शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जैन धर्मीयांचा मोठा सण संवसरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:56 IST

जैन धर्माचे महान पर्व आहे संवत्सरी महापर्व. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाले तर संवत्सरी म्हणजे जैन धर्मीयांची दिवाळीच होय.

जैन धर्माचे महान पर्व आहे संवत्सरी महापर्व. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाले तर संवत्सरी म्हणजे जैन धर्मीयांची दिवाळीच होय. संवत्सरी हा दिवस जैन धर्मीयांसाठी वर्षातील सर्वांत महत्त्वपूर्ण दिवस होय. हा दिवस पर्व म्हणून गणला जातो. मात्र तीर्थंकरानंतर असणाºया उत्तराधिकारी आचार्याने या पर्वाचे महत्त्व वाढविण्यास हे पर्व सात दिवसांचे केले. या पर्वामुळे मानवाच्या अंगी असलेले राग, द्वेष, क्रोधाच्या ग्रंथीना कमी करण्याची संधी मिळते. तसे पाहता या पर्वाची महती व महत्त्व अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे तपस्येमध्ये ब्रह्मचार्य तपस्या, अग्रणी मणीमध्ये वैर्य मणी भारी, रत्नामध्ये चिंतामणी रत्न, ध्यान साधनेत शूल ध्यान महत्त्वाचे, वनांमध्ये नंदनवन तर पर्वतांमध्ये मेरू पर्वत महत्त्वपूर्ण त्याप्रमाणे पर्युषण पर्व हे महापर्व समजले जाते. म्हणून या पर्वाला ‘पर्वाधीराज पर्युषण पर्व’ म्हणतात. जैन पंचांगानुसार या संवत्सराचा प्रारंभ हा श्रावण वद्य प्रतिपदेला होतो. जैन तिथीनुसार ही तिथी जैनियांच्या वर्षारंभाची तिथी होय. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्माच्या दृष्टीने या पर्वास पर्युषण पर्व म्हणतात. तर दुसºया बाजूस यांचे अवलोकन केल्यास समवायंग सूत्रामध्ये यांचा असा उल्लेख आहे की चतुर्मास प्रारंभानंतर एक महिना वीस दिवस झाल्यानंतर व चतुर्मासाचे ७0 दिवस उरल्यानंतर संवत्सरी पर्वाची आराधना करावी. भगवंत महावीर साधनेच्या कार्यकाळात भाद्रपद शुद्ध पंचमीला संवत्सरी पर्व साजरे करावे. असा काही दंडक नव्हता. भगवंताने एकदा असा प्रयोग केल्यानंतर तो सर्वांनी स्वीकारला व हे पर्व प्रचलित झाले. कधी कधी चतुर्थीला हे पर्व साजरे होते. परंतु पंचमीला हे पर्व साजरे करणे योग्य ठरते. कल्पसूत्रामध्येदेखील यांचा उल्लेख आढळून आला आहे. अतिरिक्त निशीथ सूत्रामध्ये अवेळी पर्युषण व वेळी पर्युषण साजरा करणारा चतुर्मासिक दंडाचा पायिक ठरू शकतो. जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. श्वेतांबर संप्रदायात भाद्रपद महिन्यात पर्युषण पर्व येते. त्यांचे हे पर्व आठ दिवस चालते. त्यानंतर दिगंबर संप्रदायाचे लोक हेच पर्व दहा दिवस साजरे करतात. त्याला ते दसलक्षण या नावाने संबोधतात.