शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

वास्तव सिनेमात की सिनेमा वास्तवात

By admin | Updated: April 24, 2015 23:53 IST

सिनेमाचे आणि खासकरून हिन्दीतील मारधाड छाप सिनेमाचे कठोर टीकाकार नेहमी म्हणत असतात की, काय रे, तुमचे आजकालचे सिनेमे, सगळी

सिनेमाचे आणि खासकरून हिन्दीतील मारधाड छाप सिनेमाचे कठोर टीकाकार नेहमी म्हणत असतात की, काय रे, तुमचे आजकालचे सिनेमे, सगळी पिढी बरबाद करून राहिलेत. त्यावर सिनेमावाल्यांचे उत्तर नेमके त्याच्या उलट. ते म्हणतात, जे वास्तवात घडत असतं, तेच तर आम्ही सिनेमात दाखवतो. काही वर्षांपूर्वी मुंबईतील एका जवाहिऱ्याच्या पेढीवर अत्यंत धाडसी आणि चतुर दरोडा पडला. त्याचा आजतागायत छडा लागलेला नाही. त्या दरोड्याचीच कथा एका सिनेमाच्या माध्यमातून मांडली गेली आणि सिनेमा भयानक लोकप्रिय झाला. त्यामुळे या दोन्ही युक्तिवादांमध्ये तसं अर्धसत्य का होईना नक्कीच लपलेलं असतं. सिनेमातील किंवा अमुक मालिकेतील प्रसंग पाहून आम्ही चोरी किंवा अपहरणाचा डाव रचला, अशी कबुली देणारे बालगुन्हेगार अलीकडे बऱ्याचदा आढळून येतात. पण सिनेमा वा मालिकेचा प्रभाव केवळ अशा बालगुन्हेगारांवर वा थोराड गुन्हेगारांवरच पडत असतो, असेही नाही. मध्यंतरी जयपूरच्या एका न्यायाधीशानीदेखील आपण सिनेमाच्या कसे प्रभावाखाली आलो आहोत, हे दाखवून दिले होते. त्यांच्या कोर्टात एका साक्षीदाराने चुकीची वा खोटी साक्ष दिली. इंग्रजीत याला परज्युरी म्हणतात. विदेशात हा मोठा गुन्हा मानला जातो. पण भारतात मात्र त्याला अद्याप तितके गंभीरपणे घेतले जात नाही. त्यामुळे जयपूरच्या न्यायाधीशानी काय करावं? त्यांनी खोटी साक्ष देणाऱ्या व्यक्तीला भर न्यायालयातच ‘मुर्गा बन’ अशी शिक्षा सुनावली. फास्ट ट्रॅक न्याय यालाच म्हणत असावेत ! मात्र ही शिक्षा न्यायाधीश महाराजांना शंभर टक्के सुचली ती एका हिन्दी सिनेमातून. तो सिनेमा ‘जॉली एलएलबी’. म्हटलं तर या सिनेमाची कथा तशी काल्पनिक. राजधानी दिल्लीत घडलेल्या एका गुन्हेगारी अपघाताचे बीज घेऊन कथेचा काल्पनिक फुलोरा फुलवलेला. पण कल्पितापेक्षा वास्तव कधीकधी नव्हे तर अनेकदा कसे अधिक भयानक वा गंभीर असते, याची जाणीव आता याच सिनेमातील कथा आणि वास्तवातील सलमान खान या नटाने मुंबईत केलेला अपघात या दोहोंच्या माध्यमातून होऊ लागली आहे. सिनेमातील एका धनिकबाळाने रात्रीच्या वेळी भरधाव गाडी पळवताना पदपथावर झोपलेल्या काही लोकाना गाडीखाली चिरडलेले असते. तोच प्रकार सलमान खानच्या गाडीने केला. त्याला आता वर्षे झाली तेरा ! पण खटल्याचा निकाल अजून यायचाच आहे व तो येत्या सहा तारखेस येईल असे जाहीर झाले आहे. सिनेमात जे ‘तारीख पे तारीख’ दाखवतात ते आणि तसेच या खटल्याचेही सुरू आहे. सलमानच्या गाडीखाली एक इसम दगावला म्हणून सलमानच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम लावायचे की नाही याचा गुंता खालच्या न्यायालयापासून तो थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. अखेर त्या वरिष्ठ न्यायालयाने खालच्या न्यायालयानेच ठरवावे असा हुकुम दिला आणि तेव्हा कुठे सदोष मनुष्यवधाचे कलम लावले गेले. दुसरा आरोप सलमान नशापान करून गाडी चालवीत होता आणि नशेत त्याने गाडी फूटपाथवर चढविली. त्यावेळी सलमानच्या ‘संरक्षणासाठी’ एक पोलीस त्याच्या गाडीत होता. दरम्यान या पोलिसाचे निधन झाले. त्यानंतर सुरू झाले वकिली डावपेच. सलमान दारू पिला होता की नव्हता आणि दारू पिऊन स्वत: गाडी चालवीत होता की नव्हता व त्याचबरोबर फूटपाथवरचा जो गरीब दगावला तो सलमान चालवीत असलेली गाडी त्याच्या अंगावर गेल्याने की अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने ती गाडी उचलताना क्रेनच्या जबड्यातून सुटलेली ती गाडी त्याच्या अंगावर पडल्याने या तीन मुद्द्यांभोवती सारे डावपेच फिरत राहिले. सलमानच्या वकिलाने केलेले युक्तिवाद आणि ‘जॉली’मध्ये बमन इराणीने केलेले युक्तिवाद यात कमालीच्या बाहेर साम्य आढळून येते. सलमान दारू प्यायलेलाच नव्हता. त्याच्या शरीरातून तपासणीसाठी जास्तीचे रक्त म्हणे काढून घेतले आणि नंतर प्रयोगशाळेमध्ये या रक्तात भरपूर मद्यार्क मिसळला गेला. याचा अर्थ तो दारुबिरू काही प्यायला नव्हता! तो ती अपघातग्रस्त गाडीदेखील स्वत: चालवीत नव्हता. कारण त्याच्या चालकाने भरपूर विचाराअंती तशी कबुली दिली आणि एका प्रत्यक्ष साक्षीदाराने म्हणे त्याला चालकाच्या बाजूच्या नव्हे तर विरुद्ध बाजूच्या दरवाजातून बाहेर पडताना बघितले होते. पण हा विरुद्ध बाजूचा दरवाजा अपघातामुळे घट्ट लागलेला होता, तेव्हा तो उघडेलच कसा, हेही सिद्ध झाले. जॉलीमधला फिर्यादी पक्षाचा वकील (अर्सद वारसी) म्हणतो, काही दिवस हा खटला असाच चालू राहिला तर ‘राजपाल साब (बमन) यह भी साबीत कर देंगे कि हादसा कार से नही, हवाई जहाज से हुआ था’ सलमानच्या खटल्याच्या बाबतीत नेमके असेच सुरू आहे. या खटल्याचे गांभीर्य संपून आता त्याला टिंगल टवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सामाजिक माध्यमांमधून टवाळीचे अनेक संदेश फिरत आहेत. सिनेमातील न्यायाधीश (सौरव शुक्ला) अखेरीस म्हणतो, मला पहिल्याच दिवशी गुन्हेगार कोण हे माहीत होते. पण पुराव्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. ते पुरावे न्यायालयासमोर येऊच नयेत म्हणून सिनेमातील पोलीस अधिकारीच धडपडत असतो. सिनेमातील ते वास्तव सलमानच्या वास्तवातही दिसून येते वा नाही हे आता लवकरच जगासमोर येऊ शकेल.