शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’ : कागदावरच्या आकड्यांचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 07:44 IST

जपानमधील महागाई आणि त्यांच्या येन या चलनात आलेली मोठी घसरण अशी अनेक नकारात्मक कारणे त्या-त्या देशांतील  शेअर बाजारांना खाली खेचत आहेत. याचा परिणाम इतर देशांतील बाजारांवर होत आहे.

डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

जागतिक शेअर बाजारात कालच्या सोमवारी मोठी घसरण झाली. खरे तर गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी हा ‘ब्लॅक मंडे’ होता. मागील शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरून बंद झाले होते. याचा परिणाम सोमवारी आशिया खंडातील बाजार सुरू होतानाच दिसला. तांत्रिक परिभाषेत सांगायचे तर बाजार  गॅप डाऊनने सुरू झाले आणि घसरून खालच्या स्तरावर बंद झाले. जपानचा निकी तब्बल साडेतेरा टक्क्यांनी घसरून बंद झाला. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर झाला. निफ्टी आणि सेन्सेक्स गॅप डाऊनने सुरू होऊन खालच्या स्तरावर व्यवहार करू लागले. शेअर बाजार हा फारच संवेदनशील असतो. नकारात्मक आणि सकारात्मक घटना त्यास खाली आणि वर नेत असतात. एकूणच जागतिक मंदी येणार अशी चर्चा, अस्थिरता, इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, अमेरिकेतील रोजगार उपलब्धतेची निराशाजनक आकडेवारी, जपानमधील महागाई आणि त्यांच्या येन या चलनात आलेली मोठी घसरण अशी अनेक नकारात्मक कारणे त्या-त्या देशांतील  शेअर बाजारांना खाली खेचत आहेत. याचा परिणाम इतर देशांतील बाजारांवर होत आहे.

बाजारांसाठी हे नवीन नाही. अशा बऱ्या-वाईट अनेक घटना बाजार अनुभवत असतो. ‘अमुक लाख कोटी बुडाले’, ‘गुंतवणूकदार तमुक लाख कोटींनी श्रीमंत झाले’ अशा बातम्या आपण वाचतो. खरेतर जे दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात त्यांची संपत्ती बाजार वाढतो तेव्हा वाढत असते आणि बाजार घसरतो तेव्हा घटत असते. मग नेमके नुकसान आणि फायदा कोणाचा होतो, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. कालच्या सोमवारी बाजार घसरले किंवा अजून घसरतील या भीतीने ज्यांनी शेअर्स नुकसानीत विकले असतील अशा गुंतवणूकदारांचे प्रत्यक्ष नुकसान झाले, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.  अन्यथा असे नुकसान फक्त कागदावरच राहते. जेव्हा बाजार सावरतात आणि खरेदीदार येऊन पुन्हा वाढतात तेव्हा नुकसानीत असलेल्या  शेअर्सचे भाव वधारतात. पुढे फायद्यातही येतात. जोपर्यंत फायद्यात किंवा नुकसानीत शेअर्स विक्री होत नाही तोपर्यंत असा फायदा आणि तोटा प्रत्यक्ष नसतो. आता जे ट्रेडर्स  फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये व्यवहार करतात अशांनाच प्रत्यक्ष फायदा किंवा तोटा सहन करावा लागतो. कारण अशा व्यवहारांना एक्सपायरी डेट असते. बाजार वाढतील या आशेने ज्यांनी ‘कॉल ऑप्शन्स’ घेतले आहेत असे ट्रेडर्स अशा घसरणीच्या काळात बेअरच्या जाळ्यात अडकतात आणि शेवटी नुकसान सहन करून बाहेर पडतात; परंतु हेच पैसे कोणाच्या तरी खिशात जात असतात. ज्यांनी बाजार पडतील या आशेने ‘पुट ऑप्शन्स’ घेतलेले असतात ते मात्र उत्तम फायद्यात राहतात. यातही ज्या-त्या वेळेस फायदा काढून घेणेही महत्त्वाचे ठरते.

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाढवला आहे. याचबरोबर ऑप्शनमधील व्यवहारांवरील करही वाढविला आहे. ‘सेबी’ने अर्थसंकल्पापूर्वीच  एका अहवालात नमूद केले होते की ऑप्शन्समधील व्यवहार करणाऱ्या एकूण ट्रेडर्सपैकी ८९ टक्के नुकसान सहन करून बाहेर पडतात. गेल्या आर्थिक वर्षात हा नुकसानीचा आकडा ५४ हजार कोटींच्या घरात होता. यामागचा उद्देश हाच आहे की, सर्वसामान्य गुंतवणूकदार जुगारी व्यवहार करून अशा अस्थिर बाजारात नुकसानीत जाऊ नये. सोमवारी भारतीय शेअर बाजाराचा संवेदनशील इंडेक्स म्हणजेच इंडिया विक्स चाळीस टक्क्यांनी वाढला. याचाच अर्थ बाजारातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठे गुंतवणूकदार होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ऑप्शन्सचा आधार घेत असतात आणि त्यात अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करतात. मोठ्या प्रमाणात ऑप्शन्स खरेदी आणि विक्री यातून निफ्टी आणि सेन्सेक्स संवेदनशील आणि अस्थिर राहतात. शेवटी बाजारातील पैसे एका खिशातून दुसऱ्या खिशात जात असतात. जाणे-येणे सुरू राहते. नफा वसुली केल्यावरही गुंतवणूकदार पुन्हा त्याकडेच वळतात. नफ्याचे पैसे पुन्हा बाजारात येतात. खाली आलेला बाजार पुन्हा वर जाण्यास सज्ज राहतो आणि अमुक तमुक लाख कोटींचा फायदा आणि तोटा हा मोठ्या प्रमाणावर कागदांवरील आकड्यांचा खेळ राहतो.