शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

प्रेरणांचा शोध

By admin | Updated: February 16, 2015 23:46 IST

स्वत:च्या आयुष्यात काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या व इतरांच्याही आयुष्यात काही वेगळेपण आणू इच्छिणाऱ्या तरुणांचे ‘सेवांकुर’ हे मुक्त व्यासपीठ.

स्वत:च्या आयुष्यात काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या व इतरांच्याही आयुष्यात काही वेगळेपण आणू इच्छिणाऱ्या तरुणांचे ‘सेवांकुर’ हे मुक्त व्यासपीठ. अमरावतीच्या ‘प्रयास’ या संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दहा वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली. समाजातील सेवाभावी माणसांचा शोध घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात आयुष्याची पुढील वाटचाल करण्याचा वसा ‘सेवांकुर’ने घेतला आहे. सेवांकुरचे हे ध्येयवेडे तरुण दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मयोगी बाबा आमट्यांच्या आनंदवनात एकत्र येतात. अधेमधे ते सेवाग्रामला तर कधी तपोवनात भेटतात. सेवांकुरचा ‘आम्ही बिघडलो-तुम्ही बी घडाना’ हा असाच एक प्रेरणादायी संवादाचा मासिक उपक्रम. विविध क्षेत्रांतील प्रेरणांचा शोध या उपक्रमाच्या माध्यमातून घेण्यात येत असतो. लातूरजवळ हासेगाव नावाचे खेडे आहे. या गावालगतच्या माळरानावर एड्सग्रस्त मुलांचा ‘सेवालय’ हा आश्रम आहे. सेवालयात सध्या ६३ एड्सग्रस्त मुले आहेत. बहिष्कार, हेटाळणी अशा संकटातून मार्ग काढत कधी काळी पत्रकार असलेला रवि बापटले या मुलांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा प्रयत्न करतो. मुलांना सोबत घेऊन एका झोपडीत रविने सेवालय सुरू केले. ही नवी ब्याद गावात कुठून आली? असे म्हणून काही समाजकंटकांनी रविच्या मुलांची झोपडी जाळली. ही मुले शाळेत जाऊ लागली तेव्हा याच समाजकंटकांनी आपली मुले शाळेत पाठविण्यास नकार दिला. या गोष्टींची रविला आता सवय झाली आहे. चांगले काम सुरू केले की असे होणारंच. रवि निराश होत नाही. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की त्याच्या वेदनेची फुले होतात. बीड जिल्ह्यातील गेवराईचा संतोष नारायण गर्जे हा २९ वर्षांचा तरुण ४० अनाथ मुला-मुलींचा बाप आहे. वडील एके दिवशी कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. संतोषला हे अनाथपण जाणवू लागले. बहीण आजारात गेली. भाचा अनाथ झाला. संतोषने त्याला पोटाशी धरले. अशीच सात अनाथ मुले सावली शोधत त्याच्याकडे आली. एका शेतात शेड घालून या अनाथ मुलांसोबत संतोषने नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता गेवराईनजीक तीन कि.मी. अंतरावर बालग्राम प्रकल्पात ही मुले त्याच्यासोबत राहतात. एक मुलगा यावर्षी इंजिनिअरिंगला पुण्याला गेला. मुलांच्या शिक्षणासाठी, रोजच्या गरजांसाठी संतोषला दारोदार भटकावे लागते. अनेकदा रिकाम्या हाताने आणि निराश मनाने संतोष घरी परततो. अहमदनगरचे राजेंद्र आणि सुचिता धामणे हे डॉक्टर दांपत्य. एकदा नगर-शिर्डी मार्गावरून जाताना रस्त्यावर एक मनोरुग्ण महिला उकिरड्यावर विष्ठा खाताना त्यांना दिसली. धामणे दांपत्य अस्वस्थ झाले, घरी परतले, स्वयंपाक केला आणि पुन्हा परत जाऊन त्या महिलेला जेवू घातले. ही अस्वस्थता इथेच संपणारी नव्हती. समाजात अशा निराश्रित मनोरुग्ण महिला खूप असतील. त्या कशा जगत असतील, प्रश्नांचे काहूर सुरू झाले. दुसऱ्या दिवसापासून घरी स्वयंपाक करून रस्त्यावर भटकणाऱ्या अशा अनाथांना ते जेवू घालू लागले. या महिलांना हक्काचे एक घर असावे, असा विचार पुढे आला आणि त्यातूनच ‘इंद्रधनू’हा प्रकल्प आकारास आला. आज इथे ६५ मनोरुग्ण महिला राहतात.यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या मधुकर धस या निर्लेप कार्यकर्त्याच्या सेवाभावाची कथाही अशीच. या माणसाने पाणी आणि शेतीसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. सात हजार हेक्टर जमिनीवर जल व मृदसंधारणाची कामे आणि नऊ हजार एकर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणण्याचे काम मधुकररावांनी केले आहे. त्यांनी ९८ डोह बंधारे बांधली आणि अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. हजारांपेक्षा अधिक गावांत चार हजार महिला बचतगटांच्या माध्यमातून ५० हजार महिलांचे संघटन बांधले आणि त्यांना मागच्या वर्षी १९ कोटींचे कर्ज बँकांकडून मिळवूनही दिले. अशा कितीतरी सेवाभावी माणसांचे आभाळाएवढे काम विदर्भातील तरुणाई ‘सेवांकुर’च्या माध्यमातून सध्या समजून घेत आहे. एरवी ही माणसे कुठल्या तरी कोपऱ्यात आपले काम व्रतस्थपणे करीत असतात. या कामाची माध्यमांनी दखल घ्यावी यासाठी ते खटपटी करीत नाहीत आणि सूट-मफलरात अडकलेल्या कॅमेऱ्यांचे झोतही त्यांच्या कामावर पडत नाहीत. - गजानन जानभोर