शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

ही गीता ती सीता

By admin | Updated: April 11, 2015 00:41 IST

ही गोष्ट आहे दोन उपवर मुलींची. दोघी शिकलेल्या. एकीचं नाव रिटा, दुसरीचं मंगला. दोघींचे आईवडील जुन्या मतांचे, रूढी पाळणारे, श्रद्धाळू, समाजमताच्या

विजयराज बोधनकरही गोष्ट आहे दोन उपवर मुलींची. दोघी शिकलेल्या. एकीचं नाव रिटा, दुसरीचं मंगला. दोघींचे आईवडील जुन्या मतांचे, रूढी पाळणारे, श्रद्धाळू, समाजमताच्या ढिगाऱ्याखाली दडपलेले. मुलामुलींनी कसं रहावं याची गणितं मांडणारे. अशा वातावरणात रिटा आणि मंगला वाढत राहिल्या. रिटा बंडखोर तर मंगला दबून जगणारी. लग्नाची वेळ आली तेव्हा ंंंमंगलाच्या आईवडिलांनी समाजातला मुलगा शोधणं चालू केलं. मंगलाला माहिती होतं की आपल्या समाजात चांगली मुलं नाहीत. तरीही आईबाबा आपल्याला कुणाच्याही गळ्यात बांधून देतील. कारण तिच्या दोन बहिणींची लग्ने अशीच लावून त्यांच्या आयुष्याचं कुंपण करून टाकलं होतं.रिटा बुद्धीचा वापर करणारी. तिच्या जेव्हा लक्षात आलं की, आईवडिलांच्याच पसंतीच्या मुलासोबत आपलं लग्न लावून देणार आहेत, तशी ती जागृत झाली. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली. तिच्याच शहरात एक महिला जागृती मंच होता. ती तिथं गेली, मंचाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटली. आजच्या आधुनिक काळात मुलामुलीची इच्छा नसताना केवळ समाजाच्या भीतीपोटी कुणा अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात बांधले जात असेल तर मग आमच्या शिक्षणाचा काय उपयोग, असा थेट प्रश्न तिने केला. मंचाच्या अध्यक्षांनी विचारले, आम्ही काय करावे असे तुला वाटते? त्यावर रिटा म्हणाली, तुमच्या मंचातर्फे एक परिसंवाद आयोजित करा व तरुण मुलामुलींना, पालकांना व समाजाला आमंत्रित करा. त्याचा प्रचार मी करते ! रिटाचे म्हणणे आयोजकांना पटले. परिसंवाद आयोजित केला गेला. ठरल्या दिवशी रिटाच्या आईवडिलांनाही बोलावले. त्यात रिटाने स्वत: भाग घेतला. अनेक मुलामुलींना व पालकांना बोलतं केलं. यातून एकच सूर उमटला तो म्हणजे स्वत:चा जोडीदार स्वत:ला निवडण्याचा हक्क आहे आणि तो हक्क आईवडिलांकडून व समाजाकडून त्यांना देण्यात यावा. जो युवक किंंवा युवती उच्च शिक्षणाने, जाणिवेने किंंवा उच्च विचाराने प्रभावित असेल त्याच्याशीच स्व-खुशीने लग्न झाले पाहिजे. या परिसंवादाने परिसरात चर्चा झाली. मत आणि मनपरिवर्तन झालं. रिटाने आपला मनपसंत जोडीदार निवडूनही काढला. पण मंगलाच्या आईवडिलांनी मात्र जातीतल्याच एका सामान्य मुलाशी लग्न लावून मंगलाच्या स्वप्नाचा बळी घेतला. मंगलाला बुद्धिवादी बंडखोर बनता आलं नाही. म्हणूनच रिटा भगवान कृष्णाची क्रांतिकारी गीता ठरली. तर मंगला मात्र दुर्बल वनवासी सीता ठरली. जेव्हा बंडखोरीची वेळ येते तेव्हा प्रत्येकाने ती करावी. त्यालाच म्हणतात क्र्रांतीचं उचललेलं पाऊल.