शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

गडकरींचे पुनश्‍च हरिओम

By admin | Updated: November 8, 2014 11:44 IST

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींशी संबंधित अनेक विषयांवर आता केंद्राची नजर राहणार आहे. यातून राज्याचा सामाजिकदृष्ट्या फायदा होईल आणि राजकीयदृष्ट्या संघर्षही.

- रघुनाथ पांडे
 
- दिल्ली दरबार
 
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींशी संबंधित अनेक विषयांवर आता केंद्राची नजर राहणार आहे. यातून राज्याचा सामाजिकदृष्ट्या फायदा होईल आणि राजकीयदृष्ट्या संघर्षही. राजकारणात समन्वय साधला गेला, तर महाराष्ट्राला अच्छे दिन आले, असेही म्हणता येईल! अलीकडच्या दोन घटनांकडे पाहिल्यास मला काय म्हणायचे आहे, ते कळेल. नवी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर 'फास्टटॅग' नावाने इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन (इटीसी) सुरू झाले आणि दिवाळखोरीत निघणार्‍या विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा जिल्हा सहकारी बँकांना वाचविण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज दिले. राजकीयदृष्ट्या लक्ष वेधणार्‍या या दोन्ही निर्णयांमागे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही समस्येचे निराकरण किंवा विषयाची तड लावण्यासाठी मागच्या सरकारमध्ये शरद पवार होते. आता ती जागा गडकरी यांनी घेतली आहे. म्हणूनच हे दोन्ही निर्णय महत्त्वाचे आहेत. 
महाराष्ट्रात टोल हा नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे. टोलवरून 'राज'कारण तापते, काही काळात तणावही निवळतो; पण प्रत्यक्षात टोलमुक्ती होण्याची शक्यता नाहीच. टोलला वगळून महामार्गांची निर्मिती अशक्य आहे, यावरच आता एकमत झाले आहे. भाजपा सरकारातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, जनतेची लूटमार करणारे व कंत्राटदारांच्या फायदय़ाचे टोल बंद करू, असे म्हटले खरे; पण राज्याच्या डोक्यावर असलेले महाकाय कर्ज, नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा पैसा, २६ हजार कोटींची महसुली तूट वगैरे नेहमीचे मुद्दे त्यांनीही रेटले; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा विषय सोडवावा लागेल. टोलबाबत केंद्राची भूमिका मात्र स्पष्ट आहे. टोलमुळे देशातील महामार्ग चकचकीत होतील व त्यांची देखभालही होईल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. 
नवी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर 'फास्टटॅग'बरोबरच एकूण २४ टोलप्लाझा आहेत. इटीसी प्रणालीमुळे वर्षाला बाराशे कोटींची इंधन बचत होणार आहे. पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत देशभरातील महामार्गांवर असलेल्या ३५0 टोलप्लाझांवर इटीसी लागू झाली, की इंधनावरील २७ हजार कोटींचा खर्च वाचेल. या २४ टोलप्लाझांवर इटीसी लेन ठरविण्यात आलेली आहे. वाहनाच्या विंडशिल्डवर रेडिओ फ्रीक्वेन्सी व्हेईकल आयडेंटिफिकेशन टॅग (आरएफआयईआय) लावण्यात आला आहे. लेनमध्ये आलेल्या वाहनांच्या टॅगवरील माहिती प्लाझावरील यंत्राने वाचली, की लगेच वाहनमालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम टोलकंपनीच्या खात्यात वळती होईल. वाहनाला टोलवर क्षणभर विश्रांतीचीही गरज नाही. इंडियन हायवेज मॅनेजमेंट लिमिटेड ही सरकारी कंपनी दोन खासगी बँकांच्या मदतीने ही यंत्रणा चालवीत आहे. 
अनेक वर्षे केंद्रात सत्तेत राहिलेल्या शरद पवारांची राज्यातील ओळख राष्ट्रीय नेते असली, तरी दिल्लीच्या राजकारण्यांमध्ये ते महाराष्ट्राचे व त्यातही पश्‍चिम महाराष्ट्रातील असल्याचे बोलले जाते. आता पवारांची दिल्लीतील जागा पूर्ण अंदाज घेत गडकरी काबीज करू लागले आहेत. आर्थिक बेशिस्तीमुळे तळास गेलेल्या विदर्भातील वर्धा, बुलडाणा व नागपूर या जिल्हा बँकांचा 'जीर्णोद्धार' गडकरींच्या पुढाकाराने व केंद्र सरकारच्या मदतीने होतो आहे. राज्य व नाबार्डचे साह्य असेल; पण मदतीचे सूत्र केंद्राने पक्की केले. सहकार वाचला पाहिजे, यासाठी गडकरींनी मागील दोन महिन्यांत अनेक बैठकी अर्थमंत्री अरुण जेटली व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केल्या. 
या बँका का खचल्या, हपापाचा माल गपापा कसा झाला, राज्यकर्ते किती जबाबदार आहेत, हे जगजाहीर आहे. मुद्दा विदर्भातील केवळ या तीनच बँकांचा नाही; तर बेशिस्तीमुळे गारद होणार्‍या अवघ्या राज्यातील सहकाराला उभारी देण्यासाठी गडकरींनी उचललेल्या पावलांचा आहे. राज्यातील जे सहकारधुरीण पूर्वी पवारांभोवती डेरा जमवत, ते आता गडकरींच्या आश्रयाला येताना दिसत आहेत. त्यांची नावे सांगितली तर भुवया उंचावतील. तात्पर्य, सहकारातून समृद्धीची जी चाल पूर्वी पवार खेळत, त्यापेक्षा अधिक चपळाईने गडकरी खेळू लागले आहेत..
 
(लेखक विशेष प्रतिनिधी, लोकमत समूह, नवी दिल्ली आहेत)