शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

डाव्या पक्षांचा संपूर्ण शक्तिपात

By admin | Updated: November 6, 2015 02:46 IST

जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणाऱ्या डाव्या शक्तीपैकी आजएकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही.

- वसंत भोसले

जनतेच्या प्रश्नांवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करुन टाकणाऱ्या डाव्या शक्तीपैकी आजएकही पक्ष अथवा नेता शिल्लक राहिलेला नाही. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि स्थानिक आघाडी ताराराणी असा सामना झाला. या निवडणुकीवर काँग्रेस विचाराच्या पक्षांचेच वर्चस्व राहिले. कमी अधिक सर्वच पक्षांचे उमेदवार निवडून आले. अपवाद डावे किंवा समाजवादी पक्षाचा. किंबहुना या पक्षांचे उमेदवार चर्चेतही नव्हते. भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी तसेच शेतकरी कामगार पक्षांनी उमेदवार उभे केले होते व ते सर्वच पडले. त्या सर्वांच्या मतांची बेरीज एक हजारदेखील होत नाही.दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगवेगळी वळणे समजून घेण्यासाठी हा ताजा तपशील किंवा संदर्भ दिला. याचे कारण दक्षिण महाराष्ट्रातील राजकारण काँग्रेसच्या प्रभावाने ओथंबून वाहत राहिले आहे. त्याला मोठी परंपरा आहे. समाजवादाची आहे, बहुजनवादाची आहे, सत्यशोधकी आहे आणि काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याची छापही त्यावर आहे. त्याबरोबरच पर्यायी राजकारण करणारी विधायक नेतृत्वाचीदेखील मोठी परंपरा आहे. समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी, लाल निशाण, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार आदी मोठमोठी वैचारिक भूमिका घेणारे पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते याच दक्षिण महाराष्ट्राने राज्याला दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून शेकापचे प्रा. त्र्यं. सी. कारखानीस, एन. डी. पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, लाल निशाण पक्षाचे संतराम पाटील, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत, डाव्या पक्षांचे एस. के. पाटील, गोविंदराव पानसरे, के. एल. मलाबादे, साताऱ्याचे व्ही. एन. पाटील, समाजवादी पक्षाचे रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, प्रा. शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, शेकापचे गोविंदराव कालिकते, कऱ्हाडचे केशवराव पवार, अशी कितीतरी नावे घेता येतील.स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने योगदान दिले खरे, पण स्वातंत्र्योत्तर काळात तिने भांडवलदारांची बाजू घेत शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी बहुजनवाद्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी ती काम करेनाशी झाली व त्यातून काँग्रेस आणि विशेषत: डावे यांच्यात संघर्ष सुरु झाला. काँग्रेसेतर नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जादाचे योगदान दिले व स्वातंत्र्योत्तर काळात कष्टकरी वर्गासाठी सतत संघर्ष करतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविला आणि गोवा मुक्ती लढ्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला. महागाई विरुद्धची आंदोलने किंवा नवी धरणे उभी करताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठीचा संघर्ष त्यांनी निकराने लढविला. हे करीत असताना निवडणुकांचे राजकारणही केले. अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्यादेखील. संघर्ष हमारा नारा है, अशीच जणू प्रतिज्ञा करून काँग्रेस या प्रमुख पक्षाच्या विरोधात सतत संघर्ष केला. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्तरावर किंवा प्रदेश स्तरावर काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा हे पक्ष मागे राहून काँग्रेसमधल्याच दोन गटात लढत होत राहिली. त्याचा राजकीय लाभही काही ठिकाणी डाव्या पक्षांना झाला. कारण काँग्रेस कमकुवत झाल्यास त्याचा राजकीय लाभ उठविण्याइतकी ताकद डाव्या पक्षात होती. त्यामुळेच नागनाथअण्णा, एन. डी. पाटील, शरद पाटील, श्रीपतराव शिंदे, के. एल. मलाबादे, गोविंदराव कलिकते, आदी नेते आमदार म्हणून निवडून येत असत.आता यापैकी कोणत्याही पक्षाची ताकद राहिलेली नाही. किंबहुना काँग्रेस विरोधकांची जागा भाजपावा शिवसेनेने घेतली आहे. एकेकाळी कोल्हापूरची आमदारकी सलग १९९०पर्यंत (१९८०चा अपवाद वगळता) शेकापकडे होती. महापालिका स्थापन होण्यापूर्वी कोल्हापूर नगरपालिकेत शेकापचा नगराध्यक्ष व्हायचा. शेती, पाणी, रस्ते, कारखाने आदींवर हजारोंचे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून टाकणारे हेच डाव्या पक्षांचे नेते होते. त्यातील एकही पक्ष किंवा नेता शिल्लक राहिला नाही. त्यांच्या राजकारणात नवी आव्हान पेलण्याचे सामर्थ्य राहिले नाही. शत-प्रतिशत म्हणत भाजपा विरोधकाची जागा घेत आहे, तर डाव्यांची स्थिती शत-प्रतिशत संपुष्टात आलेली दिसते.