शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

झुलतो बाई, सत्तेचा झुला

By admin | Updated: April 1, 2015 01:18 IST

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोघांच्या युतीची घोषणा झाली; पण ती अजून कागदावर उतरायला तयार नाही

सुधीर महाजन -

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोघांच्या युतीची घोषणा झाली; पण ती अजून कागदावर उतरायला तयार नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाने शिवसेनेला जसे खेळविले, त्याचीच पुनरावृत्ती निवडणुकीच्या अगोदर औरंगाबादेत पाहायला मिळते. येथेही सेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. महानगरपालिकेत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व राहिले; त्यामुळे त्यांचे वर्चस्व जागावाटपात आजवर भाजपाने सहन केले; पण आता ते ऐकत नाहीत. येथे ९० जागा लढण्याचा युतीचा विचार असून, यापैकी ४५ जागा भाजपाला पाहिजेत; पण सेनेला ५८ जागा पाहिजेत. अशी जागावाटपाची कोंडी सुरू झाली आहे.औरंगाबादची निवडणूक आजवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली. यावेळी मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाच्या विधानसभेतील विजयानंतर नवाच मुद्दा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना मिळाला. आता २३ मुस्लिमबहुल वॉर्डवगळता इतरत्र हे नवे एमआयएम कार्ड दोन्ही पक्षांना वापरता येईल आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल, हा साधा हिशेब असला तरी भाजपा याचा वेगळा विचार करते. उद्या समजा या दोन्ही पक्षांची युती झालीच नाही, तरी हे हिंदू कार्ड वापरून या दोघांपैकी एका पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो. भाजपाने निवडणुकीसाठी समिती नेमली, त्यातील बहुसंख्य सदस्यांना युती नको आहे. मुळात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच ती नको असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. परवा शिवसेनेने ९० वॉर्डांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर भाजपाने शत-प्रतिशत जागांची तयारी सुरू केली.रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आणि आपले नेतृत्व पक्के करण्यासाठी त्यांनी तशी व्यूहरचना केली. यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाला धक्का देण्याचे तंत्र स्वीकारले. भाजपाच्या निवडणूक समितीत एकही बागडे समर्थक नाही, हीच बाब पुढील राजकारणाची दिशा दर्शविते. दानवेंचा बागडेंवरील रुसवा हा लोकसभा निवडणुकीपासून आहे. कारण बागडेंचा फुलंब्री मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. निवडणुकीच्या वेळी बागडे रुसले होते. ती नाराजी आहे. तेव्हापासून फुलंब्रीत त्यांना शह देण्यासाठी दानवेंनी नामदेव गाडेकर गटाला संजीवनी दिली आणि या गटाने लोकसभेच्या वेळी दानवेंचे काम केले होते. आता आपले जास्तीत जास्त समर्थक निवडून यावेत यासाठी त्यांनी व्यूहरचना केली आहे.इकडे दानवे युतीबाबत फारसे उत्सुक दिसत नसले, तरी आमदार अतुल सावे यांचा युती व्हावी असा आग्रह दिसतो. कारण विधानसभा निवडणुकीत सेनेने त्यांना मदत केली होती. भाजपा व सेना असे नगरसेवक निवडून आले, तर आपल्या मतदारसंघाचे सुरक्षित राजकारण त्यांना करता येईल, एवढीच माफक अपेक्षा त्यांची दिसते. औरंगाबाद भाजपाचे नेतृत्व कोणाकडे हा एक प्रश्न अनुत्तरीत आहे; आणि त्याच दिशेने दानवेंची वाटचाल सुरू दिसते. कारण मराठवाड्याचा नेता म्हणून प्रतिमा निर्माण होईल; परंतु हे एवढेच मर्यादित उद्दिष्ट नाही. दानवेंच्या मतदारसंघात औरंगाबादेतील सहा वॉर्ड येतात. सध्या औरंगाबादच्या अर्थव्यवस्थेचा हा भाग बनला आहे. डी.एम.आय.सी.मुळे पुढील १५-२० वर्षांत हा भाग विकसित होईल. शहर याच परिसरात विस्तारत आहे. आणि हाच भाग दानवेंच्या मतदारसंघात असल्याने औरंगाबादच्या राजकारणात चंचुप्रवेशाचा मार्गही आहे. १५ लाखांपर्यंत शहराच्या विकासासाठी असणाऱ्या नगरोत्थान व जे.एन.यू.आर.सारख्या केंद्रीय योजनांची मुदत संपली. नव्या योजना जाहीर होतील. त्याद्वारे येणारा विकास निधी हे अर्थकारण या पालिका निवडणुकापलीकडचे राजकारण आहे. या निधीद्वारे पुढचे राजकारण मजबूत करता येईल. युती व महानगरपालिका निवडणुका ही केवळ एक शिडी आहे. भाजपाच्या सत्तेचा झुला हा फार पुढचे ठरवून झुलतो.