शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

तर अशी साहित्य संमेलने उठवळच ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 02:21 IST

साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील.

- गजानन जानभोरसाहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणा-यांचीही गर्दी राहील..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा असावा? खरे तर या प्रश्नाचे उत्तर मराठी वाचकांनी शोधायला हवे. पण तसे होत नाही. केवळ १ हजार ७२ मतदार या अध्यक्षाची पात्रता ठरवतात आणि नंतर साहित्य संमेलनाचे सोपस्कार पार पडतात. या निवडणुकीत १०० टक्के मतदान कधीच होत नाही. ८००-९०० मतदार मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करतात. त्यातील बहुतांश आज्ञाधारक, मांडलिक चक्क कोरी मतपत्रिका संघ किंवा परिषदेच्या टोळीप्रमुखाला आणून देतात. मग टोळीप्रमुख अंतिम निर्णय घेतात.मागील काही वर्षांपासून सातत्याने हेच धंदे सुरू आहेत आणि अशाच पद्धतीने यंदाही बडोद्याचे संमेलनाध्यक्ष ठरणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील असोत किंवा विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर या दोघांकडेच या निवडणुकीची सूत्रे असतात. ठाले पाटलांचे समजून घेता येईल, ते प्राचार्य होते, मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत. पण म्हैसाळकरांचा तर साहित्याशी तीळमात्र संबंध नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाऐवजी लांगूलचालनातून, घाणेरड्या राजकारणातून निवडला जात असेल तर मग अशी संमेलनेच उठवळ ठरतात. हे राजकारण केवळ संमेलनाध्यक्षांपुरतेच मर्यादित नसते. संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलनातील वक्ते, कवींमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता खुशमस्करेच अधिक असतात. संमेलनाध्यक्षांच्या भाषणात औपचारिक चिंतन असते पण कृतिकार्यक्रम नसतो. फार जुने कशाला? मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी वर्षभर काय केले? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक असहिष्णूता, गौरी लंकेश यांची हत्या अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरची त्यांची साक्षेपी मते मराठी जनांना कळायला नको? हा प्रश्न केवळ डॉ. काळेंपुरता मर्यादित नाही. आजवरच्या बहुतांश संमेलनाध्यक्षांनी (काही अपवाद आहेत) सुद्धा विशेष काहीच केले नाही. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनातही फक्त पुनरावृत्ती होईल. हा निराशेचा सूर नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशी संमेलने आवश्यक आहेतच. पण संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीमागील पाताळयंत्री राजकारण संपायला हवे. याच राजकारणामुळे विंदा करंदीकर, इंदिरा संत, भालचंद्र नेमाडे या प्रज्ञावंतांना अध्यक्ष व्हावेसे वाटले नाही. डॉ. यशवंत मनोहर, सुरेश द्वादशीवार या ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंतांनी संमेलनाध्यक्ष व्हावे असे ठाले पाटील-म्हैसाळकरांना का वाटत नाही? कारण अगदी सोपे आहे, त्यांच्यासमोर आपले खुजेपण ठसठशीतपणे दिसेल, ही भीती त्यांना नेहमी वाटत असते.संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणाºयांचीही गर्दी राहील. या साहित्य संमेलनांना मराठी भाषा-संस्कृतीशी काहीच सोयरसुतक नाही. मराठी माणूस तसाही आता अलिप्त आहेच,पुढच्या काळात तो त्रयस्थ होईल. 

टॅग्स :marathiमराठी