शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मातृभाषा ठरू शकते व्यवसायभाषा !

By admin | Updated: May 29, 2016 03:33 IST

गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आलेला एक सुखद बदल म्हणजे, दहावीनंतर सर्व हुशार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडेच जायचे असते हा अंधविश्वास मागे पडून, अनेक गुणवंत विद्यार्थी

- प्रा. डॉ. अनघा अ. मांडवकर गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आलेला एक सुखद बदल म्हणजे, दहावीनंतर सर्व हुशार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडेच जायचे असते हा अंधविश्वास मागे पडून, अनेक गुणवंत विद्यार्थी आपला कल, आपले उद्दिष्ट यांना महत्त्व देत आवर्जून ‘कला - मानव्यविद्या’ या शाखेत प्रवेश घेऊ लागले आहेत. परंतु याच काही वर्षांत मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांतील महाविद्यालयांत ’कला - मानव्यविद्या’ या शाखेतील ’मराठी भाषा-साहित्य’ या विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने रोडावली आहे. मराठी भाषा-साहित्य हा विषय पदवीस्तरावर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या बाजारपेठकेंद्री जगात काहीही व्यावसायिक संधी नाहीत, असा मराठी भाषकांत प्रचलित असलेला गैरसमज हे विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा-साहित्य’ या विषयाकडे पाठ फिरविण्यामागचे एक मुख्य कारण आहे. अनेकदा विद्यार्थ्यांची मराठी हा विषय घेण्याची इच्छा असली; तरी पालक, अन्य नातेवाईक, समवयस्क यांच्याकडून केल्या जाणाऱ्या ‘मराठीतून तुला पुढे काहीही भवितव्य नाही,’ या अशा नकारात्मक वक्तव्यांमुळे तेही संभ्रमात पडतात. प्रत्यक्षात, ‘मराठी भाषा-साहित्य‘ या विषयाचे अध्ययन हे विविध विषयांचे ज्ञान देऊन, तसेच व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक अशी संवादकौशल्ये, अभिव्यक्तिक्षमता रुजवून एक उत्तम माणूस घडवू शकते. या विषयातील पदवी शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधीही निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतात. मराठीत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन शाळा, महाविद्यालयांत अध्यापक म्हणून काम करण्याच्या पारंपरिक शक्यतांबरोबरच अन्य भाषिकांसाठी मराठीचे अध्यापन करणे, पदवीनंतर शैक्षणिक तंत्रज्ञानाविषयीचा अभ्यासक्रम करून शैक्षणिक संसाधननिर्मितीच्या क्षेत्रात जाणे अशा अन्य वाटांचाही विचार करणे शक्य आहे. मराठी भाषा-साहित्य यांतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय परीक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य-मराठी-विकास-संस्था’, ‘साहित्य-संस्कृती-महामंडळ’ इत्यादी संस्थांत नोकरी मिळवू शकतात. मराठीतून पदवी घेतल्यानंतर ‘भाषाविज्ञान’ (लिंग्विस्टिक्स) या विषयातही पदव्युत्तर शिक्षण घेता येते. भाषाविज्ञानातील या शिक्षणाच्या आधारे अनेक शासकीय व बिगरशासकीय संस्थांतील भाषाविषयक संशोधन प्रकल्पांत कार्यसंधी मिळू शकते.मराठी भाषा-साहित्य या विषयातील पदवी शिक्षणानंतर ‘पत्रकारिता व प्रसारमाध्यमे’ यांविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि आंतरजाल या माध्यमांत व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. मराठीच्या पदवीधरांना पत्रकारितेशिवाय ‘जाहिरात-मसुदालेखन’ (कॉपी-रायटिंग), ‘जनसंपर्क-व्यवहार’ (पब्लिक रिलेशन्स) या वाटा चोखाळणेही शक्य आहे; त्यासाठी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. भाषेवर प्रभुत्व, लेखनक्षमता आणि उत्तम आवाज असलेले मराठीचे पदवीधर आकाशवाणीवर सूत्रवाही (आर.जे.), वृत्तनिवेदक, कार्यक्रम-अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत असलेले दिसतात. मराठीच्या पदवीधरांना ‘ग्रंथालयशास्त्रा’चा अभ्यासक्रम पूर्ण करून शाळा-महाविद्यालयांतील ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये येथे ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळू शकते. त्यांना रिझर्व्ह बँकेसारख्या शासकीय संस्था तसेच खासगी क्षेत्रांतील विविध उद्योगसंस्था यांमध्येही ग्रंथपाल किंवा माहिती-अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते. मराठीचे, ग्रंथालयशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुस्तक प्रकाशन संस्थांतील संपादन विभागांतही काम मिळू शकते. प्रकाशन संस्थांकडून अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, संपादन या प्रकारची कामे मिळविणे शक्य आहे. याव्यतिरिक्त ‘मराठी’ या विषयाचे पदवीधर त्यांच्या मराठीविषयक अभ्यासाच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षांत, तसेच सामाजिक संशोधन, पर्यटन अशा अन्य व्यावसायिक क्षेत्रांतही यश मिळवू शकतात. ज्यांना नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य, लोककला या क्षेत्रांकडे जायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी पदवीस्तरावर ‘मराठी’ या विषयाचा अभ्यास केल्यास, तो त्यांच्या कलाविषयक अध्ययनास पूरक ठरू शकतो. दुसरे असे की, ज्या ठिकाणी कोणत्याही विषयातील पदवी ही पात्रता-अट असते, अशा रोजगार संधी, उदाहरणार्थ, बँकेतील, रेल्वेतील किंवा कोणत्याही शासकीय विभागांतील भरतीसाठीच्या परीक्षा या मराठीच्या पदवीधरांसाठीही खुल्या असतात.थोडक्यात, ‘मराठी’ हा विषय शिकून पैसा, प्रतिष्ठा, प्रगतीच्या संधी, नावलौकिक हे सारे काही निश्चितपणे मिळू शकते. मराठी ही आपली ‘मातृभाषा’ किंवा ‘निजभाषा’ म्हणून आपले तिच्यावर प्रेम असतेच; पण ‘व्यवसायभाषा’ म्हणूनही ती आपल्याला खूपकाही देऊ शकते. गरज आहे ती, महाराष्ट्रीय समाजातील भाषा-साहित्यविषयक क्षमता व आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी आपापल्या डोळ्यांवरची गैरसमजांची नकारात्मक झापडे दूर करून; ‘मराठी आणि व्यावसायिक संधी’ या समीकरणाकडे नव्या, सकारात्मक दृष्टीने पाहण्याची, तसेच यशाकरिता आवश्यक असलेल्या भाषिक आणि अन्य क्षमतांच्या वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची !