शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील सर्वच जुने पूल नव्याने बांधा!

By admin | Updated: August 16, 2016 04:06 IST

कोकणातील महाडजवळच्या सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून, त्यामध्ये बस बुडून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे! या अपघातात दगावलेले प्रवासी

- यशवंत जोगदेवकोकणातील महाडजवळच्या सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून, त्यामध्ये बस बुडून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे! या अपघातात दगावलेले प्रवासी या भागातील धोकादायक पूल, रस्ते वाहतुकीतील नेहमी येणारे अडथळे आणि अपघात याच्या जोडीलाच महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे, राजकीय आरोप आणि प्रत्यारोप याही घटना अपेक्षेप्रमाणे गाजल्या. आता या सर्व गदारोळातून थंड डोक्याने कोकणातील प्रवास भविष्यात सुरक्षित, सुखरूप, जलद गतीने आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने भारी वजनाच्या मालवाहतुकीला योग्य, तसेच कोकणात पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतुकीसाठी नवीन पूल आणि चौपदरी महामार्ग एक नवीन जाळे उभारणे, आता आवश्यक ठरले आहे!सावित्री नदीवरील पूल अपघातात २४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याने, प्रसारमाध्यमे आणि राजकीय स्तरावर एकमेकांवर दोषारोपण आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे सत्र सुरू झाले आहे! मात्र, जसा काळ पुढे सरकतो, तसतसे घटनेचे गांभीर्य आणि महत्त्व कमी होत पुन्हा अशीच दुर्घटना घडेपर्यंत उपाय योजनेकडे दुर्लक्ष केले जाते! देशात आणि महाराष्ट्रात रस्त्यावरच्या अपघातात दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे लाखो निरपराध प्रवाशांचे बळी गेले आहेत. इतक्या नागरिकांचे बलिदान होऊनही राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे, तसेच नेहमीच्या आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून असे प्रकल्प रेंगाळतात!सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि कोकणातील जुन्या पुलांचे सर्वेक्षण, स्ट्रक्चरल आॅडिट आणि गणेशोत्सवासाठी राष्ट्रीय महामार्गावर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची जबरदस्त गर्दी होणार असल्याने डळमळीत झालेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. वर्तमान परिस्थितीत कोकणामधील वाहतूक चालू ठेवण्यासाठी हे आवश्यक असले, तरीही हा उपाय पुरेसा नाही. यासाठी आता कोकणातील महामार्गावरील महत्त्वाचे २० पूल, १०० वर्षांपूर्वी बांधलेले दगडी बांधकाम चुना आणि कमानी असलेले ३४ पूल, हे सर्वच आता दुरुस्त करीत बसण्यापेक्षा अत्याधुनिक तंत्र वापरून बांग्लादेशातील युद्धकाळात नद्या ओलांडण्यासाठी संरक्षण दल वापरतात, तसे फोल्डिंग ब्रीज असे तंत्रज्ञान सध्या गणेशोत्सव आणि दिवाळी सणामधील मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरून भविष्यकाळात हे सर्व पूल नव्यानेच उभारण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात कोकण रेल्वेचे पहिले कार्यसंचालक श्रीधरन यांच्याशी संपर्क साधल्यावर या सर्व पुलांची आधुनिक तंत्र वापरून उभारणी अवघ्या २ ते ३ वर्षांतच करता येईल आणि त्यासाठी खर्च अवघा ५००० कोटी येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या उभारणीसाठी असलेला सर्वांत मोठा शाप म्हणजे राजकीय मतभेद, जमीन संपादन, प्रशासकीय प्रक्रिया आणि निधींची अडचण असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प रखडत आहेत. त्याऐवजी आतापासूनच नवीन पुलांच्या उभारणीसाठी जमीन संपादन, त्यासाठी जोडमार्गाचे बांधकाम, या पुलांचे डिझाइन, त्यासाठी मान्यता, कंत्राटदारांची नेमणूक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केंद्र आणि राज्याने निधीची व्यवस्था केली, तरच हा प्रकल्प ठरावीक वेळेत पूर्ण होऊ शकेल. सुदैवाने राज्यातील जलदगती महामार्ग उभारणारे नितीन गडकरी केंद्रात सार्वजनिक बांधकाममंत्री असल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे दृढनिश्चयी असल्याने, कोकणातील महामार्ग आणि नवीन पूल बांधणीच्या कामाला विलंब लागणार नाही, ही अपेक्षा आहे. सध्या असलेल्या जुन्या पुलांचे आयुष्यमान ७०-८० वर्षे हे पूल वाहतुकीसाठी उपयोगात आल्याने पूर्ण होत आले आहे. त्यावरील खर्च केव्हाच भरून निघाला आहे. या सर्व ठिकाणी पुलांची लांबी, जास्तीत जास्त २०० मी. आणि रुंदी ४ लेनची धरली, तरीही या सर्व प्रकल्पाला ५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार नाही. या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नवीन पूल बांधण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या जागेची जमीन संपादन युद्धस्तरावर केली गेली आणि जलद गतीने प्रत्येक आठवड्याचे लक्ष्य ठरवून, ठरावीक बांधकाम पूर्ण करण्याचा दृढ निश्चय केला, तर वर्षभरातच नदीच्या पात्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून पुलाच्या पायासाठी खोदकाम, त्यामध्ये काँक्रिट ओतणे, मजबूत पोलादी सळ्या रोवून या पुलाचे पिलर उभारणे, त्याच्यावरील सुपर स्ट्रक्चर, डेक ही सर्व कामे वर्षभरातच उरकली जातील. हे सर्व होत असतानाच सध्याच्या महामार्गातूनच नवीन महामार्गासाठी जोडरस्ते आणि त्याचे बांधकाम तातडीने सुरू करता येईल. या सर्व प्रयत्नांच्या तुलनेत सध्याच्या गोव्याला जाणाऱ्या महामार्गावर नवीन पूल उभारणे हे काम फारच मर्यादित आणि सोपे आहे. उलट सध्या भारत सरकारकडे प्रकल्पासाठी विदेशी मुद्रा आणि आर्थिक मदत मिळणे अशक्य नाही. त्याखेरीज सध्या बांधकाम क्षेत्रातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, व्यवस्थापन, भारी वजनाचे बांधकाम साहित्य याची वाहतूक करण्यासाठी कोकणात रेल्वे मार्ग झाला आहे. पुन्हा एकदा कोकणात रेल्वे वाहतुकीप्रमाणे रस्ते वाहतुकीसाठीसुद्धा प्रयत्न होणे, ही काळाची गरज आहे.(लेखक जम्मू काश्मीर रेल्वे प्रकल्पाचे माजी जनसंपर्क सल्लागार आहेत)