शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सर्वोच्च घूमजाव

By admin | Updated: August 9, 2015 21:56 IST

भारतीय संसदेने संमत केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखणे

भारतीय संसदेने संमत केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे निक्षून सांगत हे कलम रद्द करण्याची भूमिका घेणाऱ्या त्याच सर्वोच्च न्यायालयाने आता सोशल मीडियावर बंधने लागू करण्यासाठी संसदेने तत्काळ हालचाल करून नवा कायदा संमत करावा, असे सांगणे यालाच सर्वोच्च घूमजाव असे म्हणता येईल. सोशल मीडियात समाविष्ट होणाऱ्या फेसबुक आणि ट्विटर यांच्या तुलनेत व्हॉट्स अ‍ॅप हे माध्यम दिवसेंदिवस तापदायक ठरत चालले आहे. दुर्दैवाने एरवी अत्यंत उपयुक्त ठरण्याची क्षमता असणाऱ्या या विशिष्ट माध्यमाचा प्रारंभच शून्य वा उणे विश्वासार्हतेने झाला आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक वा व्यावसायिक संघटनांनी समविचारी लोकांचे ग्रुप या माध्यमाच्या आधारे तयार केले असून, त्यापैकी अनेकांचे स्वरूप ‘टेरर ग्रुप’समान झाले आहे. मुळात स्वातंत्र्य कोणतेही असो, ते कधीही अनिर्बन्ध असू शकत नाही. राज्यघटनेतील मूलभूत स्वातंत्र्येदेखील अनिर्बन्ध नाहीत. पण भारतातले सुजाण नागरिक त्यांना बहाल केलेल्या मूलभूत स्वातंत्र्याचा वापर विवेकाने करतील, अशी घटनाकारांची अपेक्षा असावी. पण ती फोल ठरत चालल्याचे याआधीच उघड होत चालले होते. पण सामाजिक माध्यमांचा उदय झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कडेलोटापर्यंत वापर सुरू झाला तेव्हाच सरकारला कायदा करणे भाग पडले. याच कायद्यातील विशिष्ट तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले. ते ठरविताना न्यायालयासमोर ज्या बाबी आल्या, त्यात संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून निश्चितच हडेलहप्पी झाली. पण म्हणून कायदाच चुकीचा हा निष्कर्ष तितकाच अतिरेकी होता, ही बाब आता खु्द्द त्याच न्यायालयाने मान्य केली हे बरे झाले. त्याला याच न्यायालयात व्यवसाय करणारे ज्येष्ठ विधिज्ञ एल. नागेश्वरराव कारणीभूत ठरले. त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचा एक तद्दन खोटा संदेश म्हणे व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता (याला व्हायरल होणे म्हणतात). राव यांना त्याची कल्पनाही नव्हती. अपघाताने त्यांना ती आली तोवर त्यांची बरीच मोठी बदनामी होऊन गेली होती. राव यांच्या कथनाला अन्य विधिज्ञ के. पराशरन यांनीदेखील जेव्हा दुजोरा दिला तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातली आपली नवी भूमिका जाहीर केली. कोणाच्याही विरोधात बदनामीकारक संदेशांचे वहन करण्याचा मुक्त परवाना दिला जाऊ शकत नाही, हे न्यायालयाचे यासंदर्भातील विधान पुरेसे बोलके म्हणावे लागेल.