शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन उद्योगातून कोकणसमृद्धी

By admin | Updated: March 22, 2015 01:26 IST

प्रचंड नैसर्गिक समृद्धी असूनही कोकणचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. कोकणवासीयांची मानसिकता, शासनाची उदासीनता, दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव अशी अनेक कारणे यामागे आहेत.

प्रचंड नैसर्गिक समृद्धी असूनही कोकणचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. कोकणवासीयांची मानसिकता, शासनाची उदासीनता, दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव अशी अनेक कारणे यामागे आहेत. यावर चर्चा करण्यापेक्षा अ‍ॅक्शन प्लॅन बनवून आम्ही कोकणवासीयांनी यावर काम केले पाहिजे.पर्यटन, वनौषधी, फलोद्यान, फळप्रक्रिया, मत्स्योद्योग ही कोकण विकासाची पंचसूत्री आहे. याच्या केंद्रस्थानी पर्यटन उद्योग आहे. पर्यटन उद्योगाच्या विकासाबरोबरच अन्य विषयांचा झपाट्याने विकास होऊ शकतो. पुढील काळात देश महासत्ता होणार असेल तर कोकणातही याची सुरुवात करणे करणे गरजेचे आहे. थायलंड, मलेशिया, मॉरिशस यासारख्या कोकणाहून छोट्या देशात दरवर्षी १ ते १.५ कोटी परदेशी पर्यटक येतात. पुढील १0-१५ वर्षात नीट नियोजन केले, तर कोकणातही इतके परदेशी व त्यांच्या पाचपट भारतीय पर्यटक येऊ शकतील. हे आम्ही प्रत्यक्ष घडवले तर कोकणातल्या एकाही तरुणाला छोट्या नोकरीसाठी मुंबई - पुण्यात यावे लागणार नाही. गेली बारा वर्षे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सामाजिक चळवळ चालवत आहोत. कोकणात गावागावात प्रत्यक्ष काम करताना यासाठी काय केले पाहिजे याचे नियोजन आम्ही करीत आहोत. कोकणच्या विकासासाठी तीन स्तरांवर काम करणे गरजेचे आहे. यातील पहिला सर्वात महत्त्वाचा स्तर पायाभूत सुविधांचा विकास. महाराष्ट्रातील नव्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. पुढील पाच वर्षांत पर्यटनाच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल, असे वाटते. प्रत्येक जिल्ह्याचा पर्यटन विकासाचा आराखडा शासनाने बनवलेला आहे. यावर प्रत्यक्ष कार्यवाही अपेक्षित आहे. आज कोकणात बोर्डी, केढवा - माहिम, अर्नाळा, अलिबाग, मुरूड - जंजिरा, दिवेआगार, हरिहरेश्वर, हर्णे - मुरुड, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी, आंबोळगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशी अनेक पर्यटनस्थळे विशेष प्रयत्न न करता लोकसहभागातून विकसित झाली आहेत. या प्रत्येक पर्यटनस्थळावर दरवर्षी एक ते वीस लाख पर्यटक येतात. बीच टुरिझम, बॅकवॉटर टुरिझम, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्गपर्यटन, हिलस्टेशन्स, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम (साहसी पर्यटन), सांस्कृतिक पर्यटन असे अनेक पर्यटनाचे प्रकार ठरवून विकसित करता येतील. या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्ते, मुबलक पार्किंगची व्यवस्था, पाणीपुरवठा, लहान मुलांसाठी उद्याने, समुद्रकिनाऱ्यावर व महत्त्वाच्या ठिकाणी कोकणी खाद्यपदार्थ देणारी आधुनिक रेस्टॉरंटस, पर्यटकांसाठी मनोरंजनाच्या सोयी, कोकणातील समृद्ध संस्कृती, मरिन लाइफ, सह्याद्री जैवविविधता, आदिवासी संस्कृती, फिशरमन व्हिलेज, ऐतिहासिक वारसा, स्थापत्यशास्त्र, विविध कला या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण मुझियम्स इत्यादी अनेक सुविधा या पर्यटनस्थळांवर निर्माण केल्या पाहिजेत. याशिवाय पर्यावरणाची काळजी, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, शाश्वत पर्यटन विकास, विकासाच्या प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग अशा अनेक विषयांची काळजी नियोजनात घेणे आवश्यक आहे. या प्रत्येक स्थळाचा स्वतंत्र मास्टर प्लॅन करून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने हे राबवणे गरजेचे आहे. युरोपमध्ये व्हीनस किंवा फ्लोरेन्स यासारख्या प्रमुख पर्यटनस्थळांवर वर्षाला एक कोटीहून अधिक पर्यटक येऊन सुद्धा कोणतीही गैरसोय होत नाही. मात्र दोन - पाच लाख पर्यटक वर्षाला आल्यानंतर आमच्या पर्यटनस्थळांची दुरवस्था पाहावत नाही. कोकण पर्यटन विकासासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रशिक्षण. जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन कोकणात सुरू करायचे असेल तर कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना आतंरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण द्यावेच लागेल. जगात सुरू असलेल्या पर्यटनाचा दर्जा व कोकणातील पर्यटन यातील तफावत कमी करावी लागेल. यासाठी कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात एक सुसज्ज पर्यटन प्रशिक्षण संस्था गरजेची आहे. लोकांनी, कोकणवासीयांनी चांगली निवासव्यवस्था उभारावी म्हणून समुद्रकिनारी व अन्य ठिकाणी सहजपणे परवानग्या, कमी व्याजदराने कर्जपुरवठा व काही ठिकाणी सबसिडी देण्याची आवश्यकता आहे. कोकणवासीय कधीच मदतीची अपेक्षा ठेवत नाहीत. परंतु नवीन शासनाने १० वर्षांकरिता कोकणातील पर्यटन उद्योगाला करसवलती दिल्या पाहिजेत. सर्वप्रकारची गुंतवणूक येथील पर्यटन उद्योगात येणे गरजेचे आहे. त्यामुळे कोट्यवधी देशी - विदेशी पर्यटक कोकणात येतील. देशाला विदेशी चलन मिळेल. प्रचंड मोठी अर्थव्यवस्था निर्माण होईल. पुढील महत्त्वाचा मुद्दा प्रसिद्धी. आज परदेशात व देशात सुद्धा निसर्गसमृद्ध कोकणची माहिती नाही. ग्लोबल कोकणच्या माध्यमातून कोकण पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीची सुरुवात आम्ही केली आहे, परंतु हे पुरेसे नाही. या तीन स्तरावर नीट नियोजनपूर्वक काम झाले तर पुढील ५ - १0 वर्षांत आर्थिक समृद्ध कोकणाची निर्मिती होऊ शकेल. (लेखक हे कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत़)केरळची गेल्या वर्षाची पर्यटनाची आर्थिक उलाढाल २८ हजार कोटींची आहे. केरळला केवळ चार लाख विदेशी व जवळपास एक कोटी देशी पर्यटक जातात. यापेक्षा कितीतरी अधिक मोठी आर्थिक उलाढाल कोकणात पर्यटन उद्योगामुळे होऊ शकेल. त्यामुळे अनेक मुंबई - पुणेकर कोकणात जाऊन आपल्या गावात स्वत:चा उद्योग उभारू शकतील. जगभर पर्यटनाची मोठी प्रदर्शने होतात. जर्मनीतील आयटीबी बर्लिन व लंडनमधील डब्लूटीएम यासारख्या महत्त्वाच्या प्रदर्शनामध्ये कोकण सहभागी होणे गरजेचे आहे.संजय यादवराव