शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

अणुसंशोधनाचा ९९ टक्के वापर शांततेसाठी

By admin | Updated: August 2, 2015 04:19 IST

दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि ही दोन शहरे बेचिराख करून टाकली.

- अ.पां. देशपांडे (लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत.)

दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि ही दोन शहरे बेचिराख करून टाकली. अणुबॉम्ब हल्ल्यांचा परिणाम आजही या दोन शहरांना भोगावा लागत असून, स्वत:ला संरक्षित करण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या हाती घेतल्या आहेत. मात्र असे असले तरीही अणुशस्त्र आणि अणुसंशोधनाचा ९९ टक्के वापर हा आजघडीला विश्वशांतीसाठी केला जातो आहे.भारताचा विचार करायचा झाला तर १९४५ साली डॉ. होमी भाभा यांनी अणुशस्त्र आणि अणुसंशोधनाबाबत चिंतन सुरू केले. १९४७ साली पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाल्यानंतर होमी भाभा यांच्या विचारविनिमयाला जोड मिळाली. शिवाय नेहरू यांनी अणुसंशोधनास पाठिंबाही दिला. अणुसंशोधनाचा वापर शांततेसाठी कसा करता येईल? याबाबत नेहरू आणि होमी भाभा यांच्यात चर्चा झाल्या. चर्चेअंती अणुसंशोधनाला उत्तरोत्तर जोड मिळत गेली. कालांतराने आपल्याकडे ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेटल रिसर्च’ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे संशोधनाला वेग मिळाला. तेथे ‘अ‍ॅटॉमिक न्युक्लिअर रिअ‍ॅक्टर’ची निर्मिती करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यासाठी प्रा. भालचंद्र उदगावकर हे स्वत: फ्रान्समध्ये दोन वर्षांच्या अभ्यासासाठी गेले. त्यानंतर काही कालावधीतच आपल्याकडे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’ची स्थापना करण्यात आली.‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’ची स्थापना झाल्यानंतर येथेही ‘अ‍ॅटॉमिक न्युक्लिअर रिअ‍ॅक्टर’च्या निर्मितीसाठी सुरुवात करण्यात आली. याचवेळी प्रा. उदगावकर यांच्या अधिपत्याखाली पहिल्या बॅचचे प्रशिक्षणही सुरू झाले. त्यानंतर अणुसंशोधनात देशाने झेप घेतली. आजघडीचा विचार केला तर अणुसंशोधनामुळे अनेक क्षेत्रांचा विकास झाला आहे. आरोग्य क्षेत्र असो वा कृषी क्षेत्र प्रत्येक क्षेत्राला अणुसंशोधनामुळे चालना मिळाली आहे. कर्करोगातील संशोधनाला अणुसंशोधनाने जोड दिली आहे. कोल्हापूरजवळ भुईमुगावर अणुसंशोधनाचा प्रयोग झाला आहे. धान्य साठवण्यासाठी अणुसंशोधन लाखमोलाची भूमिका बजावत आहे. विशेषत: परळमधील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट हेदेखील ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’ चालवत आहे. अणुसंशोधनाचा इंडस्ट्रीयल क्षेत्रासाठी वापर केला जातो आहे. एक्स-रे शिवाय मेडिकलमध्येही अणुसंशोधन लाखमोलाची भूमिका बजावत आहे. तेल वाहून नेणाऱ्या वाहिन्या साफ करण्यासह जाळे विस्तारण्यासासाठी अणुसंशोधनाचा वापर केला जातो आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अणुबॉम्ब हा अणुसंशोधनाचा अगदी छोटा भाग आहे. शत्रूला भीती घालण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु समजा एकदा अणुबॉम्ब बनवून ठेवला तर त्याचे पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. म्हणून जगभराचा विचार करता अगदी आजघडीला अमेरिकासुद्धा अणुसंशोधनाचा वापर हा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी करत आहे.