शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

शेवटच्या लोकलचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:23 IST

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणा-या नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फे-या असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचा-यांच्या सोयीचा वाटेल.

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणाºया नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फेºया असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचाºयांच्या सोयीचा वाटेल. प्रवासी संघटनांनीही या निर्णयाची फारशी दखल घेतलेली नाही. प्रत्यक्षात मात्र ४० लाख प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय-बदल अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या नियोजनावर परिणाम करणारा आहे. वस्तुत: पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवांची वाहतूक रात्री पावणेतीन तास बंद राहत असे. हळूहळू कालावधी वाढवत नेत ती आता साडेतीन तास बंद राहते आहे. कधीही न झोपणाºया या महानगरात एकीकडे नाइटलाइफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटसह मनोरंजनाची साधने रात्रभर खुली करण्यासाठी राजकीय चुरस-कुरघोडी सुरू आहेत. असे असताना वाहतुकीचे प्रमुख, तुलनेने स्वस्त आणि बºयापैकी वक्तशीर असलेले साधन बंद राहण्याचा काळ वाढवत नेण्याचा निर्णय उफराटा म्हणायला हवा. मुंबईच्या चलनवलनाचेच नव्हे, तर या शहराच्या व्यवहारांचे, रोजगाराचे, कॉर्पोरेट व्यवस्थेचे घड्याळ बदलत-बदलत आता अहोरात्र झाले आहे. गर्दीच्या दृष्टीने ‘पीक अवर’ ही संकल्पनाही मोडीत निघाली आहे. त्यामुळे शेवटची लोकल, पहिली लोकल ही संकल्पनाच बाद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नव्हे, ती येथील कामगार, नोकरदार, अर्थव्यवस्थेची गरज आहे. शिवाय अवघ्या देशातून रात्रभर लांब पल्ल्याच्या गाड्या या शहरात येत असतात. मध्यरात्री उतरणाºया या प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेस्थानकांत थांबू दिले जात नाही. कुटुंबासह, सामानसुमानासह रस्त्यावर थांबणेही सुरक्षित नसते. त्यांचा विचार केला, तर मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रभर लोकलची वाहतूक सुरू असणे गरजेचे आहे. नव्हे, शहराच्या बदललेल्या घड्याळाची ती गरज आहे. मुंबईहून सुटणाºया व तिकडे जाणाºया पहिल्या आणि शेवटच्या लोकलमधील गर्दीवर नजर टाकली की त्याची खात्री पटते. पूर्वीप्रमाणे विशिष्ट वेळेनंतर लोकलमध्ये चढायला मिळेल, बसायला मिळेल, अशी स्थिती उरलेली नाही. त्यामुळचे शेवटच्या लोकलची वेळ अलीकडे आणण्याचा निर्णय बदलण्याची, तो पूर्ववत करण्याची, प्रसंगी आणखी पुढे नेण्याची गरज आहे. त्याच वेळी मुंबईसह एमएमआरडीएच्या क्षेत्रात रात्रभर लोकल, परिवहन सेवा कशासुरू राहतील त्याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ आलीआहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल