शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

मराठा मोर्चातील शेतकरी

By admin | Updated: September 21, 2016 07:58 IST

एकट्या मराठा समाजातील कोटीवर लोक मराठवाड्यात रस्त्यावर येत असतील

एकट्या मराठा समाजातील कोटीवर लोक मराठवाड्यात रस्त्यावर येत असतील अन् त्यातील ६५ टक्के म्हणजेच ६५ लाख शेतकरी असतील तर त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला, कृती करायला कोणत्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्याची गरज आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात प्रत्येक घटक सहभागी आहे. त्यात शेतकरी वर्गही लाखोंच्या संख्येने बाहेर पडला आहे. या मूक मोर्चा आंदोलनाची सुरुवात औरंगाबादमधून झाली. त्यानंतर आजतागायत मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये मोर्चे झाले. नांदेडमध्ये २५ लाखांवर समाजबांधव रस्त्यावर उतरले. इतर जिल्ह्यांमध्येही आठ-दहा लाखांवर आकडे सांगितले गेले. साधारणत: एकट्या मराठवाडा विभागात महिनाभराच्या कालखंडात सुमारे एक कोटींवर लोक रस्त्यावर उतरले. शांततेने, शिस्तीने, नियोजनबद्धपणे निघालेल्या या मोर्चांना नेता नव्हता. व्यक्तिगत नावे वा संघटनांचा श्रेयवाद कुठेही नव्हता. त्यामुळे एकजूट दिसली. संताप आहे, उद्रेक आहे; पण त्याला नि:शब्द हुंकाराची जोड दिल्यामुळे सामाजिक सौहार्द टिकून आहे. कोपर्डी अत्याचार, मराठा आरक्षण, महाराष्ट्रभूषण पुरस्कार, अँट्रॉसिटीसंदर्भाने मोर्चेकर्‍यांनी मागण्या मांडल्या आहेत. एकंदर सामाजिक प्रश्नाबरोबर शिक्षण, रोजगार, शेतीचा प्रश्नही गंभीर आहे. शेती पिकत नाही. पिकले तर विकत नाही. विकले तर भाव मिळत नाही. जमिनीचे अगणित तुकडे पडले. समाजातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक बनले. अलीकडच्या काळात संघटनांच्या माध्यमातून मराठा समाजाने परिवर्तनाची कास अधिक मजबूत केली. अनिष्ट चालीरीतींना ठोकर मारली. समाज शिक्षणाच्या वाटेने चालत आहे. स्पर्धेत उतरत आहे. तिथे पुन्हा मराठा समाजाच्या संख्येच्या तुलनेत अनेकांना संधी मिळू शकली नाही. शासकीय नोकर्‍या उरल्या नाहीत. त्यातूनच आरक्षणाची मागणी पुढे आली. शेवटी लढाई रस्त्यावर आली. लाखोंचे मोर्चे निघाले. सनदशीर मार्गाने, शांततेने निघत असलेले मोर्चे शक्तिप्रदर्शन नव्हे तर मूक आक्रंदन आहे, हे सत्ताधार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील एकूण मोर्चांच्या तुलनेत मराठवाड्यात सर्वाधिक लोक रस्त्यावर का उतरले याचे उत्तर इथल्या सामाजिक परिस्थितीत तसेच शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रश्नांशी निगडित आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाच्या वेदनेने घायाळ झालेला शेतकरी विपन्नावस्थेत आहे. सिंचन, पाण्याच्या प्रश्नाकडे सरकार डोळेझाक करते. डिसेंबर २0१४ च्या हिवाळी अधिवेशनात येत्या पाच वर्षांत कायमस्वरूपी दुष्काळ निर्मूलनाची घोषणा करण्यात आली. एका वर्षात पाच हजार गावे दुष्काळमुक्त केली जातील, असे जानेवारीत जाहीर केले. त्यात मराठवाड्यातील किती गावे आहेत, हा प्रश्न आहे. राज्यातील कोरडवाहू शेती अभियान कोठे सुरू आहे, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. त्याच वेळी एकट्या मराठा समाजातील कोटीवर लोक मराठवाड्यात रस्त्यावर येत असतील अन् त्यातील ६५ टक्के म्हणजेच ६५ लाख शेतकरी असतील तर त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला, कृती करायला कोणत्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्याची गरज आहे.वर्षाला हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मोर्चाच्या निमित्ताने गावागावांतील अल्पभूधारक, बेरोजगार तरुण लाखोंच्या संख्येने रस्त्यावर आला. मोर्चेकर्‍यांचे अन्य प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत; परंतु जिथे रोजचे जगणेही मुश्कील झाले त्या शेतीच्या दुरवस्थेवर तरी बोलघेवडेपणा करू नका, हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, हमीभाव देऊन माल खरेदी करणारी केंद्रे सुरू झाली पाहिजेत. मराठवाड्यातील शेतीला पाणी, कोरडवाहू शेतकर्‍यांना भक्कम नुकसानभरपाई, विमा, शेती जोडव्यवसायाची साधने उपलब्ध करून उभारण्याचे बळ दिले पाहिजे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाशी सरकारने करार केला आहे, तो कागदावर न राहता मराठवाड्यात धवलक्रांती घेऊन आला पाहिजे. -धर्मराज हल्लाळे नांदेड