आल्या खऱ्या, पण नंतर त्या भावनांच्या लाटेला आपण काबूत ठेवू शकत नाही. ती लाट विनाश करूनच जाते. जेव्हा-जेव्हा चित्त थाऱ्यावर नसते, तेव्हा सारासार विचारही करता येत नाही. आपण एक साधी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या दिशेने आपले चित्त जाते, त्या दिशेनेच आपली ऊर्जाही जाते. चित्त जर सकारात्मक वाटेने गेले, तर ऊर्जाही सकारात्मक दिशेनेच जाणार. म्हणून प्रॉब्लेम कुठलाही असला, तरीही चित्त थाऱ्यावर ठेवणे गरजेचे आहे. हे सगळे खरे पाहता मनाला कळते, पण वळत नाही. माणूस म्हणून एक उत्तम कला देवाने आपल्याला दिली आहे. ती म्हणजे, एखाद्या गोष्टीतून बोध घ्यायची कला. आपल्या सभोवार अनेक घटना घडत असतात. बरे-वाईट प्रसंग घडत असतात. त्यातून आपण बोध घेतला, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या बऱ्या-वाईट प्रसंगांना आपण सामोरे जाऊ शकतो. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींतून आपण अनुभव घ्यायची प्रॅक्टिस, ही खरे तर नेट पॅ्रक्टिससारखीच असते. स्वत:च्या अनुभवातूनही शिकत नाही, तर दुसऱ्याच्या अनुभवातून कसे व काय शिकणार? तरीपण कठीण प्रसंगी आपल्या भावनिक उद्रेकाचा बळी न होता, त्यातून बाहेर येण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे हे निश्चित. बिकट प्रसंगातून सहज बाहेर पडणे कठीणच असते, पण स्वत:च्या मनाला ट्रेनिंग देऊन आपण चित्त थाऱ्यावर आणू शकतो. यासाठी प्रथम आपण आपली भावनिक ऊर्जा राखून ठेवायला शिकले पाहिजे. बिकट प्रसंगांनी हादरणारे व दुष्ट माणसामुळे परास्त झालेले लोक आपली अमूल्य ऊर्जा दुसऱ्यावर वाया घालवतात, पण त्या बिकट प्रसंगी स्वत:ला सावरले, तर आपली अमूल्य ऊर्जा आपल्यालाच उपयुक्त ठरते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपली भावनिक ऊर्जा आपण त्रासदायक वा विघ्नसंतोषी माणसांवर, दुर्दैवी घटनांवर वाया न घालवता, आपल्या भल्यासाठी वापरतो. एकूण काय, आपली ऊर्जा आपण जेव्हा विधायक परिणामासाठी वापरतो, तेव्हा जगातील वाईट प्रसंगांना आपण सक्षमपणे सामोरे जातो. फक्त गरज आहे, ती आपली मानसिक ऊर्जा जाणीवपूर्वक जतन करण्याची.