शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार : मंत्रिमंडळाचा आणि आव्हानांचाही

By admin | Updated: July 11, 2016 03:59 IST

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून, ३९ मंत्र्यांच्या भरभक्कम टीमसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला सामोरे जात आहेत.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून, ३९ मंत्र्यांच्या भरभक्कम टीमसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला सामोरे जात आहेत. या मंत्रिमंडळात तरुणांचा भरणा आहे. तरुण नेतृत्व उत्साही असते पण ते उत्साहाची सीमा ओलांडून अतिउत्साहात गेले की चुका घडतात. सरकारचे काम धडाक्याने करण्यास त्यांचे योगदान अपेक्षित असून उत्साहाच्या भरात अपरिपक्वतेतून होणाऱ्या चुकांचे समर्थन कोणीही करणार नाही. नव्या मंत्र्यांपैकी फार थोडे असे आहेत की जे पहिल्यांदा निवडून आले आहेत. महादेव जानकर, सदाभाऊ खोत पहिल्यांदाच विधान परिषदेत आले असले तरी त्यांना सार्वजनिक जीवनाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नवखेपणाची सबब त्यांनाही सांगता येणार नाही. भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू अशी की, मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रा.राम शिंदे ही या उत्साही मंत्र्यांची फौज आहे व भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट अशा अनुभवी नेत्यांची त्यांना साथ आहे. सत्तेने यांच्यापैकी कोणाला बिघडविले नाही तर राज्याच्या हिताचे अनेक निर्णय होऊ शकतील. सत्ता अनेकांना बिघडवते आणि त्यातून संघर्षाला सुरुवात होते. यापूर्वीचे युती आणि आघाडीचे सरकारही त्याला अपवाद नव्हते. आधीपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचे आव्हान या सगळ्यांसमोर आहे. आपला नेता मंत्री झाला म्हणजे चेलेचपाटे, दलाल आणि कंत्राटदार एकदम सक्रीय होऊन थेट मंत्र्यांच्या दालनाचा ताबा घेतात. तिथे त्यांची उठबैस वाढते मग ते मंत्र्यांच्या पीए, पीएसशी सूत जुळवून कामे करवून आणतात. काही जुन्या मंत्र्यांकडे असे काही लोक अजूनही घिरट्या घालत असतात. नवीन मंत्र्यांनी अशांना आवरले तर ते त्यांच्या राजकीय हिताचे राहील. मराठवाड्याचे भाजपांतर्गत राजकारण अनेक वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याभोवती फिरले. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांपलीकडे भाजपा गेली नाही. आज शिवसेनेने मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष मराठवाड्यात केंद्रीत केले आहे. मुंडेंचे अकाली निधन आणि शिवसेनेचा धडाका या पार्श्वभूमीवर, मराठवाड्यात भाजपा वाढवायची तर काय काय करावे लागेल याचा विचार भाजपात प्रामुख्याने होत असून संभाजी पाटील निलंगेकर यांचे मंत्री होणे हा त्याचाच एक भाग आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणाची पुढील दिशा ओळखून निलंगेकर, रावसाहेब दानवे यांच्याशी जुळवून घेतले नाही तर त्या अधिक एकट्या पडतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठा संदेश असा दिला की ते स्वत: भाजपात गटातटाचे राजकारण करणार नाहीत. सुभाष देशमुख, संभाजी पाटील, मदन येरावार या कट्टर गडकरी समर्थकांना मंत्रिपद देणे ही त्यांची अपरिहार्यता होती असे मानले तरी गटबाजी पलीकडे भाजपा आणि सरकारचा विचार करणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा या निमित्ताने उजळली आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदाच्या प्रवासात फडणवीस स्वत:चा गट निर्माण करण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. तो त्यांचा स्वभावदेखील नाही. अमूक कोणी गटबाजी करीत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केलीच तर गोबऱ्या गालाने स्मित करण्यापलीकडे ते फारसा प्रतिसादही देत नाहीत. ते स्वत: मुंडे गटाचे असून गडकरी विरोधक आहेत अशी एक प्रतिमा निर्माण झाली होती. आता मुंडे नसताना आणि गडकरी हे अत्यंत प्रभावी झालेले असताना जुन्याच प्रतिमेत राहणे राजकीयदृष्टया सोईचे नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असणार. त्यामुळेदेखील गटनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक बनण्यावर त्यांनी भर दिला आहे. परवाचा विस्तार याचीच प्रचिती देणारा होता. सर्वमान्य असा अटलबिहारी वाजपेयींनंतर दुसरा नेता भाजपामध्ये दिसत नाही. ही पोकळी भरून काढण्याची वाटचाल फडणवीस यांनी सुरू केली आहे. फडणवीस हे ‘वाजपेयी इन मेकींग’ आहेत, असे आज कोणी म्हटले तर त्यांची जरा जास्तच प्रशंसा केल्याची टीका होऊ शकते पण उद्याचे वास्तव तेच असेल.- यदू जोशी