शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचे रण पुन्हा तापणार

By admin | Updated: April 1, 2015 22:45 IST

केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सरकारे गेली आणि भाजपा सत्तेवर आली. याचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होत राहणार असून, त्याची सुरुवात

वसंत भोसले -

केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सरकारे गेली आणि भाजपा सत्तेवर आली. याचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होत राहणार असून, त्याची सुरुवात कोल्हापूर-सातारा-सांगली जिल्ह्यांतून होत आहे. लोकसभा आणि विधानसभेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व निम्म्यावर आणणे भाजपा तसेच शिवसेनेला शक्य झाले असले तरी सहकारी संस्था, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व तसूभरही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे या महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह सुमारे १२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ, साताऱ्यातील कृष्णा साखर कारखाना, किसनवीर साखर कारखाना, कोल्हापूरचा राजाराम सहकारी साखर कारखाना, सांगली व कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँका, सांगली अर्बन बँक अशा अनेक संस्थांच्या समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाला वेढून टाकणाऱ्या गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका सर्वांत महत्त्वाच्या ठरणार आहेत. गोकुळ दूध संघ हा तर राजकारण्यांचा आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिला जातो. प्रत्येक तालुक्यातून पक्षाच्या मर्यादा बाजूला ठेवून गट-तट तसेच नातेवाइकांचे राजकारण खेळले जाते. या राजकारणाचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक सांभाळतात. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची साथ आहे; पण यावेळी कॉँगे्रसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीच आव्हान दिले आहे. महाडिकविरुद्ध सतेज पाटील असा हा संघर्ष उभा राहत आहे. त्यात महाडिक विरोधातील सर्व एकत्र येणार आहेत; पण महाडिक यांच्याकडे सत्ता आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत. शिवाय त्यांचे चिरंजीव अमल महाडिक भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही समर्थन आहे. भाजपाला जिल्ह्यात एकाही मोठ्या संस्थेत स्थान नाही. सत्तेचा वापर करीत एखादे संचालकपद मिळते का, एवढीच आशा त्यांना आहे. याचवेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. तेथेही महादेवराव महाडिक यांची सत्ता असल्याने सतेज पाटील गटाने आव्हान दिले आहे. कोल्हापूर जिल्हा बॅँकेची निवडणूक जाहीर झाली आहे; पण अद्याप गटा-तटाचे राजकारण स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे ही बॅँक असताना तीन वर्षांपूर्वी कारवाई झाली. तीन वर्षांत प्रशासकांनी बॅँक पूर्वपदावर आणली आहे.सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकांच्या राजकारणानेही जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. साताऱ्याची बँक राष्ट्रवादीकडे राहिली आहे. ती चांगल्या स्थितीत आहे; मात्र ‘सांगली’वरही प्रशासकीय कारवाई झाली होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ तीन वर्षांपूर्वी बरखास्त झाले होते. राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांचे निधन झाले, तर अनेक नेत्यांनी भाजपामध्ये जाणे पसंत केले. परिणामी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावरच जिल्ह्यातील राजकारणाची भिस्त आहे. शिवाय कॉँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले पतंगराव कदम यांनाही नव्याने जुळणी करावी लागणार आहे. सांगलीत भाजपाचे खासदार अणि चार आमदार असल्याने हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवितो, की राष्ट्रवादीच्या डावपेचांना बळी पडतो हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. साताऱ्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि किसनवीर सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका पारंपरिक राजकीय गटांत रंगणार आहेत. या कारखान्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे आणि त्याचे राजकारणावर मोठे परिणाम होत असतात. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच स्थानिक राजकारणाने उन्हाळ्याप्रमाणे राजकीय वातावरण तापणार-रंगणार आहे.