शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

चातुर्मास्यारंभ !

By admin | Updated: July 10, 2016 03:58 IST

परंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे.

- रविप्रकाश कुलकर्णीपरंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे. एरव्ही आपला संबंध असतो तो इसवीसन दाखवणाऱ्या (ग्रेगरीअन) कॅलेंडरशी. पाऊस आला की वातावरण बदलते. आषाढाची ती चाहूलखुण असते आणि आषाढ म्हटला की, अजूनही 'आषाढस्थ प्रथम दिने' म्हणणाऱ्या कालिदासाची आठवण अपरिहार्यच. जरी संस्कृतशी तसा संबंध राहिला नाही तरी! हा संस्काराचा कळत-नकळत झालेला संस्कार, नाहीतर दुसरे काय? मग येते ती आषाढी एकादशी- पंढरपूरची वारी चातुर्मास्यारंभाची सुरुवात. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्मिक शुद्ध एकादशी हा तो चर्तुमास (तारखेप्रमाणे यंदा १५ जुलैला सुरुवात आहे) व्रतवैकल्य, जपजाप्य आणि कुठकुठले यमनियम. शरीर आणि मन यांना भरकटण्यापासून वाचवण्यासाठी केलेली ही योजना. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम यामागे हेच सूत्र दिसते. सण, उत्सव, नेम आणि व्रत यामागची भूमिका हीच आहे, असणार. चार्तुमासातील एक आचार म्हणजे ग्रंथवाचन. चातुर्मास्याचा हा काळ उपासना करण्यासाठी व ती वाढविण्यासाठी फारच अनुकूल असतो. कारण या पर्वकाळातील केलेली कृत्ये फलदायी होतात, असा अनुभव असल्याने या चार महिन्यांत शरीर आणि मन यांना शिस्त लागण्यासाठी विशेष आचार-विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न होतो. मनाला संयम करण्याची सवय लागते आणि त्यायोगे ते अधिक प्रभावशाली बनते हे दिसून येते. यामुळे असेल या चार महिन्यांत विविध ठिकाणी ग्रंथपठणाचे सार्वजनिक आयोजन केलेले दिसते. अशा ठिकाणी एक जण ज्याचा आवाज खणखणीत आहे, असा ग्रंथ वाचतो आणि त्याचे विवेचनही करतो, जे त्या ग्रंथातच केलेले असते. सर्वसाधारणपणे ज्ञानेश्वरी, पांडवप्रताप, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, दासबोध अशा धार्मिक ग्रंथांचा वाचनात समावेश असतो, पण हे श्रवण नेहमी आपण म्हणतो, ते श्रवण नसते तर त्यात कुठेतरी श्रद्धेचा अंत असतो. मी जे काही करतो आहे, ते पुण्याकर्म असून त्याचे मला फळ मिळेल, अशी आता त्यामागे असतेच असते. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ यामागे तो अर्थ आहे. हा एक प्रकारचा गुंता आहे खरा. याचे सुरेख अनुभवामृत दि. बा.मोकाशी यांच्या ‘आमोद सुवासी आले’ या कथेत आलेआहे.बाकी श्रोते हे श्रवण करतात. त्याचा आनंद घेतात. ज्या काळात ग्रंथ ही गोष्टच दुर्मीळ होती. आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि साक्षरतेचा प्रसारदेखील तळागाळात पोचला नव्हता, अशा काळातील ही व्यवस्था होती. एक प्रकारे त्या काळातला हा बुक क्लब होता, असे म्हणावे काय? श्रद्धेचे हे बळ मिळत असावंतुकाराम महाराजांनी म्हटले आहे - उदंड पाहिले, उदंड ऐकिलेउदंड वर्णिले, क्षेत्र महिमेऐसी चंद्रभागा ऐसे भिमातीरऐसे संतजन ऐसे हरिदासऐसा नामघोष सांगा कोठेतुका म्हणे आम्हा आकाश कारणेपंढरी निर्माण केली देणेपण सगळ्यांनाच त्या पंढरीत प्रत्यक्ष जाता-पाहता येत नाही. वारी आणि चतुर्मासाची सांगड अशी घातली गेली असेल का?निसर्ग आणि माणसे यांचे नाते सांभाळण्याचाच प्रकार एके काळी सांगितलेला दिसतो, पण माझ्या आजच्या जीवनकाळात तो बसवता येऊ शकतो काय?आजच्या घडीला त्याची आवश्यकता समर्थपणे मांडण्याची गरज आहे, असे वाटते, पण खरे सांगायचे तर आम्ही संभ्रमावस्थेत आहोत. जुने आम्हाला धरवत नाही, नव्याला सामोरे जाता येत नाही. कारण त्याचा नक्की ठावठिकाणा आम्हालाच ठाऊक नाही...अशा वेळी ना. ग. गोरे यांची आठवण येते.नानासाहेब गोरे म्हणजे पूर्ण नास्तिक, बुद्धिवादाची कास धारणारे असा त्यांचा लौकिक होता, पण पंढरपूरला ते गेले, तेव्हा विठोबासमोर ते नतमस्तक झाले! नानासाहेबांनी लिहिले आहे, जिथे पिढ्यान्पिढ्या लक्षावधी स्त्री-पुरुषांनी लोटांगण घातले, तिथे हातही न जोडणारा मी कोण? असा सवाल हृदयातून आला व माझे हात मी जोडले!चातुर्मासारंभाच्या निमित्ताने असे काय-काय आठवत आहे. वास्तविक, लं. रा. पांगारकरांचा 'भक्तिमार्गप्रदीप' याची जन्मकथा ज्याने एके काळी ग्रंथ विक्रीचा उच्चांक केला. संपूर्ण चातुर्मास कसे निघाले, त्याबद्दल सांगायचे होते, पण त्यासाठी पुढचे चार महिने आहेतच की.