शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

विस्तार : मंत्रिमंडळाचा आणि आव्हानांचाही

By admin | Updated: July 11, 2016 03:59 IST

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून, ३९ मंत्र्यांच्या भरभक्कम टीमसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला सामोरे जात आहेत.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून, ३९ मंत्र्यांच्या भरभक्कम टीमसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला सामोरे जात आहेत. या मंत्रिमंडळात तरुणांचा भरणा आहे. तरुण नेतृत्व उत्साही असते पण ते उत्साहाची सीमा ओलांडून अतिउत्साहात गेले की चुका घडतात. सरकारचे काम धडाक्याने करण्यास त्यांचे योगदान अपेक्षित असून उत्साहाच्या भरात अपरिपक्वतेतून होणाऱ्या चुकांचे समर्थन कोणीही करणार नाही. नव्या मंत्र्यांपैकी फार थोडे असे आहेत की जे पहिल्यांदा निवडून आले आहेत. महादेव जानकर, सदाभाऊ खोत पहिल्यांदाच विधान परिषदेत आले असले तरी त्यांना सार्वजनिक जीवनाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नवखेपणाची सबब त्यांनाही सांगता येणार नाही. भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू अशी की, मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रा.राम शिंदे ही या उत्साही मंत्र्यांची फौज आहे व भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट अशा अनुभवी नेत्यांची त्यांना साथ आहे. सत्तेने यांच्यापैकी कोणाला बिघडविले नाही तर राज्याच्या हिताचे अनेक निर्णय होऊ शकतील. सत्ता अनेकांना बिघडवते आणि त्यातून संघर्षाला सुरुवात होते. यापूर्वीचे युती आणि आघाडीचे सरकारही त्याला अपवाद नव्हते. आधीपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचे आव्हान या सगळ्यांसमोर आहे. आपला नेता मंत्री झाला म्हणजे चेलेचपाटे, दलाल आणि कंत्राटदार एकदम सक्रीय होऊन थेट मंत्र्यांच्या दालनाचा ताबा घेतात. तिथे त्यांची उठबैस वाढते मग ते मंत्र्यांच्या पीए, पीएसशी सूत जुळवून कामे करवून आणतात. काही जुन्या मंत्र्यांकडे असे काही लोक अजूनही घिरट्या घालत असतात. नवीन मंत्र्यांनी अशांना आवरले तर ते त्यांच्या राजकीय हिताचे राहील. मराठवाड्याचे भाजपांतर्गत राजकारण अनेक वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती फिरले. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांपलीकडे भाजपा गेली नाही. आज शिवसेनेने मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष मराठवाड्यात केंद्रीत केले आहे. मुंडेंचे अकाली निधन आणि शिवसेनेचा धडाका या पार्श्वभूमीवर, मराठवाड्यात भाजपा वाढवायची तर काय काय करावे लागेल याचा विचार भाजपात प्रामुख्याने होत असून संभाजी पाटील निलंगेकर यांचे मंत्री होणे हा त्याचाच एक भाग आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणाची पुढील दिशा ओळखून निलंगेकर, रावसाहेब दानवे यांच्याशी जुळवून घेतले नाही तर त्या अधिक एकट्या पडतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठा संदेश असा दिला की ते स्वत: भाजपात गटातटाचे राजकारण करणार नाहीत. सुभाष देशमुख, संभाजी पाटील, मदन येरावार या कट्टर गडकरी समर्थकांना मंत्रिपद देणे ही त्यांची अपरिहार्यता होती असे मानले तरी गटबाजी पलीकडे भाजपा आणि सरकारचा विचार करणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा या निमित्ताने उजळली आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदाच्या प्रवासात फडणवीस स्वत:चा गट निर्माण करण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. तो त्यांचा स्वभावदेखील नाही. अमूक कोणी गटबाजी करीत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केलीच तर गोबऱ्या गालाने स्मित करण्यापलीकडे ते फारसा प्रतिसादही देत नाहीत. ते स्वत: मुंडे गटाचे असून गडकरी विरोधक आहेत अशी एक प्रतिमा निर्माण झाली होती. आता मुंडे नसताना आणि गडकरी हे अत्यंत प्रभावी झालेले असताना जुन्याच प्रतिमेत राहणे राजकीयदृष्टया सोईचे नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असणार. त्यामुळेदेखील गटनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक बनण्यावर त्यांनी भर दिला आहे. परवाचा विस्तार याचीच प्रचिती देणारा होता. सर्वमान्य असा अटलबिहारी वाजपेयींनंतर दुसरा नेता भाजपामध्ये दिसत नाही. ही पोकळी भरून काढण्याची वाटचाल फडणवीस यांनी सुरू केली आहे. फडणवीस हे ‘वाजपेयी इन मेकींग’ आहेत, असे आज कोणी म्हटले तर त्यांची जरा जास्तच प्रशंसा केल्याची टीका होऊ शकते पण उद्याचे वास्तव तेच असेल.- यदू जोशी