शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कृतार्थ कामत!

By admin | Updated: October 9, 2015 04:04 IST

मौज आणि सत्यकथा ऐन भरात असण्याच्या काळात ज्या थोरांनी त्यासाठी घाम गाळला, त्यात ग.रा.कामत यांचे नाव अग्रणी होते. लेखक म्हणून त्यांची ओळख ठसणे

मौज आणि सत्यकथा ऐन भरात असण्याच्या काळात ज्या थोरांनी त्यासाठी घाम गाळला, त्यात ग.रा.कामत यांचे नाव अग्रणी होते. लेखक म्हणून त्यांची ओळख ठसणे अपरिहार्य असतानाच ते पटकथा लेखनाकडे वळले. त्यांच्या आयुष्यास मिळालेल्या या ‘टर्नींग पॉईन्ट’मुळे मराठी व हिंदीतल्या अनेक चित्रपटांचा पाया भक्कम ्नंरोवला गेला. कामत रुईया महाविद्यालयात शिकत असताना थोर संशोधक व अभ्यासक न.र.फाटक यांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांच्या साहित्यिक व संपादकीय गुणांना वेगळे वळण मिळाले. मराठी भाषेतील सुवर्णपदक मिळवण्याचा मानही त्याना प्राप्त झाला. त्यांचा पुढील प्रवास मात्र कलाटणी घेणारा ठरला. ‘ग.रा.’ या अद्याक्षरांनीच ते प्रसिद्ध होते. सिद्धहस्त लेखक ग.दि.माडगूळकर हे चित्रपटसृष्टीतील कामतांचे गुरु. त्याकाळी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी गदिमा लेखन करत होते. ग.रां.नी त्यांना लेखन सहाय्य केले. हा चित्रपट प्रचंड गाजला. ग.रां.च्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र लाखाची गोष्ट खऱ्या अर्थाने लाखमोलाची ठरली. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्याशी त्यांचे याच चित्रपटाच्या दरम्यान सूर जुळले. लाखाची गोष्ट नंतर ग.रां.नी ‘शापित’ची पटकथा लिहिली व या चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. त्याआधी ‘पेडगावचे शहाणे’ हा त्यांचा चित्रपटही हिट झाला होता. तरीही ते खरे रमले हिंदी चित्रपटसृष्टीत! ज्येष्ठ दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत पटकथालेखक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. ‘मेरा साया, मेरा गाव मेरा देश, काला पानी, दो रास्ते, पुकार, मनचली, मैं तुलसी तेरे आंगन की, बंबई का बाबू, कच्चे धागे, बसेरा’ या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटाच्या कथा-पटकथा ग.रां.च्या लेखणीतून उतरल्या. ९२ वर्षांचे कृतार्थ आयुष्य त्यांच्या वाट्याला आले आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारताना त्यांनी वयातील अंतर कधीच आड येऊ दिले नाही. गेल्या वर्षी झी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्वत: हा पुरस्कार स्वीकारायला जाऊ न शकल्याने रेखा कामत यांनी तो स्वीकारला. तथापि ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यानंतर ग.रां.च्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.