शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचे रण पुन्हा तापणार

By admin | Updated: April 1, 2015 22:45 IST

केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सरकारे गेली आणि भाजपा सत्तेवर आली. याचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होत राहणार असून, त्याची सुरुवात

वसंत भोसले -

केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सरकारे गेली आणि भाजपा सत्तेवर आली. याचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होत राहणार असून, त्याची सुरुवात कोल्हापूर-सातारा-सांगली जिल्ह्यांतून होत आहे. लोकसभा आणि विधानसभेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व निम्म्यावर आणणे भाजपा तसेच शिवसेनेला शक्य झाले असले तरी सहकारी संस्था, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व तसूभरही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे या महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह सुमारे १२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ, साताऱ्यातील कृष्णा साखर कारखाना, किसनवीर साखर कारखाना, कोल्हापूरचा राजाराम सहकारी साखर कारखाना, सांगली व कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँका, सांगली अर्बन बँक अशा अनेक संस्थांच्या समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाला वेढून टाकणाऱ्या गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका सर्वांत महत्त्वाच्या ठरणार आहेत. गोकुळ दूध संघ हा तर राजकारण्यांचा आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिला जातो. प्रत्येक तालुक्यातून पक्षाच्या मर्यादा बाजूला ठेवून गट-तट तसेच नातेवाइकांचे राजकारण खेळले जाते. या राजकारणाचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक सांभाळतात. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची साथ आहे; पण यावेळी कॉँगे्रसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीच आव्हान दिले आहे. महाडिकविरुद्ध सतेज पाटील असा हा संघर्ष उभा राहत आहे. त्यात महाडिक विरोधातील सर्व एकत्र येणार आहेत; पण महाडिक यांच्याकडे सत्ता आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत. शिवाय त्यांचे चिरंजीव अमल महाडिक भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही समर्थन आहे. भाजपाला जिल्ह्यात एकाही मोठ्या संस्थेत स्थान नाही. सत्तेचा वापर करीत एखादे संचालकपद मिळते का, एवढीच आशा त्यांना आहे. याचवेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. तेथेही महादेवराव महाडिक यांची सत्ता असल्याने सतेज पाटील गटाने आव्हान दिले आहे. कोल्हापूर जिल्हा बॅँकेची निवडणूक जाहीर झाली आहे; पण अद्याप गटा-तटाचे राजकारण स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे ही बॅँक असताना तीन वर्षांपूर्वी कारवाई झाली. तीन वर्षांत प्रशासकांनी बॅँक पूर्वपदावर आणली आहे.सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकांच्या राजकारणानेही जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. साताऱ्याची बँक राष्ट्रवादीकडे राहिली आहे. ती चांगल्या स्थितीत आहे; मात्र ‘सांगली’वरही प्रशासकीय कारवाई झाली होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ तीन वर्षांपूर्वी बरखास्त झाले होते. राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांचे निधन झाले, तर अनेक नेत्यांनी भाजपामध्ये जाणे पसंत केले. परिणामी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावरच जिल्ह्यातील राजकारणाची भिस्त आहे. शिवाय कॉँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले पतंगराव कदम यांनाही नव्याने जुळणी करावी लागणार आहे. सांगलीत भाजपाचे खासदार अणि चार आमदार असल्याने हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवितो, की राष्ट्रवादीच्या डावपेचांना बळी पडतो हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. साताऱ्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि किसनवीर सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका पारंपरिक राजकीय गटांत रंगणार आहेत. या कारखान्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे आणि त्याचे राजकारणावर मोठे परिणाम होत असतात. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच स्थानिक राजकारणाने उन्हाळ्याप्रमाणे राजकीय वातावरण तापणार-रंगणार आहे.