शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

विश्वास आणि श्रद्धा

By admin | Updated: April 20, 2017 01:29 IST

सामान्य माणूस लौकिक जीवन जगत असतो. असामान्य माणूस अलौकिक जीवन जगत असतो. पण असामान्य असूनही जो सामान्यांसारखेच जीवन जगतो तो मात्र

डॉ. रामचंद्र देखणे

सामान्य माणूस लौकिक जीवन जगत असतो. असामान्य माणूस अलौकिक जीवन जगत असतो. पण असामान्य असूनही जो सामान्यांसारखेच जीवन जगतो तो मात्र लौकिकात राहूनही पारलौकिकाची अनुभूती देत असतो आणि घेत असतो, मानवी जीवनातील हे उत्तुंग पारलौकिकत्व म्हणजे संत. ज्ञानदेव म्हणतात...ते परब्रह्मचि मनुष्यरूपे।ओळख तू।।ते मनुष्यरूपातील परब्रह्मच आहे तर तुकोबाराय म्हणतात, ‘तुका म्हणे सांगो किती।तोचि भगवंताची मूर्ती।’संत हीच भगवंताची सगुण मूर्ती आहे. अशा संतांवर माझा दृढ विश्वास आहे. कारण माझे सर्वस्वी कल्याण तेच करणार आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. तुकोबारायांच्या संतपर प्रकरणातील एक अभंग वारकऱ्यांच्या परिपाठातला आहे.संतांचिया पाया हा माझा विश्वास।सर्व भावे दास झालो त्यांचा।संतांवरील या विश्वासामुळे मी त्यांचा सर्वभावे दास झालो आहे. मानवी भाव जीवनाच्या उत्तुंगतेच्या मंदिराचा ‘विश्वास’ हा पाया असतो तर भक्ती हा कळस. दृढतेचे चार टप्पे आहेत. पहिला विश्वास, मग निष्ठा. त्यानंतर श्रद्धा आणि नंतर भक्ती. या चारही अवस्था एकमेकांशी जोडल्या आहेत. विश्वास दृढ झाला की, निष्ठा येते. निष्ठा दृढ झाली की श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की भक्ती आणि भक्तीही दृढ झाली की आत्मनिष्ठा किंवा समर्पिता. या समर्पिता अवस्थेत तो परमेश्वराशी इतका दृढ होतो की, स्वत:लाही विसरतो. गोकुळात वावरणाऱ्या गौळणी मथुरेच्या बाजाराला निघाल्या. डोक्यावर दुधाचे माठ घेतले. पण मनात कृष्ण, डोळ्यात कृष्ण, वाणीत कृष्ण, सारे कृष्णमय झालेले. डोक्यावरच्या माठात दहीदूध आहे हे विसरल्या आणि म्हणू लागल्या, ‘‘दुडीवर दुडी गौळणी साते निघाली।गौळण गोरस म्हणो विसरली।गोविंदु घ्या कोणी दामोदर घ्या रे।।गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या.’’स्वत:ला विसरण्यात खूप आनंद आहे, पण परमात्म्याच्या ठायी स्वत:ला विसरण्यात परमानंद आहे. ही समर्पिता केवढी उच्च पातळीवरची म्हणावी? प्रसिद्ध शहनाईवादक भारतरत्न पंडित बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईने संगीत विश्वात नादब्रह्म अवतरले. तुमच्या शहनाईतून इतके सुंदर स्वर कसे बाहेर पडतात, असे त्यांना एकदा विचारले. पंडित बिस्मिल्ला खाँ हे वाराणशीचे. दररोज काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शहनाईवादन करायचे. त्यांनी उत्तर दिले, ‘शहनाई बजाते बजाते एक दिन मुझे ऐसी अनुभूती मिली की बाबाजीने (विश्वनाथाने) मेरे शहनाईमें फुँक दी है। काशी विश्वनाथावर केवढी मोठी श्रद्धा. त्या श्रद्धेच्या बळावर माणूस लौकिकातून अलौकिकात जातो. ही डोळस श्रद्धा मानवी जीवनातील दृढतेचा पाया भक्कम करते आणि या मानवी जीवनात भक्ती सौंदर्याचे मंदिर उभे राहते.