शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

साऱ्यांचीच प्रतिष्ठा पणास

By admin | Updated: October 9, 2015 04:02 IST

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. भाजपा-शिवसेनेकडे सत्ता आली आहे. संपत्तीही येत आहे. त्यामुळे बळ मिळाले आहे. असा हा चौरंगी समान सामना आहे.

-  वसंत भोसलेकोल्हापूर महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. भाजपा-शिवसेनेकडे सत्ता आली आहे. संपत्तीही येत आहे. त्यामुळे बळ मिळाले आहे. असा हा चौरंगी समान सामना आहे.राज्यातील कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिकांची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. परंतु पितृपंधरवडा संपताच शेवटच्या दिवशी (मंगळवारी) अर्ज भरण्यासाठी झुंबड उडेल. कोल्हापूर महापालिकेची यावेळची निवडणूक खूपच वैशिष्ट्यपूर्ण व सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची राहणार असून पक्षांतर्गंत वादानेही ती गाजणार आहे. मावळत्या महापालिकेत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता (३३ सदस्य). त्याचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील करीत होते. त्याखालोखाल राष्ट्रवादीला जागा (२७) मिळाल्या होत्या. या दोन्ही पक्षांनी आघाडी करून पाच वर्षे सत्ता राबविली. राज्यात आणि केंद्रातही पाचपैकी चार वर्षे आघाडीचे सरकार असल्याने सतेज पाटील यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा धडाका लावला. त्यात थोडेफार यशही मिळाले. राष्ट्रवादीची साथही होती. याउलट शिवसेना, भाजपा, जनसुराज्य, आदी पक्षांंची ताकद नगण्य होती. प्रमुख विरोधी पक्ष शिवसेनाच आहे. यावेळच्या निवडणुकीत राजकीय चित्र बदलले आहे. काँग्रेस आघाडीची दिल्ली आणि राज्यातील सत्ता गेली. सतेज पाटील यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. जिल्ह्यात दहापैकी आठ आमदार युतीचे निवडून आले व काँग्रेस शून्यावर बाद झाली. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात दोन आमदार निवडून आणता आले. त्यात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. महापालिकेत एक आकडी सदस्यसंख्या असलेली युती आज केंद्र तसेच राज्यात सत्तेवर आहे. चंद्रकांतदादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मंत्रिमंडळातील पहिल्या चार-दोन मंत्र्यांमध्ये त्यांची गणना होते, पण पक्षाची ताकद कमी पडते. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीशी भाजपाने युती केली आहे. परिणामी नैसर्गिक मित्र असणारी शिवसेना दुरावली. निवडणुका सुरू होण्यापूर्वीच या पक्षांनी एकमेकांचे उणेदुणे काढत प्रचंड वाद घातल्यामुळे राज्याची सत्ता मिळवणारे पक्ष गल्लीत कसे भांडतात, याचे किळसवाणे चित्र कोल्हापूरकरांना दिसले.भाजपाला स्वबळावर जायचे आहे, पण पुरेसे उमेदवार मिळत नाहीत. शिवाय पक्षाचे शहरातील आमदार अमल महाडिक यांना दूर करायचे नाही. याचे गणित घालत अमल महाडिक यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ताराराणी आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र लढत आहेत. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. काँग्रेसची मदार एकट्या सतेज पाटील यांच्यावर आहे. आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती ताराराणी आघाडीच्या मागे आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना शहराच्या राजकारणात रस नाही. त्यामुळे पक्ष एकसंघ उभा राहात नाही. केवळ सतेज पाटील एकटे लढत आहेत.राष्ट्रवादीचीही गोची झाली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे आहेत, पण चुलते आमदार महादेवराव (विधान परिषद) आणि चुलत भाऊ आमदार अमल महाडिक यांच्याप्रमाणे ताराराणी आघाडीकडेच जाणार आहेत. कोल्हापूरच्या खासदारांना पक्षाचे काम करणे धर्मसंकट वाटते. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकाकी नेतृत्व माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनाच करावे लागत आहे. त्यांच्याकडे दोन डझन तरी तगडे उमेदवार आहेत. मात्र सत्तेचे पाठबळ बळ नाहीे. महापालिकेतील सत्ताधीश राज्यात विरोधी बाकावर आणि वेगवेगळे झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्ष राज्यात एकत्र सत्तेवर आहेत, पण या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. त्यामुळे यावेळची कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांना आव्हान ठरणारी आणि प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. भाजपा-शिवसेनेकडे सत्ता आली आहे. संपत्तीही येत आहे. त्यामुळे बळ मिळाले आहे. असा हा चौरंगी समान सामना आहे. सर्व पक्षीय प्रतिष्ठेची आणि सर्वांना अनेक विषयांवरून अडचण असणारी ही निवडणूक रंगतदार ठरेल, असे वाटते.