शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीडीपी’चा घोळ

By admin | Updated: July 6, 2016 03:02 IST

आर्थिक आघाडीवरील देशाच्या प्रगतीचा निर्देशांक बनलेला सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) दर मोजण्याच्या पद्धतीमध्ये केंद्र सरकारने गतवर्षी बदल केल्यापासून, जीडीपी दरासंदर्भात

आर्थिक आघाडीवरील देशाच्या प्रगतीचा निर्देशांक बनलेला सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) दर मोजण्याच्या पद्धतीमध्ये केंद्र सरकारने गतवर्षी बदल केल्यापासून, जीडीपी दरासंदर्भात निर्माण होत असलेले शंकाकुशंकांचे काहूर शमण्यास तयारच नाही. २०१४-१५ मध्ये ७.६ दराने आणि २०१५-१६ मधील पहिल्या तिमाहीत ७.९ टक्के दराने जीडीपी वाढल्याबद्दल केंद्र सरकार स्वत:च्या पाठीवर स्वत:च शाबासकीची थाप मारीत असताना, मॉर्गन स्टॅनली या जगातील आघाडीच्या वित्त सेवा संस्थेचे अर्थतज्ज्ञ रुचीर शर्मा यांनी भारताच्या या वृद्धीदरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही तशी शंका उपस्थित केली होती. पण जीडीपी आकड्यांमधील विसंगतीबाबत सध्याचे मोदी सरकार आणि पूर्वीचे संपुआ सरकार सारखेच. त्या सरकारच्या काळातील २०१२-१३ मध्ये तर विसंगतीचा आकडा आजच्यापेक्षा बराच मोठा होता. पण मग विसंगती जर यापूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतही समोर येत होती, तर मग आताच जीडीपीच्या वृद्धीदराबाबत शंका का व्यक्त केली जात आहे? त्यामागचे कारण हे आहे, की मोदी सरकारच्या कारकिर्दीत जीडीपी वृद्धी दराने हनुमान उडी घेतल्याचे दिसते. पण जर क्षेत्रनिहाय आकडे तपासले तर प्रत्यक्षात पिछेहाटच सुरू असल्याचे जाणवते. गेल्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीमध्ये उद्योग क्षेत्राची वाढ ८.६ टक्क्यांवरून ७.९ टक्क्यांपर्यंत घसरली. त्याचवेळी सेवा क्षेत्राची वाढही ९.१ टक्क्यांवरून घसरून ८.७ टक्क्यांवर पोहोचली. एकट्या कृषी क्षेत्रानेच काय ती एक टक्क्यावरून २.३ टक्क्यांवर झेप घेतली आणि केवळ त्या एकमेव क्षेत्राच्या चमकदार कामगिरीमुळे जीडीपी वाढला! वास्तविक गत दोन वर्षांपासून देशाला दुष्काळाने कवेत घेतल्यामुळे कृषी उत्पादनात बरीच घट आली असताना, कृषी क्षेत्राने चमकदार कामगिरी नोंदविणे पचनी पडण्यासारखे नाही आणि त्यामुळेच मग जीडीपी वृद्धी दराबाबत साशंकता निर्माण होते. देशाला वेगाने विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सरकारसाठी विकास झाल्याचे दाखविणे आवश्यक असले तरी, त्यासाठी आकडेवारीचा खेळ होत असेल तर ते चुकीचेच म्हणावे लागेल.