शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

शेवटच्या लोकलचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:23 IST

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणा-या नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फे-या असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचा-यांच्या सोयीचा वाटेल.

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणाºया नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फेºया असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचाºयांच्या सोयीचा वाटेल. प्रवासी संघटनांनीही या निर्णयाची फारशी दखल घेतलेली नाही. प्रत्यक्षात मात्र ४० लाख प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय-बदल अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या नियोजनावर परिणाम करणारा आहे. वस्तुत: पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवांची वाहतूक रात्री पावणेतीन तास बंद राहत असे. हळूहळू कालावधी वाढवत नेत ती आता साडेतीन तास बंद राहते आहे. कधीही न झोपणाºया या महानगरात एकीकडे नाइटलाइफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटसह मनोरंजनाची साधने रात्रभर खुली करण्यासाठी राजकीय चुरस-कुरघोडी सुरू आहेत. असे असताना वाहतुकीचे प्रमुख, तुलनेने स्वस्त आणि बºयापैकी वक्तशीर असलेले साधन बंद राहण्याचा काळ वाढवत नेण्याचा निर्णय उफराटा म्हणायला हवा. मुंबईच्या चलनवलनाचेच नव्हे, तर या शहराच्या व्यवहारांचे, रोजगाराचे, कॉर्पोरेट व्यवस्थेचे घड्याळ बदलत-बदलत आता अहोरात्र झाले आहे. गर्दीच्या दृष्टीने ‘पीक अवर’ ही संकल्पनाही मोडीत निघाली आहे. त्यामुळे शेवटची लोकल, पहिली लोकल ही संकल्पनाच बाद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नव्हे, ती येथील कामगार, नोकरदार, अर्थव्यवस्थेची गरज आहे. शिवाय अवघ्या देशातून रात्रभर लांब पल्ल्याच्या गाड्या या शहरात येत असतात. मध्यरात्री उतरणाºया या प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेस्थानकांत थांबू दिले जात नाही. कुटुंबासह, सामानसुमानासह रस्त्यावर थांबणेही सुरक्षित नसते. त्यांचा विचार केला, तर मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रभर लोकलची वाहतूक सुरू असणे गरजेचे आहे. नव्हे, शहराच्या बदललेल्या घड्याळाची ती गरज आहे. मुंबईहून सुटणाºया व तिकडे जाणाºया पहिल्या आणि शेवटच्या लोकलमधील गर्दीवर नजर टाकली की त्याची खात्री पटते. पूर्वीप्रमाणे विशिष्ट वेळेनंतर लोकलमध्ये चढायला मिळेल, बसायला मिळेल, अशी स्थिती उरलेली नाही. त्यामुळचे शेवटच्या लोकलची वेळ अलीकडे आणण्याचा निर्णय बदलण्याची, तो पूर्ववत करण्याची, प्रसंगी आणखी पुढे नेण्याची गरज आहे. त्याच वेळी मुंबईसह एमएमआरडीएच्या क्षेत्रात रात्रभर लोकल, परिवहन सेवा कशासुरू राहतील त्याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ आलीआहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल