शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

बालगरिबीचा शाप !

By admin | Updated: June 10, 2017 00:35 IST

भारत तरुणांचा देश आहे, हे वाक्य राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळते. तरुणाईच्या बळावर भारताला लवकरच महासत्ता

भारत तरुणांचा देश आहे, हे वाक्य राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळते. तरुणाईच्या बळावर भारताला लवकरच महासत्ता बनविण्याचे स्वप्नही नेते दाखवतात; पण प्रत्यक्षात भारतातील तरुणाईची स्थिती कशी आहे, यावर जगविख्यात आॅक्सफर्ड विद्यापीठाने नुकताच प्रकाश टाकला आहे. या विद्यापीठाने नुकताच जागतिक गरिबीचा अभ्यास केला. त्या अंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न श्रेणीत मोडणाऱ्या १०३ देशांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, एकूण ५२ कोटी ८० लाख भारतीय नागरिक गरीब असून, त्यापैकी जवळपास निम्मी १८ वर्षांखालील बालके आहेत. हे चित्र खरोखर विदारक आहे. युनिसेफच्या व्याख्येनुसार, जी बालके जीवन संघर्षात तग धरण्यासाठी आवश्यक त्या भौतिक, आध्यात्मिक व भावनिक संसाधनांपासून वंचित राहतात, ज्यांना त्यांचे हक्क उपभोगता येत नाहीत, स्वत:ची पूर्ण क्षमता विकसित करता येत नाही आणि समाजात बरोबरीच्या दर्जाने वावरता येत नाही, ती बालके गरीब ! या व्याख्येत बसणारी असंख्य मुले रोज आपल्या अवतीभवती दृष्टीस पडतात. अशा मुलांचे पालक गरीब असतात म्हणूनच त्यांना गरिबीत खितपत पडावे लागते. त्यामध्ये त्यांचा काहीही दोष नसतो. याशिवाय एकत्र कुटुंब पद्धतीचा व कौटुंबिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, कुमारी मातांची वाढती संख्या यांसारख्या कारणांचाही बालकांना गरिबीत जीवन जगावे लागण्यास हातभार लागतो. पालक गरीब म्हणून पाल्य गरीब, पुढे ते पालक झाल्यावर त्यांचे पाल्यही गरीब, असे हे दुष्टचक्र आहे. ते केवळ भारतातच नव्हे, तर इतरही अनेक गरीब देशांमध्ये, शेकडो-हजारो वर्षांपासून अविरत सुरू आहे. याचा आणखी एक पैलू आहे. बालपणी मुला-मुलींमधील गरिबीचे प्रमाण सारखेच असते; मात्र वयात आल्यानंतर, गरिबीच्या निकषावर त्यांच्यात दरी निर्माण होते व ती रुंदावत जाते. फार थोड्या देशांना गरिबीचे दुष्टचक्र भेदून त्यामधून बाहेर पडण्यात यश मिळाले आहे. बालकांना गरिबीतून बाहेर काढणे हाच त्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. गरिबीत जीवन जगत असलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शिक्षणाचा दर्जा उंचाविणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, कौटुंबिक मूल्यांना चालना देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हेच त्यासाठीचे मार्ग आहेत. भारताने स्वातंत्र्यानंतर या मार्गानेच वाटचाल सुरू केली; मात्र स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही एकूण गरिबांच्या संख्येत निम्मी बालके असतील, तर मार्ग बरोबर; पण वाटचाल चुकली, असेच वर्णन करावे लागेल. संपूर्ण देशासाठी, विशेषत: धोरण निर्धारण करणाऱ्यांसाठी, ही चिंतेची बाब आहे. नेमके काय चुकले, याचा शोध घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या न केल्यास, तरुणाईच्या बळावर महासत्ता होण्याचे स्वप्न आपण विसरलेलेच बरे !