शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

झुलतो बाई, सत्तेचा झुला

By admin | Updated: April 1, 2015 01:18 IST

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोघांच्या युतीची घोषणा झाली; पण ती अजून कागदावर उतरायला तयार नाही

सुधीर महाजन -

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोघांच्या युतीची घोषणा झाली; पण ती अजून कागदावर उतरायला तयार नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाने शिवसेनेला जसे खेळविले, त्याचीच पुनरावृत्ती निवडणुकीच्या अगोदर औरंगाबादेत पाहायला मिळते. येथेही सेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. महानगरपालिकेत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व राहिले; त्यामुळे त्यांचे वर्चस्व जागावाटपात आजवर भाजपाने सहन केले; पण आता ते ऐकत नाहीत. येथे ९० जागा लढण्याचा युतीचा विचार असून, यापैकी ४५ जागा भाजपाला पाहिजेत; पण सेनेला ५८ जागा पाहिजेत. अशी जागावाटपाची कोंडी सुरू झाली आहे.औरंगाबादची निवडणूक आजवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली. यावेळी मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाच्या विधानसभेतील विजयानंतर नवाच मुद्दा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना मिळाला. आता २३ मुस्लिमबहुल वॉर्डवगळता इतरत्र हे नवे एमआयएम कार्ड दोन्ही पक्षांना वापरता येईल आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल, हा साधा हिशेब असला तरी भाजपा याचा वेगळा विचार करते. उद्या समजा या दोन्ही पक्षांची युती झालीच नाही, तरी हे हिंदू कार्ड वापरून या दोघांपैकी एका पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो. भाजपाने निवडणुकीसाठी समिती नेमली, त्यातील बहुसंख्य सदस्यांना युती नको आहे. मुळात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच ती नको असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. परवा शिवसेनेने ९० वॉर्डांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर भाजपाने शत-प्रतिशत जागांची तयारी सुरू केली.रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आणि आपले नेतृत्व पक्के करण्यासाठी त्यांनी तशी व्यूहरचना केली. यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाला धक्का देण्याचे तंत्र स्वीकारले. भाजपाच्या निवडणूक समितीत एकही बागडे समर्थक नाही, हीच बाब पुढील राजकारणाची दिशा दर्शविते. दानवेंचा बागडेंवरील रुसवा हा लोकसभा निवडणुकीपासून आहे. कारण बागडेंचा फुलंब्री मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. निवडणुकीच्या वेळी बागडे रुसले होते. ती नाराजी आहे. तेव्हापासून फुलंब्रीत त्यांना शह देण्यासाठी दानवेंनी नामदेव गाडेकर गटाला संजीवनी दिली आणि या गटाने लोकसभेच्या वेळी दानवेंचे काम केले होते. आता आपले जास्तीत जास्त समर्थक निवडून यावेत यासाठी त्यांनी व्यूहरचना केली आहे.इकडे दानवे युतीबाबत फारसे उत्सुक दिसत नसले, तरी आमदार अतुल सावे यांचा युती व्हावी असा आग्रह दिसतो. कारण विधानसभा निवडणुकीत सेनेने त्यांना मदत केली होती. भाजपा व सेना असे नगरसेवक निवडून आले, तर आपल्या मतदारसंघाचे सुरक्षित राजकारण त्यांना करता येईल, एवढीच माफक अपेक्षा त्यांची दिसते. औरंगाबाद भाजपाचे नेतृत्व कोणाकडे हा एक प्रश्न अनुत्तरीत आहे; आणि त्याच दिशेने दानवेंची वाटचाल सुरू दिसते. कारण मराठवाड्याचा नेता म्हणून प्रतिमा निर्माण होईल; परंतु हे एवढेच मर्यादित उद्दिष्ट नाही. दानवेंच्या मतदारसंघात औरंगाबादेतील सहा वॉर्ड येतात. सध्या औरंगाबादच्या अर्थव्यवस्थेचा हा भाग बनला आहे. डी.एम.आय.सी.मुळे पुढील १५-२० वर्षांत हा भाग विकसित होईल. शहर याच परिसरात विस्तारत आहे. आणि हाच भाग दानवेंच्या मतदारसंघात असल्याने औरंगाबादच्या राजकारणात चंचुप्रवेशाचा मार्गही आहे. १५ लाखांपर्यंत शहराच्या विकासासाठी असणाऱ्या नगरोत्थान व जे.एन.यू.आर.सारख्या केंद्रीय योजनांची मुदत संपली. नव्या योजना जाहीर होतील. त्याद्वारे येणारा विकास निधी हे अर्थकारण या पालिका निवडणुकापलीकडचे राजकारण आहे. या निधीद्वारे पुढचे राजकारण मजबूत करता येईल. युती व महानगरपालिका निवडणुका ही केवळ एक शिडी आहे. भाजपाच्या सत्तेचा झुला हा फार पुढचे ठरवून झुलतो.