शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षातून ‘स्वच्छ’ भरारी

By admin | Updated: May 5, 2016 03:16 IST

अन्न, वस्र, निवारा यांबरोबरच जगण्याला हवा असतो सन्मान. आयुष्याला चळवळीचं रूप देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी ही व्यक्तिमत्त्वे प्रेरणादायी असतात.

- विजय बाविस्करअन्न, वस्र, निवारा यांबरोबरच जगण्याला हवा असतो सन्मान. आयुष्याला चळवळीचं रूप देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी ही व्यक्तिमत्त्वे प्रेरणादायी असतात.‘आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही’ हे समता गीत गात गात संघटित झालेल्या कचरावेचकांच्या न्याय्य हक्कांसाठी एक अशिक्षित महिला थेट जागतिक व्यासपीठावर जाते. आपले म्हणणे बेडरपणे मांडते. कचरावेचकांच्या मोर्चा-आंदोलनापासून मंत्रालयातल्या बैठकांपर्यंत ही महिला आपला आवाज उठवते. काम आणि कर्तृत्वभरारीमुळे आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या सुमन मरिबा मोरे यांना नुकतेच ‘सह्याद्री’ वाहिनीच्या हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्न, वस्त्र, निवारा एवढंच काही जणांच्या आयुष्याचं ध्येय असतं; मात्र जगण्याला हवा असतो सन्मान. आयुष्याला चळवळीचं रूप देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी ही व्यक्तिमत्त्वे प्रेरणादायी असतात.सुमन मोरे या मराठवाड्यात १९७२च्या भीषण दुष्काळात उस्मानाबाद जिल्ह्यातून पुण्यात आल्या. पडेल ते काम करीत गुलटेकडीतल्या पदपथावर मुलाबाळांसह हे कुटुंब राहिलं. त्यानंतर कचराकुंडीतलं विक्रीयोग्य भंगार गोळा करायला सुरुवात केली. हजारो कचरावेचक शहरात होते; परंतु त्यांच्यामध्ये एकसंधता नव्हती. पोलीस आणि इतर यंत्रणांकडून शोषण केलं जात होतं. कचरावेचकांची परवड थांबवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव व दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन ननावरे यांच्या कल्पनेतून ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ ही संघटना अस्तित्वात आली. कचरावेचकांमध्ये ८० टक्के महिलाच आहेत. यातीलच एक सुमन मोरे पौर्णिमा चिकरमाने, लक्ष्मी नारायण, शबाना दिलेर या समाजसेविकांनी या महिलांमध्ये व्यवस्थेविरुद्ध लढण्याची ऊर्जा निर्माण केली. सुमनतार्इंनीही या चळवळींमध्ये हिरिरीनं भाग घेतला. व्यवस्थेनं उपेक्षिताचं जिणं पदरात टाकलेलं होतं. त्यावर मात करून घरात त्यांनी शिक्षणाचा अंकुर रुजवला. डॉ. बाबा आढाव यांच्या शब्दांनी व विचारांनी प्रभावित झालेल्या सुमनतार्इंनी स्वत:च्या मुलांना शिकवलं. पती पोतराज असतानाही त्यांनी मुलांना जाणीवपूर्वक या देवपसाऱ्यातून बाजूला ठेवलं. कालांतरानं पुण्यातल्या कचराकुंड्या हद्दपार करण्याची मोहीम राबवली गेली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी ‘स्वच्छ’ संघटना स्थापन करण्यात आली. सध्या सुमनताई अध्यक्षपदी आहेत. नेपाळमधल्या कचरावेचकांना धडे देण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं. कचरा वर्गीकरण, त्याचे पर्यावरणीय फायदे त्यांनी समजावून सांगितले. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथं २०११मध्ये झालेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. या परिषदेत त्यांनी जगभरातल्या कचरावेचकांच्या व्यथा, कामातील अडचणी, समाजाचा दृष्टिकोन मांडून कचरावेचकालाही सन्मान मिळायला हवा; पर्यावरण रक्षणासाठी कार्बन कंट्रोलच्या नावाखाली बड्या कंपन्यांना जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळणारा निधी कचरावेचकांनाही मिळायला हवा, अशी रोखठोक भूमिका मांडली. स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक श्रम परिषदेत सलग दोन वेळा संघटनेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. निरक्षर असलेल्या सुमनतार्इंनी घेतलेली ही भरारी अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी आहे. कष्टकरी बांधवांचं अस्तित्व अद्यापही मान्य केलं जात नाही. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीची पतपेढी आहे. कचरावेचकांच्या विमा आणि पेन्शनसाठी व शिक्षण हक्क कायद्यासाठी मोठा लढा उभा केला आहे. त्यांना एन्व्हायर्नमेंट फोरम आॅफ इंडिया, सेवा त्याग आदि अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खरं कर्तृत्व वर्ण, जात, वंश, शिक्षण यांत नसतं, तर ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत:ला सिद्ध करण्याच्या संघर्षात असतं, हेच सुमन मोरे यांनी सिद्ध केलं आहे. त्यांना सलाम.