शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

‘एसटी’ला ग्रहण अवैध वाहतुकीचे

By admin | Updated: May 29, 2016 03:18 IST

नव्वदच्या दशकात तत्कालीन शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवाना देण्याचे धोरण स्वीकारले आणि प्रवासी वाहतुकीतील एस.टी.ची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली.

- श्रीरंग बरगेनव्वदच्या दशकात तत्कालीन शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवाना देण्याचे धोरण स्वीकारले आणि प्रवासी वाहतुकीतील एस.टी.ची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ‘नगण्य’ वाटणारी ही वाहतूक व्यवस्था गेल्या २0-२५ वर्षांत चांगलीच फोफावली असून, आजमितीस एस.टी.च्या उत्पन्नाएवढीच किंबहुना जास्तच आर्थिक उत्पन्न कमावणारी समांतर अर्थव्यवस्था या अवैध प्रवासी वाहतुकीतून निर्माण झाली आहे. एस.टी.चे दैनंदिन उत्पन्न सरासरी १८ कोटी रुपये आहे. तर अवैध वाहतुकीचे दररोजचे उत्पन्न सरासरी २0 ते २२ कोटी रुपये आहे. अवैध वाहतुकीचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. साधारणत: १ ते ५0 कि.मी. अंतरावर विशेषत: ग्रामीण भागात ‘वडाप’ किंवा ‘काळी-पिवळी’ या नावाने ओळखली जाणारी कमी अंतराच्या पल्ल्यावर धावणारी व दुसरी शहरी भागात विकसित झालेली साधारणत: २५0 कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर चालणारी खाजगी आराम बस (लक्झरी बसेस) या दोन्ही वाहतूकीला परिवहन विभागाचे कमकुवत कायदे, पोलीस व परिवहन अधिकाऱ्यांच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे ‘बळ’ प्राप्त झाले आहे.एस.टी.च्या आर्थिक तोट्याला कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक म्हणून या अवैध वाहतुकीकडे पाहिले जाते तेव्हा प्रश्न निर्माण होतो तो त्याच्यावर कारवाईचा व निर्बंधाचा. उच्च न्यायालयाने वारंवार याबाबत शासनाला खडसावूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीचे ‘भूत’ एस.टी.च्या मानगुटीवर बसले आहे. सुदैवाने महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बदल झालाय. राज्याचे परिवहनमंत्रीच महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष झालेत. यापूर्वी अध्यक्ष व परिवहन मंत्री वेगवेगळ्या व्यक्ती असल्याने आरटीओ व एस.टी. महामंडळ एकत्र काम करण्यास अडचणी होत्या. पण या बदलामुळे आता काही प्रमाणात संयुक्त कारवाईला सुरुवात झालेय. पण पुढे काय होते ते पाहावे लागेल; कारण राजकीय दबावाला बळी पडून अशा कारवाईतून यापूर्वी काहीच हाती लागले नव्हते. याउलट रोजगाराचा प्रश्न निर्माण करून काही राजकारणी खाजगी वाहतुकीचे समर्थन करतात.दुर्गम भागात फक्त एस.टी.च वाहतूक करते. खाजगी वाहतूकवाले गाड्यांचे नुकसान होईल म्हणून डोंगराळ भागातून व कच्च्या रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करीत नाहीत. दैनंदिन सुमारे ६0 लाख प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे कार्य एस.टी. अगदी लीलया पार पाडते. खाजगी वाहतूकवाले कधीही भाडेवाढ करतात. हंगामी व सणाच्या वेळी ते दुप्पट भाडे आकारतात. एस.टी. तसे करीत नाही. स्वच्छता, नियमितता, शिस्त हे गुण बदलत्या काळानुसार एस.टी.ने अंगीकारले आहेत. एस.टी.ला लागलेले खाजगी वाहतुकीचे ग्रहण दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या.

(लेखक हे महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.)