शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेवटच्या लोकलचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:23 IST

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणा-या नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फे-या असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचा-यांच्या सोयीचा वाटेल.

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणाºया नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फेºया असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचाºयांच्या सोयीचा वाटेल. प्रवासी संघटनांनीही या निर्णयाची फारशी दखल घेतलेली नाही. प्रत्यक्षात मात्र ४० लाख प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय-बदल अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या नियोजनावर परिणाम करणारा आहे. वस्तुत: पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवांची वाहतूक रात्री पावणेतीन तास बंद राहत असे. हळूहळू कालावधी वाढवत नेत ती आता साडेतीन तास बंद राहते आहे. कधीही न झोपणाºया या महानगरात एकीकडे नाइटलाइफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटसह मनोरंजनाची साधने रात्रभर खुली करण्यासाठी राजकीय चुरस-कुरघोडी सुरू आहेत. असे असताना वाहतुकीचे प्रमुख, तुलनेने स्वस्त आणि बºयापैकी वक्तशीर असलेले साधन बंद राहण्याचा काळ वाढवत नेण्याचा निर्णय उफराटा म्हणायला हवा. मुंबईच्या चलनवलनाचेच नव्हे, तर या शहराच्या व्यवहारांचे, रोजगाराचे, कॉर्पोरेट व्यवस्थेचे घड्याळ बदलत-बदलत आता अहोरात्र झाले आहे. गर्दीच्या दृष्टीने ‘पीक अवर’ ही संकल्पनाही मोडीत निघाली आहे. त्यामुळे शेवटची लोकल, पहिली लोकल ही संकल्पनाच बाद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नव्हे, ती येथील कामगार, नोकरदार, अर्थव्यवस्थेची गरज आहे. शिवाय अवघ्या देशातून रात्रभर लांब पल्ल्याच्या गाड्या या शहरात येत असतात. मध्यरात्री उतरणाºया या प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेस्थानकांत थांबू दिले जात नाही. कुटुंबासह, सामानसुमानासह रस्त्यावर थांबणेही सुरक्षित नसते. त्यांचा विचार केला, तर मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रभर लोकलची वाहतूक सुरू असणे गरजेचे आहे. नव्हे, शहराच्या बदललेल्या घड्याळाची ती गरज आहे. मुंबईहून सुटणाºया व तिकडे जाणाºया पहिल्या आणि शेवटच्या लोकलमधील गर्दीवर नजर टाकली की त्याची खात्री पटते. पूर्वीप्रमाणे विशिष्ट वेळेनंतर लोकलमध्ये चढायला मिळेल, बसायला मिळेल, अशी स्थिती उरलेली नाही. त्यामुळचे शेवटच्या लोकलची वेळ अलीकडे आणण्याचा निर्णय बदलण्याची, तो पूर्ववत करण्याची, प्रसंगी आणखी पुढे नेण्याची गरज आहे. त्याच वेळी मुंबईसह एमएमआरडीएच्या क्षेत्रात रात्रभर लोकल, परिवहन सेवा कशासुरू राहतील त्याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ आलीआहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल