शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

गतिमानतेची अपेक्षा

By admin | Updated: May 5, 2016 03:19 IST

आदिवासींसाठी म्हणून केल्या जाणाऱ्या बांधकामांकरिता या विभागांतर्गतच स्वतंत्र व्यवस्थापन कक्ष स्थापण्याचा निर्णय म्हणजे बांधकाम खात्याच्या दप्तर दिरंगाईला चपराकच म्हणता यावी.

आदिवासींसाठी म्हणून केल्या जाणाऱ्या बांधकामांकरिता या विभागांतर्गतच स्वतंत्र व्यवस्थापन कक्ष स्थापण्याचा निर्णय म्हणजे बांधकाम खात्याच्या दप्तर दिरंगाईला चपराकच म्हणता यावी. कारण आदिवासींसाठी घरकुले बांधण्याचा विषय असो, की आश्रमशाळा वा वसतिगृहे उभारण्याचा, त्याकरिताचे नियंत्रण-नियोजन आतापर्यंत बांधकाम खात्याकडे रहात आले आहे. त्यामुळे या कामांना होणाऱ्या विलंबासाठी बांधकाम खात्याकडे बोट दाखवून आदिवासी विभागाला मोकळे होता येई. बांधकाम खात्याच्या प्राधान्यक्रमावर अन्य कामे रहात असल्याने त्यांच्याकडूनही आदिवासी विकासच्या कामांकडे काहीसे दुर्लक्षच होत असल्याच्या तक्रारी राज्यात सर्वत्र केल्या जात असतात. शिवाय दोन विभागांशी संबंधित कामे असल्याने त्यात हद्दीचा तसेच अधिकाराचा प्रश्न तर उपस्थित होत असतोच, शिवाय जबाबदारी निश्चितीतही अडचणी येत असतात. विलंबाने होणाऱ्या कामांच्या खर्चात होणारी वाढ हादेखील कळीचा मुद्दा ठरून त्यासंबंधीच्या कागदोपत्री पूर्ततेत अनेक दिवस निघून जातात. कामकाजाच्या दृष्टीने होणारा हा दुभंग टाळण्याच्या दृष्टीनेच राज्यात आघाडी सरकार असताना आदिवासी खात्यांतर्गत स्वतंत्र बांधकाम विभाग स्थापन करण्याचा विचार पुढे आला होता. विद्यमान सरकारने त्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केले असून, त्यामुळे आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे व घरकुलांसारख्या बांधकामांना होणारा विलंब टळून कामात गतिमानता येणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभाग सचिवांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सदरचा व्यवस्थापन कक्ष कार्यरत राहणार असल्याने त्यात जबाबदारीच्या टोलवाटोलवीला फारशी संधी उरणार नाही. आज अशी अनेक कामे प्रस्तावित असूनही, केवळ बांधकाम विभागाला वेळ नसल्याने किंवा हाती दुसरी मोठी कामे असल्याने तुलनेने कमी खर्चाच्या कामांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. परिणामी निधी मंजूर असूनही बांधकामे पूर्णत्वास गेलेली नसल्याने अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांना भाड्याच्या इमारतींमध्ये किंवा झाडाखाली बसून ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. नवीन निर्णयामुळे अशी रेंगाळलेली सर्वच कामे मार्गी लागून त्या कामात गतिमानता येणे अपेक्षित आहे. कारण आता यातील विलंबासाठी बांधकाम खात्याला दोष देण्याची सोय उरलेली नाही.