शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

थेट नरेंद्र मोदींना आव्हान देणा-या मेधा पाटकरांबद्दल जाणून घ्या...

By admin | Updated: March 8, 2017 12:14 IST

शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते नर्मदा आंदोलन.

 ऑनलाइन लोकमत

शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते नर्मदा आंदोलन. सरदार सरोवर आणि नर्मदा आंदोलनातील त्यांचं योगदान अनन्यसाधारण. पण हा आलेख तिथेच थांबत नाही. ज्याच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा ज्याचा हक्कही नाकारला जातोय, ज्यांना कुणीच वाली नाही, अशांचा ‘आवाज’ आणि हा आवाज आणखी बुलंद करणारी प्रेरणा म्हणून मेधा पाटकरांकडे पाहिलं जातंय. फाटक्या, दरिद्री म्हणवल्या जाणाऱ्या याच कफल्लक लोकांना हाताशी धरून त्या अनेक लढे लढल्या. सत्तास्थानांना मुळापासून हादरे दिले. एका विचारवंतातून जागा झालेला त्यांच्यातला कार्यकर्ता अजूनही जागोजागी निखारे पेटवतो आहे, लोकाना ‘जागवतो’ आहे. 

सामाजिक लढ्याला आशयगर्भ परिमाण देण्याचे काम करताना हक्काच्या लढाईचे नवे मापदंड यांनी तयार केले. पर्यावरणवादी व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या ही त्यांची लौकिक ओळख म्हटले तर पुरेशी आणि म्हटले तर फारच अपुरी. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्माला आल्याने लहान वयातच लोक चळवळीशी संबंध आलेल्या मेधा पाटकर राष्ट्र सेवा दलाच्या कामात सहभागी झाल्या. वैद्यक व्यवसायात जाण्याची इच्छा बाजूला ठेवून समाजकार्यातच पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. १९८५ साली नर्मदेवर अनेक छोटी-मोठी धरणे बांधण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याने नर्मदेच्या खोऱ्यातील अनेक आदिवासी विस्थापित होणे अटळ होते. प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाशी हा प्रश्न निगडीत होता. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प अशी भूमिका घेत मेधा पाटकरांनी सामाजिक न्यायाची नवी लढाई सुरू केली. 
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प रद्द करा, असा आग्रह धरला. त्यातून ही चळवळ वेगाने फोफावली. नर्मदा बचाओ आंदोलनाची व्याप्ती अफाट वाढली. विस्थापितांच्या हक्कासाठी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी उपोषणाद्वारे अहिंसात्मक सत्याग्रह केला. नर्मदेच्या पाण्यात आत्मसमर्पण करण्याचे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मेधा पाटकरांच्या शब्दाला त्यानंतर नैतिक वजन लाभले. एकीकडे हा असा तळागाळातला लढा आणि दुसरीकडे कायदेशीर लढाई अशी दुधारी किमया त्या साधू शकल्या. त्यातून त्यांना बऱ्यापैकी यशही लाभले. त्यापेक्षाही, आधी पुनर्वसन मगच प्रकल्प हे त्यांचे सूत्र देशभरात रुजले. अव्याहत सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना देशातले आणि परदेशातले अनेक पुरस्कार मिळाले. अर्थात अत्यंत प्रतिष्ठेच्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांच्या लढ्यावर शिक्कामोर्तब झाले आणि मेधा पाटकर या नावाभोवती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वलयही निर्माण झाले.