शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

जाण वास्तवाची

By admin | Updated: February 23, 2015 00:05 IST

आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन

डॉ. कुमुद गोसावी - आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन नि त्यासोबत शांत, संयमी, विवेकी मन! ही यशाची ‘गुरुकिल्ली’ हाती देणारं अध्यात्म जाणून घ्यायला हवं!रामायणातील एका प्रसंगी नल, नील, सुग्रीव, लक्ष्मण आदिंनी बिभीषणाला आसरा देऊ नये असं सांगितलं, तेव्हा प्रभू रामचंद्रानं त्या सर्वांसमक्ष हनुमंताला त्यासंबंधी विचारलं, बिभीषणाची भगवद्भक्ती।शुद्ध भावार्थी बिभीषण।बिभीषणाच्या अंत:करणात अंशमात्र कपट नाही. तो शांत, धर्ममूर्ती आहे, त्याचं प्रभू रामचंद्रांवर नितांत प्रेम आहे. शिवाय तो रघुनाथाला अनन्यभावानं शरण आला आहे. त्याची कन्या ‘त्रिअरा’ अशोकवनात सीतेचा सांभाळ करीत आहे. यानं माझा वध होऊ दिला नाही. हनुमंतानं बिभीषणाच्या पवित्र अंत:करणाची अशी वास्तव जाणीव करून दिली! महाबली हनुमंत केवळ वास्तवदर्शीच नव्हते, तर श्रेष्ठ संगीततज्ज्ञही होते! कुंभकोणमला वीणावादन करणाऱ्या हनुमंताची मूर्ती आहे. आम्ही आज संपत्ती वाढवली नि माणुसकी गमावली. एकदा प्रवासात समोर बसलेल्या मुलांनी पिझ्झा, बर्गर, केक आदि पदार्थांचा फडशा पाडला नि त्याचे रॅपर्स भिरकावून दिले! समोरच्या सीटवरील पाठीत वाकलेल्या आजी काठी टेकवत टेकवत आल्या नि कचरा गोळा करू लागल्या. एकीनं विचारलं, आजीबाई तुम्ही कशाला त्रास घेताय? रेल्वेत डस्टबिन असतात हे तुम्ही हसण्याच्या नादात विसरलात म्हणून ते गोळा करतेय. खिदळणारी मुले नरमली नि सॉरी आजीबाई, म्हणून मोकळी झाली!विश्वविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथातील वास्तवदर्शी दृष्टांताचं लेणं म्हणजेच नक्षत्रांचं देणंच म्हणायला हवं!का कमळावरी भ्रमर। पाय ठेविती हळुवार।कुचंबैल केसर। ह्या शंका।। ज्ञाने. १३.२४७।।खरा ज्ञानी माणूस आपल्याकडून कोणाचीही हिंसा होऊ नये, अगदी कमळातील केसरदेखील कुचंबू नये-दुखाऊ नये, इतकं मनाचं हळुवारपण त्यानं जपावं यातच त्याच्यातील अतिशय नाजूक, तरल संवेदनांची ओळख होते.अरे संसार संसार। जसा तवा चुल्यावर।आधी हाताला चटके। तेव्हा मिळते भाकर।।संत ज्ञानदेव माउलीच्या वास्तवदर्शी दृष्टांताप्रमाणे बहिणाबाई चौधरी यांच्या या संसारचित्रणातील हे लक्षवेधी वास्तवही असंच बोलकं आहे, नाही का?