शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

श्रेयासाठी चढाओढ

By admin | Updated: March 5, 2016 03:19 IST

मंजुरीचे आदेश आणणे आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम घेऊन विकास कामांचे स्वप्न दाखविणे असा एककलमी कार्यक्रम खान्देशात सुरु आहे.

मंजुरीचे आदेश आणणे आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम घेऊन विकास कामांचे स्वप्न दाखविणे असा एककलमी कार्यक्रम खान्देशात सुरु आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या मंत्रालयाकडून मंजुरीचे आदेश आणायचे आणि धडाक्यात भूमीपूजन उरकायचे. मोठा कार्यक्रम घेऊन जणू काम पूर्ण झाल्याचा आव आणायचा. बरं कामंदेखील थोडीथोडकी नव्हे तर कोटीच्या कोटी उड्डाणे...सामान्य माणसाने दिपून जावे, असा सगळा देखावा. कार्यक्रम उरकल्यानंतर महिना-दोन महिन्याने कुणी विचारले तर सर्वेक्षण सुरु आहे, निविदाप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे, राज्य सरकारचे योगदान बाकी आहे, मंत्र्यांकडे वेळ मागितली आहे, असे उत्तर तोंडावर मारुन फेकले जाते. यापेक्षा अधिक करमणूक होते, श्रेयासाठी चढाओढ लागल्यावर. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. धुळेकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. यापूर्वी चारवेळा या मार्गाचे सर्वेक्षण झाले. यंदा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पावले आणि या मार्गासाठी ४९८४ कोटी रुपयांची तरतूद केली. एकूण ९९६८ कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला लागणार आहे. उर्वरित रक्कम महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारांना द्यावी लागणार आहे. मंजुरीचा आनंद धुळेकरांना झाला असला तरी सत्ताधारी भाजपाच्या आमदार आणि खासदारांमध्ये श्रेयावरुन चढाओढ सुरु झाली. भाजपा आणि गोटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसंग्राम यांनी स्वतंत्रपणे आनंदोत्सव साजरा केला. खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत श्रेय स्वत:कडे घेताना दावा केला की, खासदार झाल्यापासून दिल्लीत शंभरावर चकरा मारल्या त्या केवळ याच रेल्वे मार्गासाठी. आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून खासदारांसोबत आपणही प्रयत्न केल्याचा दावा केला. अनिल गोटे प्रथमच भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते अपक्ष आमदार होते. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे सूर अद्याप जुळलेले नाही. त्याचा भडका अधूनमधून उडतो. गोटेंच्या टीकेमुळे भाजपा नेते चांगलेच खवळले. ज्येष्ठ नेते हिरामण गवळी यांनी तर पक्षशिस्तीचे पालन न करणाऱ्या गोटेंविरोधात सरळ संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. अखेर गोटे यांनी नमते घेत दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर पडदा पडला. आठवड्यात दुसऱ्यांदा भाजपा आमदारांमध्ये श्रेयवाद सुरु झाला. निमित्त ठरले ते शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा योजनेला केंद्र सरकारच्या मंजुरीचे. २२६० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला राज्य सरकारच्या वित्त विभागाची मान्यता अद्याप मिळालेली नाही. परंतु अनिल गोटे आणि शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यात चढाओढ सुरु झाली. ही योजना मंजूर करुन आणण्यासाठी किती दिल्लीवारी केल्या, केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारतींना कसे साकडे घातले याचे दाखले दोन्ही आमदार देत आहेत. गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यातही ही चढाओढ दिसून आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महाआरोग्य शिबीर घेतले. महाजन यांचे आरोग्य क्षेत्रात कार्य असल्याने मुंबई, पुण्याचे मोठे डॉक्टर आले होते. गोरगरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली. काहींच्या शस्त्रक्रिया झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटनासाठी आले. नेमक्या याचवेळी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे परदेशात गेले होते. त्यांचे समर्थक शिबिरापासून अंतर राखून होते, तर विरोधक शिबिरात आघाडीवर होते. त्यानंतर खडसे यांनी १६०० कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या शुभारंभाचा धडक कार्यक्रम भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेतला. मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.श्रेयासाठी चढाओढ करणारी ही मंडळी प्रत्यक्ष कामे होण्यासाठी कधी प्रयत्न करणार हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. - मिलिंद कुलकर्णी