शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या पक्षांचा संपूर्ण शक्तिपात

By admin | Updated: November 6, 2015 02:46 IST

जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणाऱ्या डाव्या शक्तीपैकी आजएकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही.

- वसंत भोसले

जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणाऱ्या डाव्या शक्तीपैकी आजएकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि स्थानिक आघाडी ताराराणी असा सामना झाला. या निवडणुकीवर काँग्रेस विचाराच्या पक्षांचेच वर्चस्व राहिले. कमी अधिक सर्वच पक्षांचे उमेदवार निवडून आले. अपवाद डावे किंवा समाजवादी पक्षाचा. किंबहुना या पक्षांचे उमेदवार चर्चेतही नव्हते. भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी तसेच शेतकरी कामगार पक्षांनी उमेदवार उभे केले होते व ते सर्वच पडले. त्या सर्वांच्या मतांची बेरीज एक हजारदेखील होत नाही.दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगवेगळी वळणे समजून घेण्यासाठी हा ताजा तपशील किंवा संदर्भ दिला. याचे कारण दक्षिण महाराष्ट्रातील राजकारण काँग्रेसच्या प्रभावाने ओथंबून वाहत राहिले आहे. त्याला मोठी परंपरा आहे. समाजवादाची आहे, बहुजनवादाची आहे, सत्यशोधकी आहे आणि काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याची छापही त्यावर आहे. त्याबरोबरच पर्यायी राजकारण करणारी विधायक नेतृत्वाचीदेखील मोठी परंपरा आहे. समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी, लाल निशाण, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार आदी मोठमोठी वैचारिक भूमिका घेणारे पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते याच दक्षिण महाराष्ट्राने राज्याला दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून शेकापचे प्रा. त्र्यं. सी. कारखानीस, एन. डी. पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, लाल निशाण पक्षाचे संतराम पाटील, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत, डाव्या पक्षांचे एस. के. पाटील, गोविंदराव पानसरे, के. एल. मलाबादे, साताऱ्याचे व्ही. एन. पाटील, समाजवादी पक्षाचे रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, प्रा. शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, शेकापचे गोविंदराव कालिकते, कऱ्हाडचे केशवराव पवार, अशी कितीतरी नावे घेता येतील.स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने योगदान दिले खरे, पण स्वातंत्र्योत्तर काळात तिने भांडवलदारांची बाजू घेत शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी बहुजनवाद्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी ती काम करेनाशी झाली व त्यातून काँग्रेस आणि विशेषत: डावे यांच्यात संघर्ष सुरु झाला. काँग्रेसेतर नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जादाचे योगदान दिले व स्वातंत्र्योत्तर काळात कष्टकरी वर्गासाठी सतत संघर्ष करतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविला आणि गोवा मुक्ती लढ्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला. महागाई विरुद्धची आंदोलने किंवा नवी धरणे उभी करताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठीचा संघर्ष त्यांनी निकराने लढविला. हे करीत असताना निवडणुकांचे राजकारणही केले. अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्यादेखील. संघर्ष हमारा नारा है, अशीच जणू प्रतिज्ञा करून काँग्रेस या प्रमुख पक्षाच्या विरोधात सतत संघर्ष केला. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्तरावर किंवा प्रदेश स्तरावर काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा हे पक्ष मागे राहून काँग्रेसमधल्याच दोन गटात लढत होत राहिली. त्याचा राजकीय लाभही काही ठिकाणी डाव्या पक्षांना झाला. कारण काँग्रेस कमकुवत झाल्यास त्याचा राजकीय लाभ उठविण्याइतकी ताकद डाव्या पक्षात होती. त्यामुळेच नागनाथअण्णा, एन. डी. पाटील, शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, के. एल. मलाबादे, गोविंदराव कलिकते, आदी नेते आमदार म्हणून निवडून येत असत.आता यापैकी कोणत्याही पक्षाची ताकद राहिलेली नाही. किंबहुना काँग्रेस विरोधकांची जागा भाजपावा शिवसेनेने घेतली आहे. एकेकाळी कोल्हापूरची आमदारकी सलग १९९०पर्यंत (१९८०चा अपवाद वगळता) शेकापकडे होती. महापालिका स्थापन होण्यापूर्वी कोल्हापूर नगरपालिकेत शेकापचा नगराध्यक्ष व्हायचा. शेती, पाणी, रस्ते, कारखाने आदींवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून टाकणारे हेच डाव्या पक्षांचे नेते होते. त्यातील एकही पक्ष किंवा नेता शिल्लक राहिला नाही. त्यांच्या राजकारणात नवी आव्हान पेलण्याचे सामर्थ्य राहिले नाही. शत-प्रतिशत म्हणत भाजपा विरोधकाची जागा घेत आहे, तर डाव्यांची स्थिती शत-प्रतिशत संपुष्टात आलेली दिसते.