शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

‘पूर्ण’हास्य मावळले

By admin | Updated: March 5, 2016 03:23 IST

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा.

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा. अकराव्या लोकसभेचे सभापती पूर्णो अजिटोक संगमा हे याचे ठळक उदाहरण. मेघालयासारख्या दुर्गम भागात जनप्रतिनिधित्व करीत नऊ वेळा लोकसभेत दाखल होण्याचा आणि त्याच्या आगेमागे मेघालयाचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आणि केन्द्रात मंत्री अशी विविध पदे धारण करण्याचा मान त्यांच्या नावावर आजही रूजू आहे. नव्वदच्या दशकात स्थायी स्वरुपातील लोकसभा दिवास्वप्न वाटावे अशी चमत्कारिक स्थिती देशात निर्माण झालेली असताना संगमा यांना लोकसभेचे सभापतीपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली खरी पण उणेपुरे दोन वर्षांचाच काळ त्यांना मिळाला. परंतु तरीही त्यांची या अल्प काळातील कारकीर्दही संस्मरणीय ठरली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बलाबलात फारच थोडा फरक असतो तेव्हां सभागृह चालविणे अधिकच कठीण असते. पण संगमा यांनी ते करुन दाखविले, ते त्यांच्या मिठ्ठास वाणीच्या मदतीने. ते मूलत: काँग्रेस कार्यकर्ते. युवक काँग्रेसपासून त्यांचा काँग्रेस प्रवास सुरु झाला. दुर्गम भागातील एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून असेल वा अन्य कारणांनी असेल काँग्रेसनेदेखील त्यांना भरभरुन दिले. परंतु केन्द्रातील रालोआची याआधीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर आणि काँग्रेसला अन्य पक्षांसोबत आघाडी करुन का होईना सत्ता स्थापन करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील असे गृहीत धरुन काँग्रेसमधील जी मंडळी अस्वस्थ झाली होती, त्यांचे म्होरकेपण करणाऱ्या शरद पवार, आणि तारीक अन्वर यांच्यासोबत पूर्णो संगमाही होते. तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तिघा नेत्यांच्या मनात बहुधा त्यावेळी स्वत:च्या लोकप्रियतेविषयी अफाट कल्पना असाव्यात. या कल्पनेपायीच मग संगमा यांनी भाजपातर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणब मुखर्जी यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी पुढे रेटली. ही बाब शरद पवारांना रुचली नाही कारण काळाची पावले ओळखून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सावरुन धरण्यासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती. तितकी राजकीय चतुराई संंगमांपाशी नसावी. परिणामी पवारांनी संगमांना पक्षातून डच्चू दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संगमा पराभूत होणारच होते व तसे ते झालेदेखील. तेथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची गाडी उताराला लागली. काही काळ त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये एक फेरी मारुन नंतर स्वत:चा वेगळा पक्षदेखील काढून पाहिला, पण त्यांचे राजकीय पुनर्वसन काही होऊ शकले नाही. संपुआच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची कन्या अगाथा संगमा केन्द्रात राज्यमंत्री झाली व तितकेच समाधान पित्याला मिळू शकले. पण आता संगमा यांच्या निधनाने हे सारे इतिहासजमा झाले आहे.