शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शिरच्छेद मान्य?

By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST

लोकमान्यता प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या विरोधात काहीबाही बोलले तरच आपल्याला वृत्तपत्रीय बातमीमान्यता प्राप्त होऊ शकते, या तत्त्वावर ज्यांची गाढ श्रद्धा आहे,

लोकमान्यता प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या विरोधात काहीबाही बोलले तरच आपल्याला वृत्तपत्रीय बातमीमान्यता प्राप्त होऊ शकते, या तत्त्वावर ज्यांची गाढ श्रद्धा आहे, अशा लोकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू हे नक्कीच अग्रभागी शोभून दिसावेत. ‘सत्यं ब्रूयात’ या आवरणाखाली ते आपला ब्लॉग चालवितात आणि त्यात त्यांना जाणवलेले सत्य जगासमोर मांडीत असतात. अगदी अलीकडे त्यांना जाणवलेले सत्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ब्रिटीश सत्तेचे एजंट असणे. पण त्याच्याही आधी त्यांना जाणवलेले आणखी एक सत्य म्हणजे महात्मा गांधी यांचेही ब्रिटीश सत्तेचे व नेताजी सुभाषचन्द्र बोस यांचे जपानी सत्तेचे एजंट असणे. काटजू यांना आणखीही काही सत्ये गवसली आहेत व यापुढेही गवसत राहतील. पण त्यांचे बापू गांधी आणि नेताजी यांच्याविषयीचे सत्य काही भारतीय संसदेला रुचले नाही. परिणामी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी काटजू यांचा निषेध करणारे ठराव संमत केले. संसदेची ही कृती काही काटजू यांना रुचली नाही. एकदम आपला निषेध करण्यापूर्वी संसदेने आपणास पाचारण करुन आपले म्हणणे ऐकून घ्यावयास हवे होते म्हणजे नैसर्गिक न्याय झाल्यासारखे दिसले असते. पण संसदेने तसले काहीही केले नाही म्हणून मग संशयितास त्याची बाजू मांडण्याची संधी न देताच त्याचा थेट शिरच्छेद केल्यासारखे झाले असे न्या. काटजू यांनी म्हटले व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण आता त्या न्यायालयानेही संसदेच्या कृतीमध्ये सकृतदर्शनी तरी काहीही आक्षेपार्ह नसल्याचा निर्वाळा दिला असल्याने काटजूंच्याच भाषेत बोलायचे तर सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीआधी शिरच्छेद मान्य असावा, असे दिसते. अर्थात काटजूंच्या याचिकेवर सुनावणी पुढे सुरु राहणार असली तरी आपण जे काही व्यक्त करतो, त्यावर होणाऱ्या टीकेचा सामना करण्याची तयारी काटजूंनी ठेवावी, असे मात्र न्यायालयाने बजावले आहे.