शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

बालगरिबीचा शाप !

By admin | Updated: June 10, 2017 00:35 IST

भारत तरुणांचा देश आहे, हे वाक्य राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळते. तरुणाईच्या बळावर भारताला लवकरच महासत्ता

भारत तरुणांचा देश आहे, हे वाक्य राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळते. तरुणाईच्या बळावर भारताला लवकरच महासत्ता बनविण्याचे स्वप्नही नेते दाखवतात; पण प्रत्यक्षात भारतातील तरुणाईची स्थिती कशी आहे, यावर जगविख्यात आॅक्सफर्ड विद्यापीठाने नुकताच प्रकाश टाकला आहे. या विद्यापीठाने नुकताच जागतिक गरिबीचा अभ्यास केला. त्या अंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न श्रेणीत मोडणाऱ्या १०३ देशांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, एकूण ५२ कोटी ८० लाख भारतीय नागरिक गरीब असून, त्यापैकी जवळपास निम्मी १८ वर्षांखालील बालके आहेत. हे चित्र खरोखर विदारक आहे. युनिसेफच्या व्याख्येनुसार, जी बालके जीवन संघर्षात तग धरण्यासाठी आवश्यक त्या भौतिक, आध्यात्मिक व भावनिक संसाधनांपासून वंचित राहतात, ज्यांना त्यांचे हक्क उपभोगता येत नाहीत, स्वत:ची पूर्ण क्षमता विकसित करता येत नाही आणि समाजात बरोबरीच्या दर्जाने वावरता येत नाही, ती बालके गरीब ! या व्याख्येत बसणारी असंख्य मुले रोज आपल्या अवतीभवती दृष्टीस पडतात. अशा मुलांचे पालक गरीब असतात म्हणूनच त्यांना गरिबीत खितपत पडावे लागते. त्यामध्ये त्यांचा काहीही दोष नसतो. याशिवाय एकत्र कुटुंब पद्धतीचा व कौटुंबिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, कुमारी मातांची वाढती संख्या यांसारख्या कारणांचाही बालकांना गरिबीत जीवन जगावे लागण्यास हातभार लागतो. पालक गरीब म्हणून पाल्य गरीब, पुढे ते पालक झाल्यावर त्यांचे पाल्यही गरीब, असे हे दुष्टचक्र आहे. ते केवळ भारतातच नव्हे, तर इतरही अनेक गरीब देशांमध्ये, शेकडो-हजारो वर्षांपासून अविरत सुरू आहे. याचा आणखी एक पैलू आहे. बालपणी मुला-मुलींमधील गरिबीचे प्रमाण सारखेच असते; मात्र वयात आल्यानंतर, गरिबीच्या निकषावर त्यांच्यात दरी निर्माण होते व ती रुंदावत जाते. फार थोड्या देशांना गरिबीचे दुष्टचक्र भेदून त्यामधून बाहेर पडण्यात यश मिळाले आहे. बालकांना गरिबीतून बाहेर काढणे हाच त्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. गरिबीत जीवन जगत असलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शिक्षणाचा दर्जा उंचाविणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, कौटुंबिक मूल्यांना चालना देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हेच त्यासाठीचे मार्ग आहेत. भारताने स्वातंत्र्यानंतर या मार्गानेच वाटचाल सुरू केली; मात्र स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही एकूण गरिबांच्या संख्येत निम्मी बालके असतील, तर मार्ग बरोबर; पण वाटचाल चुकली, असेच वर्णन करावे लागेल. संपूर्ण देशासाठी, विशेषत: धोरण निर्धारण करणाऱ्यांसाठी, ही चिंतेची बाब आहे. नेमके काय चुकले, याचा शोध घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या न केल्यास, तरुणाईच्या बळावर महासत्ता होण्याचे स्वप्न आपण विसरलेलेच बरे !