शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

जिही उदंड कष्ट केले

By admin | Updated: August 6, 2016 04:38 IST

रामदास स्वामींनी ‘जिही उदंड कष्ट केले’ या पंक्तीद्वारे अथक कष्ट करणाऱ्यांचा जो गौरव केला आहे

रामदास स्वामींनी ‘जिही उदंड कष्ट केले’ या पंक्तीद्वारे अथक कष्ट करणाऱ्यांचा जो गौरव केला आहे तो, लोकमान्य टिळकांना तंतोतंत लागू पडतो. त्यांनी ब्रह्मदेशातील मंडालेच्या म्हणजे आताच्या म्यानमारमधील कठोर तुरुंगवासात इ.स. १९०८ ते १९१४ या सहा वर्षांत ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला व १०१ वर्षांपूर्वी १९१५ साली तो प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी तेव्हाच्या मॉरिस कॉलेजचे (आताचे नागपूर महाविद्यालय) प्रिन्सिपॉल महामहोपाध्याय बापूजी ताम्हण यांच्या अध्यक्षतेखाली व्यंकटेश थिएटरात श्रोत्यांच्या गर्दीसमोर ‘गीतारहस्य’ ग्रंथाची मूळ संकल्पना त्यांनी प्रगट केली. गीतेतील कर्म शब्दाचा अर्थ लौकिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य असा होतो असे त्यांचे विवरण होते. गीतारहस्याच्या अर्पण पत्रिकेत, संस्कृत श्लोकात ‘श्रीशायजनतात्मने’ म्हणजे जनताजनार्दनाला अर्पण असे म्हटले आहे.राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांनी स्वत:च आठ दिवस ओजस्वी असे भाषण न्यायासनापुढे केले, त्याचा परिणाम अटळ होता. मधुमेहाने पोखरलेले आणि पन्नाशी उलटून गेलेले टिळक अत्यंत शांतपणे मंडालेला शिक्षा भोगायला निघाले. त्यांना कोलकातामार्गे रेल्वेने नेण्यासाठी पोलिसांनी मुंबईला मेलमध्ये बसवले. टिळकांचे हात बेड्यांमध्ये जखडलेले होते. गाडी सुटायला अवकाश असल्याने पोलीस त्यांना बाकावर बसवून चहा प्यायला निघून गेले. पोलीस परतले तेव्हां टिळक आपल्या जागेवर निश्चिंतपणे झोपले होते. स्थितप्रज्ञ याहून वेगळा असतो का?न.चिं. केळकरांनी एका ठिकाणी नमूद केले आहे की, टिळकांच्या धकाधकीच्या जीवनात राज्यकर्त्यांनी त्यांना दिलेली सहा वर्षांची शिक्षा ग्रंथलेखनासाठी मोलाची ठरली असे दिसते. जेव्हा ही कारावासाची शिक्षा त्यांना झाली तेव्हा जर्मन पंडित मॅक्समुल्लर यांनाही राहावले नाही. ‘अशा महापंडिताला तुरुंगात कुजवणे योग्य नव्हे. त्याला ही शिक्षा करू नये’ असा अर्ज काही विवेकी व्यक्तींनी महाराणी व्हिक्टोरियाकडे दिला. त्यावर पहिली सही प्रो. मॅक्समुल्लर यांची होती.सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत दिवसभर कर्मरत असणाऱ्या टिळकांविषयी वाचनातून स्मरलेल्या या अमूल्य आठवणी आहेत. निष्क्रियता आणि कर्मसंन्यासाचा मार्ग त्याज्य आहे हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. ओरायन, आॅर्क्टिक होम इन वेदाज आणि गीतारहस्य अशी ग्रंथ निर्मिती करणाऱ्या लोकोत्तर व्यक्तीविषयी कवी गोविंद लिहितात, ‘मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.’-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे