शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

नागरिकीकरणाच्या गिलोटिनखाली शेतकरी

By admin | Updated: June 5, 2017 03:35 IST

शेतमालाला हमीभाव मिळावा, सातबारा कोरा करावा, शेतमाल ठेवण्यासाठी गोदामांची संख्या वाढवावी

नारायण जाधवशेतमालाला हमीभाव मिळावा, सातबारा कोरा करावा, शेतमाल ठेवण्यासाठी गोदामांची संख्या वाढवावी, अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कुठेच दिसला नाही. कारण, राज्यातील सर्वाधिक औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण ठाणे जिल्ह्यात असून आंदोलन करेल, असा मोठा शेतकरीच या जिल्ह्यात शिल्लक नाही. जो शेतकरी आहे, तो अल्पभूधारक असून पावसाळ्यात केवळ भाताचे उत्पन्न घेणारा आहे. यातील जे थोडेथोडके शेतकरी भाजीपाला वा अन्य पीक घेतात, त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे तो शेती सोडून जिल्ह्यातील औद्योगिक कारखान्यांत कामगार, बिल्डरांच्या बांधकाम साइटवरील मजूर किंवा वर्षातील पावसाळा वगळता उर्वरित दिवस वीटभट्ट्यांमध्ये मजुरी करण्यात, शहरातील धनिकांकडे घरगडी, महापालिकांमधील सफाई कामगार होण्यात धन्यता मानत आहे. जिल्ह्याला खमके शेतकरी नेतृत्व नसल्याने येथील शेतकऱ्यांची ही अवस्था झाल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे ‘विकासाचे बळी’ कशाला म्हणतात, ते ठाण्यातील शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येते.राज्यातील औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट आणि नवी मुंबईच्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात रोवली गेली. शेतकऱ्यांची पिकती शेतजमीन घेऊन औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यांच्या मालकांनी रोजगार दिला. यामुळे नागरिकीकरण वाढून एक नव्हे, तर तब्बल सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती ठाणे जिल्ह्यात तयार झाल्या आहेत. वागळे इस्टेटसह ठाणे-बेलापूर पट्टा, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, आटगाव येथे औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. तेथे लागणारा कच्चा माल आणि उत्पादित होणारा औद्योगिक माल ठेवण्यासाठी भिवंडीत गोदामांचे जाळे उभे राहिले. कालांतराने शहरीकरण वाढीस लागल्याने जमिनीला सोन्याची किंमत आली. यामुळे कारखानदारांनी रोजगार दिलेल्या या कामगारांस तो निवृत्त होण्याआधीच आपला उद्योग तोट्याचे गेल्याचे भासवून त्यास सक्तीने सेवानिवृत्त होण्यास भाग पाडले गेले. आधी शासनाने कवडीमोल किंमत देऊन त्याच्या शेतजमिनीवर उद्योग आणले. नवी मुंबईसारखे शहर वसवले. नंतर, त्याचा रोजगारही हिरावून घेतला. कामगारांचा रोजगार हिरावून घेतल्यावर कारखान्यांच्या मालकांनी कवडीमोल भावाने घेतलेल्या याच जमिनी पुन्हा बिल्डरांच्या घशात घालून रग्गड कमाई केली. यात उद्ध्वस्त झाला शेतकरी आणि त्याचे कुटुंब.आज शासनाच्या बळीराजाच्या बाबतीतल्या याच नाकर्त्या धोरणामुळे ठाणे जिल्ह्यातील ८२ टक्के म्हणजे एक लाख आठ हजार ८१२ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. नागरिकीकरणाच्या रेट्यात शेतीखालची जमीन झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात केवळ ७७ हजार ६४४ हेक्टर शेती असून त्यावर एक लाख ३२ हजार शेतकऱ्यांची मालकी आहे.यापैकी एक लाख आठ हजार ८१२ शेतकरी अल्पभूधारक आहेत. केवळ १८ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. यात ठाणे, उल्हासनगर, कल्याण आणि भिवंडी, अंबरनाथ-बदलापूरसारख्या तालुक्यातील शेतजमिनी संपण्याच्या मार्गावर आहे. मुरबाड, शहापुरातच आता बऱ्यापैकी शेतजमीन शिल्लक आहे. त्यात, वन विभागाचा मोठा अडसर असल्याने ती बचावली आहे. नाहीतर, तिच्यावरही कधीच औद्योगिकीकरण, नागरिकीकरणाच्या नावाखाली अतिक्रमण केले असते. परंतु, त्यावर प्रशासकीय अधिकारी, धनदांडगे आणि राज्यकर्त्यांनी कायद्यातील पळवाटा काढून काही ठिकाणी धाब्यावर बसवून आपली फार्महाउस उभारली आहेत.मात्र, आता तर राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने त्यांच्या वक्रदृष्टीतून ठाणे जिल्ह्यातील हा गरीब शेतकरी सुटेल तरी कसा. आधीच अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्याची आहे, ती थोडीफार जमीन आता कल्याण-भिवंडी मेट्रो, मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग, जेएनपीटी-दिल्ली डेडिकेटेड फ्रेन्टिअर कॉरिडोर, मुंबई-बडोदा महामार्ग, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे आमिष दाखवून हडप करण्याचे रीतसर प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, मुंबईसह जिल्ह्यातील सहा महापालिकांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी धरणे बांधण्यासाठीही या शेतकऱ्यांची जमीनच नव्हे, गावपाडेही पोलीस बळाचा वापर करून गिळंकृत करण्याचे पुरेपूर प्रयत्न मायबाप शासनाने सुरू केले असून शाई, काळू नद्यांवरील धरणांसह मुंबई-नागपूर महामार्गासाठीच्या जमीन संपादनाच्या धोरणावरून हेच दिसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच सरकारसोबत असल्याने न्याय मागायचा कोणाकडे, या पेचात जिल्ह्यातील शेतकरी उघडा पडला आहे. त्यातच, भक्कम नेतृत्व नसल्याने आणि स्वत:ही सधन नसल्याने ‘राजाने मारले, पावसाने झोडपले, तर दाद मागायची कुणाकडे’ अशीच त्यांची अवस्था झाली आहे.राज्यातील शेतकरी कर्जमाफी, हमीभाव याकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना ठाणे जिल्ह्यात आंदोलनाचा ब्रदेखील निघाला नाही. याचे कारण या जिल्ह्यातील शेतकरी नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत संपला. जो काही शिल्लक आहे, तो अल्पभूधारक आहे. केवळ स्वत:च्या गरजेपुरती भातशेती करण्याइतकाच या अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतीशी संबंध आहे. एकेकाळी गिलोटिनखाली माणसाची मान ठेवून त्याचा शिरच्छेद केला जात असे. जिल्ह्यातील नागरिकीकरणाच्या गिलोटिनखाली शेतकऱ्याचाच शिरच्छेद झाला.