शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

‘पूर्ण’हास्य मावळले

By admin | Updated: March 5, 2016 03:23 IST

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा.

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा. अकराव्या लोकसभेचे सभापती पूर्णो अजिटोक संगमा हे याचे ठळक उदाहरण. मेघालयासारख्या दुर्गम भागात जनप्रतिनिधित्व करीत नऊ वेळा लोकसभेत दाखल होण्याचा आणि त्याच्या आगेमागे मेघालयाचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आणि केन्द्रात मंत्री अशी विविध पदे धारण करण्याचा मान त्यांच्या नावावर आजही रूजू आहे. नव्वदच्या दशकात स्थायी स्वरुपातील लोकसभा दिवास्वप्न वाटावे अशी चमत्कारिक स्थिती देशात निर्माण झालेली असताना संगमा यांना लोकसभेचे सभापतीपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली खरी पण उणेपुरे दोन वर्षांचाच काळ त्यांना मिळाला. परंतु तरीही त्यांची या अल्प काळातील कारकीर्दही संस्मरणीय ठरली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बलाबलात फारच थोडा फरक असतो तेव्हां सभागृह चालविणे अधिकच कठीण असते. पण संगमा यांनी ते करुन दाखविले, ते त्यांच्या मिठ्ठास वाणीच्या मदतीने. ते मूलत: काँग्रेस कार्यकर्ते. युवक काँग्रेसपासून त्यांचा काँग्रेस प्रवास सुरु झाला. दुर्गम भागातील एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून असेल वा अन्य कारणांनी असेल काँग्रेसनेदेखील त्यांना भरभरुन दिले. परंतु केन्द्रातील रालोआची याआधीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर आणि काँग्रेसला अन्य पक्षांसोबत आघाडी करुन का होईना सत्ता स्थापन करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील असे गृहीत धरुन काँग्रेसमधील जी मंडळी अस्वस्थ झाली होती, त्यांचे म्होरकेपण करणाऱ्या शरद पवार, आणि तारीक अन्वर यांच्यासोबत पूर्णो संगमाही होते. तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तिघा नेत्यांच्या मनात बहुधा त्यावेळी स्वत:च्या लोकप्रियतेविषयी अफाट कल्पना असाव्यात. या कल्पनेपायीच मग संगमा यांनी भाजपातर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणब मुखर्जी यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी पुढे रेटली. ही बाब शरद पवारांना रुचली नाही कारण काळाची पावले ओळखून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सावरुन धरण्यासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती. तितकी राजकीय चतुराई संंगमांपाशी नसावी. परिणामी पवारांनी संगमांना पक्षातून डच्चू दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संगमा पराभूत होणारच होते व तसे ते झालेदेखील. तेथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची गाडी उताराला लागली. काही काळ त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये एक फेरी मारुन नंतर स्वत:चा वेगळा पक्षदेखील काढून पाहिला, पण त्यांचे राजकीय पुनर्वसन काही होऊ शकले नाही. संपुआच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची कन्या अगाथा संगमा केन्द्रात राज्यमंत्री झाली व तितकेच समाधान पित्याला मिळू शकले. पण आता संगमा यांच्या निधनाने हे सारे इतिहासजमा झाले आहे.