शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

थेट नरेंद्र मोदींना आव्हान देणा-या मेधा पाटकरांबद्दल जाणून घ्या...

By admin | Updated: March 8, 2017 12:14 IST

शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते नर्मदा आंदोलन.

 ऑनलाइन लोकमत

शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते नर्मदा आंदोलन. सरदार सरोवर आणि नर्मदा आंदोलनातील त्यांचं योगदान अनन्यसाधारण. पण हा आलेख तिथेच थांबत नाही. ज्याच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा ज्याचा हक्कही नाकारला जातोय, ज्यांना कुणीच वाली नाही, अशांचा ‘आवाज’ आणि हा आवाज आणखी बुलंद करणारी प्रेरणा म्हणून मेधा पाटकरांकडे पाहिलं जातंय. फाटक्या, दरिद्री म्हणवल्या जाणाऱ्या याच कफल्लक लोकांना हाताशी धरून त्या अनेक लढे लढल्या. सत्तास्थानांना मुळापासून हादरे दिले. एका विचारवंतातून जागा झालेला त्यांच्यातला कार्यकर्ता अजूनही जागोजागी निखारे पेटवतो आहे, लोकाना ‘जागवतो’ आहे. 

सामाजिक लढ्याला आशयगर्भ परिमाण देण्याचे काम करताना हक्काच्या लढाईचे नवे मापदंड यांनी तयार केले. पर्यावरणवादी व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या ही त्यांची लौकिक ओळख म्हटले तर पुरेशी आणि म्हटले तर फारच अपुरी. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्माला आल्याने लहान वयातच लोक चळवळीशी संबंध आलेल्या मेधा पाटकर राष्ट्र सेवा दलाच्या कामात सहभागी झाल्या. वैद्यक व्यवसायात जाण्याची इच्छा बाजूला ठेवून समाजकार्यातच पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. १९८५ साली नर्मदेवर अनेक छोटी-मोठी धरणे बांधण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याने नर्मदेच्या खोऱ्यातील अनेक आदिवासी विस्थापित होणे अटळ होते. प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाशी हा प्रश्न निगडीत होता. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प अशी भूमिका घेत मेधा पाटकरांनी सामाजिक न्यायाची नवी लढाई सुरू केली. 
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प रद्द करा, असा आग्रह धरला. त्यातून ही चळवळ वेगाने फोफावली. नर्मदा बचाओ आंदोलनाची व्याप्ती अफाट वाढली. विस्थापितांच्या हक्कासाठी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी उपोषणाद्वारे अहिंसात्मक सत्याग्रह केला. नर्मदेच्या पाण्यात आत्मसमर्पण करण्याचे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मेधा पाटकरांच्या शब्दाला त्यानंतर नैतिक वजन लाभले. एकीकडे हा असा तळागाळातला लढा आणि दुसरीकडे कायदेशीर लढाई अशी दुधारी किमया त्या साधू शकल्या. त्यातून त्यांना बऱ्यापैकी यशही लाभले. त्यापेक्षाही, आधी पुनर्वसन मगच प्रकल्प हे त्यांचे सूत्र देशभरात रुजले. अव्याहत सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना देशातले आणि परदेशातले अनेक पुरस्कार मिळाले. अर्थात अत्यंत प्रतिष्ठेच्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांच्या लढ्यावर शिक्कामोर्तब झाले आणि मेधा पाटकर या नावाभोवती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वलयही निर्माण झाले.