शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

ही गीता ती सीता

By admin | Updated: April 11, 2015 00:41 IST

ही गोष्ट आहे दोन उपवर मुलींची. दोघी शिकलेल्या. एकीचं नाव रिटा, दुसरीचं मंगला. दोघींचे आईवडील जुन्या मतांचे, रूढी पाळणारे, श्रद्धाळू, समाजमताच्या

विजयराज बोधनकरही गोष्ट आहे दोन उपवर मुलींची. दोघी शिकलेल्या. एकीचं नाव रिटा, दुसरीचं मंगला. दोघींचे आईवडील जुन्या मतांचे, रूढी पाळणारे, श्रद्धाळू, समाजमताच्या ढिगाऱ्याखाली दडपलेले. मुलामुलींनी कसं रहावं याची गणितं मांडणारे. अशा वातावरणात रिटा आणि मंगला वाढत राहिल्या. रिटा बंडखोर तर मंगला दबून जगणारी. लग्नाची वेळ आली तेव्हा ंंंमंगलाच्या आईवडिलांनी समाजातला मुलगा शोधणं चालू केलं. मंगलाला माहिती होतं की आपल्या समाजात चांगली मुलं नाहीत. तरीही आईबाबा आपल्याला कुणाच्याही गळ्यात बांधून देतील. कारण तिच्या दोन बहिणींची लग्ने अशीच लावून त्यांच्या आयुष्याचं कुंपण करून टाकलं होतं.रिटा बुद्धीचा वापर करणारी. तिच्या जेव्हा लक्षात आलं की, आईवडिलांच्याच पसंतीच्या मुलासोबत आपलं लग्न लावून देणार आहेत, तशी ती जागृत झाली. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली. तिच्याच शहरात एक महिला जागृती मंच होता. ती तिथं गेली, मंचाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटली. आजच्या आधुनिक काळात मुलामुलीची इच्छा नसताना केवळ समाजाच्या भीतीपोटी कुणा अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात बांधले जात असेल तर मग आमच्या शिक्षणाचा काय उपयोग, असा थेट प्रश्न तिने केला. मंचाच्या अध्यक्षांनी विचारले, आम्ही काय करावे असे तुला वाटते? त्यावर रिटा म्हणाली, तुमच्या मंचातर्फे एक परिसंवाद आयोजित करा व तरुण मुलामुलींना, पालकांना व समाजाला आमंत्रित करा. त्याचा प्रचार मी करते ! रिटाचे म्हणणे आयोजकांना पटले. परिसंवाद आयोजित केला गेला. ठरल्या दिवशी रिटाच्या आईवडिलांनाही बोलावले. त्यात रिटाने स्वत: भाग घेतला. अनेक मुलामुलींना व पालकांना बोलतं केलं. यातून एकच सूर उमटला तो म्हणजे स्वत:चा जोडीदार स्वत:ला निवडण्याचा हक्क आहे आणि तो हक्क आईवडिलांकडून व समाजाकडून त्यांना देण्यात यावा. जो युवक किंंवा युवती उच्च शिक्षणाने, जाणिवेने किंंवा उच्च विचाराने प्रभावित असेल त्याच्याशीच स्व-खुशीने लग्न झाले पाहिजे. या परिसंवादाने परिसरात चर्चा झाली. मत आणि मनपरिवर्तन झालं. रिटाने आपला मनपसंत जोडीदार निवडूनही काढला. पण मंगलाच्या आईवडिलांनी मात्र जातीतल्याच एका सामान्य मुलाशी लग्न लावून मंगलाच्या स्वप्नाचा बळी घेतला. मंगलाला बुद्धिवादी बंडखोर बनता आलं नाही. म्हणूनच रिटा भगवान कृष्णाची क्रांतिकारी गीता ठरली. तर मंगला मात्र दुर्बल वनवासी सीता ठरली. जेव्हा बंडखोरीची वेळ येते तेव्हा प्रत्येकाने ती करावी. त्यालाच म्हणतात क्र्रांतीचं उचललेलं पाऊल.