शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:34 IST

भारत-चीन सीमेवरील डोकलाम या तणावग्रस्त परिसरात चीन त्याची हेलिकॉप्टरे व अन्य हवाई सामुग्री आणण्याच्या प्रयत्नाला लागला आहे ही संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेली माहिती माध्यमांएवढीच देशातील नेत्यांनीही फारशा गंभीरपणे घेतल्याचे दिसले नाही. डोकलाम क्षेत्रातला तणाव जुना आहे आणि त्या क्षेत्रावरचा आपला हक्क चीनने आरंभापासून रेटून धरला आहे.

भारत-चीन सीमेवरील डोकलाम या तणावग्रस्त परिसरात चीन त्याची हेलिकॉप्टरे व अन्य हवाई सामुग्री आणण्याच्या प्रयत्नाला लागला आहे ही संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेली माहिती माध्यमांएवढीच देशातील नेत्यांनीही फारशा गंभीरपणे घेतल्याचे दिसले नाही. डोकलाम क्षेत्रातला तणाव जुना आहे आणि त्या क्षेत्रावरचा आपला हक्क चीनने आरंभापासून रेटून धरला आहे. भारताचा पवित्रा बचावाचा आणि संरक्षणात्मकच केवळ राहिल्याचे आजवर दिसले आहे. चीनचे लष्करी वा अन्य सामर्थ्य मोठे आहे आणि डोकलामनजीकचे नेपाळसारखे अन्य प्रदेश चीनला अधिक अनुकूल असणारे आहेत. चीनच्या वाढत्या बळाचे परिणाम भारताएवढेच आता जगालाही अनुभवावे लागत आहे. चीनच्या समुद्रावर त्या देशाने आपले प्रभुत्व जपान, व्हिएतनाम व आॅस्ट्रेलिया या साºयांना धुडकावून आता प्रस्थापित केले आहे. म्यानमारमधून एक मोठा औद्योगिक कॉरिडॉर बांधत आपल्या प्रदेशातून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची त्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा कॉरिडॉर बांधून होताच भारताची पूर्व सीमा त्याला अडवून धरता येणार आहे आणि म्यानमारपासून थायलंडपर्यंतचा सारा प्रदेश भूमार्गाने तो भारतापासून दूर राखू शकणार आहे. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर या प्रदेशातून अरबी समुद्रापर्यंत पोहोचू शकणारा व चीन उत्पादने थेट तेथील बंदरापर्यंत पोहोचवू शकणारा ४६ अब्ज डॉलर्सचा औद्योगिक कॉरिडॉर बांधायला त्याने सुरुवातही केली आहे. हा कॉरिडॉर भारताची पश्चिम दिशेने कोंडी करू शकणार आहे. एवढ्यावर चीनचे आक्रमण थांबलेही नाही. आता मॉरिशस या हिंदी महासागरातील छोट्या देशात आपले सागरी केंद्र उभे करण्याच्या व तेथे नाविकतळ उभारण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला आहे. मॉरिशस हा भारताचा मित्रदेश आहे आणि त्याला अनेक संकटांपासून वाचवण्याचे काम भारताने आजवर केले आहे. हा नाविकतळ पूर्ण होताच चीन भारताची सामुद्रिक कोंडीही करू शकणार आहे. तात्पर्य, उत्तरेला स्वत: चीन, पूर्वेला म्यानमारमधील व पश्चिमेला पाकिस्तानमधील कॉरिडॉर आणि आता दक्षिणेला सामुद्रिक कोंडी हा चीनचा आक्रमक पवित्रा कानाडोळा करावा असा नाही. याच काळात भारत, जपान व आॅस्ट्रेलिया अशी होऊ घातलेली एकजूट मागे पडली आहे आणि रशिया हा भारताचा एकेकाळचा विश्वासू मित्रदेश भारतापासून दूर गेला आहे. भारत सरकारचे सध्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात पडण्याचे राजकारणही या स्थितीला बरेचसे कारणीभूत आहे. चीनचे आक्रमण बाह्य सीमेवरच थांबले नाही. त्याने अरुणाचलचा प्रदेश त्याचा असल्याचे सांगून त्यातील शहरांना व अन्य स्थळांना त्याची नावे दिली आहेत. उत्तर प्रदेशचा उत्तरेकडील सीमावर्ती भाग आणि काश्मीरचा पूर्व भाग यावरही तो त्याचा हक्क सांगत आहे. चीनचा असा वेढा आणि जगात एकही विश्वासू व सामर्थ्यवान मित्र नसणे ही अवस्था चिंताजनक म्हणावी असे आहे. त्यातून आपले परराष्टÑीय धोरण पांगळे व कोणताही नवा अभिक्रम हाती न घेणारे आहे. झालेच तर आपले लष्करी सामर्थ्यही, एक क्षेपणास्त्राची गती व त्याचा मारा वाढवण्याखेरीज फारसे पुढे जाऊ शकले नाही. चीनचे हे आक्रमक धोरण लक्षात घेऊनच अलीकडे दिल्लीत होऊ घातलेले दलाई लामांचे अनेक कार्यक्रम भारत सरकारने आता रद्द करायला संबंधितांना सांगितले आहे. चीन हा हुकूमशाही देश आहे आणि त्याने आपल्या घटनेत दुरुस्ती करून शी झिपिंग या आपल्या नेत्याला तहहयात अध्यक्षपद देऊ केले आहे. त्यांना पक्षात वा देशात विरोध नाही आणि जगही त्यांना विरोध करू शकण्याच्या अवस्थेत फारसे राहिले नाही. असा नेता अमर्याद होण्याची शक्यता मोठी असते. शिवाय त्याची नजर भारतीय प्रदेशांवर असेल तर त्यासाठी आपल्या संरक्षणाची व्यवस्था शक्तिशाली बदलण्याचीही गरज असते. त्या तात्काळ करणे जमत नसेल तर जगात जास्तीचे व सामर्थ्यशाली मित्र जोडण्याचे आंतरराष्ट्रीय राजकारण त्याला अवलंबावे लागते. ते यशस्वी करायचे तर त्यासाठी नुसता ढोकळा वा मिठ्या पुरेशा नाहीत. त्याहून अधिक विधायक मार्गांचा अवलंब भारताला करावा लागणार आहे.

टॅग्स :DoklamडोकलामchinaचीनIndiaभारत