शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

तर अशी साहित्य संमेलने उठवळच ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 02:21 IST

साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील.

- गजानन जानभोरसाहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणा-यांचीही गर्दी राहील..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा असावा? खरे तर या प्रश्नाचे उत्तर मराठी वाचकांनी शोधायला हवे. पण तसे होत नाही. केवळ १ हजार ७२ मतदार या अध्यक्षाची पात्रता ठरवतात आणि नंतर साहित्य संमेलनाचे सोपस्कार पार पडतात. या निवडणुकीत १०० टक्के मतदान कधीच होत नाही. ८००-९०० मतदार मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करतात. त्यातील बहुतांश आज्ञाधारक, मांडलिक चक्क कोरी मतपत्रिका संघ किंवा परिषदेच्या टोळीप्रमुखाला आणून देतात. मग टोळीप्रमुख अंतिम निर्णय घेतात.मागील काही वर्षांपासून सातत्याने हेच धंदे सुरू आहेत आणि अशाच पद्धतीने यंदाही बडोद्याचे संमेलनाध्यक्ष ठरणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील असोत किंवा विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर या दोघांकडेच या निवडणुकीची सूत्रे असतात. ठाले पाटलांचे समजून घेता येईल, ते प्राचार्य होते, मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत. पण म्हैसाळकरांचा तर साहित्याशी तीळमात्र संबंध नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाऐवजी लांगूलचालनातून, घाणेरड्या राजकारणातून निवडला जात असेल तर मग अशी संमेलनेच उठवळ ठरतात. हे राजकारण केवळ संमेलनाध्यक्षांपुरतेच मर्यादित नसते. संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलनातील वक्ते, कवींमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता खुशमस्करेच अधिक असतात. संमेलनाध्यक्षांच्या भाषणात औपचारिक चिंतन असते पण कृतिकार्यक्रम नसतो. फार जुने कशाला? मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी वर्षभर काय केले? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक असहिष्णूता, गौरी लंकेश यांची हत्या अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरची त्यांची साक्षेपी मते मराठी जनांना कळायला नको? हा प्रश्न केवळ डॉ. काळेंपुरता मर्यादित नाही. आजवरच्या बहुतांश संमेलनाध्यक्षांनी (काही अपवाद आहेत) सुद्धा विशेष काहीच केले नाही. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनातही फक्त पुनरावृत्ती होईल. हा निराशेचा सूर नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशी संमेलने आवश्यक आहेतच. पण संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीमागील पाताळयंत्री राजकारण संपायला हवे. याच राजकारणामुळे विंदा करंदीकर, इंदिरा संत, भालचंद्र नेमाडे या प्रज्ञावंतांना अध्यक्ष व्हावेसे वाटले नाही. डॉ. यशवंत मनोहर, सुरेश द्वादशीवार या ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंतांनी संमेलनाध्यक्ष व्हावे असे ठाले पाटील-म्हैसाळकरांना का वाटत नाही? कारण अगदी सोपे आहे, त्यांच्यासमोर आपले खुजेपण ठसठशीतपणे दिसेल, ही भीती त्यांना नेहमी वाटत असते.संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणाºयांचीही गर्दी राहील. या साहित्य संमेलनांना मराठी भाषा-संस्कृतीशी काहीच सोयरसुतक नाही. मराठी माणूस तसाही आता अलिप्त आहेच,पुढच्या काळात तो त्रयस्थ होईल. 

टॅग्स :marathiमराठी