शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चार हायकोर्टांची धुरा प्रथमच महिलांकडे!

By admin | Updated: April 17, 2017 01:03 IST

गेल्या आठवड्यातील ६ एप्रिल हा दिवस भारतीय न्यायसंस्थेत महिलाशक्तीचा दिवस म्हणून नोंदविला जाईल. मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या न्या. इंदिरा बॅनर्जी यांची त्या

गेल्या आठवड्यातील ६ एप्रिल हा दिवस भारतीय न्यायसंस्थेत महिलाशक्तीचा दिवस म्हणून नोंदविला जाईल. मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या न्या. इंदिरा बॅनर्जी यांची त्या दिवशी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि देशातील २४ पैकी चार प्रमुख उच्च न्यायालयांच्या प्रमुखपदी प्रथमच महिला स्थानापन्न झाल्या. एकाच वेळी चार राज्यांमध्ये महिला मुख्य न्यायाधीश होणे हे त्या दिवसाचे वेगळेपण होते. मुंबईत न्या. डॉ. मंजुळा चेल्लूर, कोलकात्यात न्या. निशिता म्हात्रे आणि दिल्लीत न्या. गोरला रोहिणी या मुख्य न्यायाधीश होत्याच. त्यांच्यासोबत मद्रासमध्ये न्या. इंदिरा बॅनर्जी आल्या आणि न्यायव्यवस्थेतील ‘मिळून चौघीजणीं’चा गौरवशाली अध्याय लिहिला गेला. दिल्लीच्या मुख्य न्यायाधीश न्या. रोहिणी यानंतर आठच दिवसांनी १४ एप्रिल रोजी निवृत्त झाल्या. पण त्यांच्याजागी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. गीता मित्तल यांची नेमणूक झाली आणि महिला मुख्य न्यायाधीशांची चार ही संख्या कायम राहिली. न्या. रोहिणी व न्या. चेल्लूर यांची सर्वोच्च न्यायालयावर बढती होईल, असे बोलले जात होते. परंतु १७ फेब्रुवारी रोजी अन्य पाच न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयावर नेमले गेले व या दोघी राज्यांमध्येच मुख्य न्यायाधीश राहिल्या. उच्च आणि सर्वोच्च न्यायालय या वरिष्ठ न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीशांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे जेमतेम १० टक्के असूनही त्यापैकी चौघींनी मुख्य न्यायाधीशपदी विराजमान व्हावे हे नक्कीच भूषणावह आहे. २४ उच्च न्यायालयांमधील सुमारे एक हजार न्यायाधीशांपैकी फक्त ६९ महिला आहेत. यातही मुंबईचा १२ व दिल्लीचा ११ हा महिला न्यायाधीशांचा आकडा सर्वाधिक आहे. आठ उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही यावरून वरिष्ठ न्यायव्यवस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व किती कमी आहे, याची कल्पना यावी. सर्वोच्च न्यायालयाचा विचार केला तर राज्यघटना लागू झाल्यानंतर तब्बल ३९ वर्षांनी न्या. फितिमा बिवी यांच्या रूपाने त्या न्यायालयास पहिल्या महिला न्यायाधीश मिळाल्या. त्यानंतर न्या. सुजाता मनोहर, न्या. रुमा पॉल, न्या. ग्यान सुधा मिश्रा आणि न्या. रंजना देसाई या आणखी चौघींना सर्वोच्च न्यायपीठावर बसण्याचे भाग्य लाभले. सध्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण २८ न्यायाधीशांमध्ये न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. संख्या कमी असूनही ज्या महिला न्यायाधीशांना संधी मिळाली त्यांनी त्या पदाची शान वाढेल, असेच काम केले. त्यामुळे महिला न्यायाधीशांची संख्या कमी असण्यात त्यांच्यातील काही उणेपण हे कारण नाही हे नक्कीच. अन्य सरकारी पदांप्रमाणे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमणुकांमध्ये जातीवर आधारित अथवा महिलांसाठी असे कोणतेही आरक्षण नाही. तरीही न्यायाधीश निवडताना महिलांचाही अवश्य विचार करावा, असे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला अनौपचारिकपणे सुचवित असते. इतर सर्व क्षेत्रे महिला पुरुषांच्या बरोबरीने काबिज करत असताना न्यायव्यवस्थेत महिलांचे प्रमाण एवढे अल्प असावे हे पुरोगामी मनाला नक्कीच पटणारे नाही. पण हे प्रमाण अल्पावधीत वाढू शकेल, असेही नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कनिष्ठ न्यायाधीशांमधून व वकिलांमधून करण्यात येते. निवडीचे हे जे दोन स्रोत आहेत तेथेच महिला तुलनेने कमी असल्याने निवड होणाऱ्या न्यायाधीशांमध्ये महिला कमी असणे स्वाभाविकही आहे. हल्ली कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करणाऱ्या व कनिष्ठ न्यायालयांमध्ये दंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत आहे. परंतु वाढत आहे म्हणजे पूर्वी मुली अभावानेच या करिअरकडे वळत त्या आता बऱ्यापैकी संख्येने जात आहेत, एवढेच. महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे खटले महिला न्यायाधीश अधिक संवेदनशीलतेने चालवू शकतात म्हणून ते शक्यतो त्यांच्याकडे देण्याचे गेली काही वर्षे ठरले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात असे करायला निदान महिला न्यायाधीश तरी पुरेशा संख्येने मिळू शकतात. इतर अनेक राज्यांमध्ये तशी स्थिती नाही. महिला कमी संख्येने न्यायाधीश होण्यात पुरुषी वर्चस्वाचा भाग फारसा असू शकतो, असे मला वाटत नाही. - अजित गोगटे