शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

महामार्गावर मोठ्या पाईप मोरीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

धुळे : शहराला वळसा घालून जाणाऱ्या सुरत-नागपूर महामार्गाच्या बायपास हायवेवर चितोड गावाजवळ मोठ्या पाईप मोरीचे काम भारतीय राष्ट्रीय राजमागर्ग ...

धुळे : शहराला वळसा घालून जाणाऱ्या सुरत-नागपूर महामार्गाच्या बायपास हायवेवर चितोड गावाजवळ मोठ्या पाईप मोरीचे काम भारतीय राष्ट्रीय राजमागर्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागाने युध्द पातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापासून चितोड गावातील नाल्याकाठच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या कामासाठी महामार्गावरची वाहतूक दोन दिवसांसाठी शहरातून वळवली आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात मोती नाल्याला आलेल्या पुरामुळे चितोड गावात नाला काठावरील वस्तीमध्ये पाणी शिरले होते. शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाल्याला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या रहिवाशांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आसरा घ्यावा लागला होता. महामार्ग चाैपदरीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित विभागाने उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोती नाल्यावर बांधलेली तात्पुरती पाईप मोरी सदोष असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. नुकसान भरपाईची मागणी केली होती. पाईप मोरीसाठी लहान आकाराचे पाईप वापरल्याने मोती नाल्याला आलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही. शिवाय उड्डाणपुलासाठी केलेल्या मातीच्या भरावामुळे पाणी अडविले जाते. त्यामुळे नाल्यात पाण्याची पातळी वाढून पाणी गावात शिरते, अशी रहिवाशांची तक्रार होती. गावातील ज्येष्ठ नेते गाैतम गायकवाड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशाने प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. कामात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एनएचएआयने पाईप मोरीचे काम हाती घेतले आहे. मोठ्या आकाराचे सहा पाईप टाकले जाणार आहेत. त्यामुळे नाल्याला आलेल्या पाण्याचा निचरा होईल. गुरुवारी दुपारी हे काम हाती घेतले. दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पाईपमोरीचे काम सुरू करण्यापूर्वी गुरुवारी सकाळपासून वळण रस्त्यावरील वाहतूक बंद करून वाहनांचा मार्ग शहरातून वळविण्यात आला होता. साक्रीकडून येणारी वाहने साक्री रोडने थेट शहरात येत होती तर मुंबई-आग्रा महामार्गावरून साक्रीकडे जाणाऱ्या वाहनांना स्टेशन रोडने वळविण्यात आले होते. त्यामुळे शहरातील साक्री रोड, स्टेशन रोड, शासकीय दूध डेअरी रोड आणि चितोड रोडवर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची बाब लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांची वाहने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी सूचना देत होती.

दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे वळण रस्त्याची वाहतूक दोन दिवस बंदच राहिले. अवजड वाहनांची वर्दळ शहरातून वाढेल. असे असले तरी एका दिवसात काम पूर्ण करण्याचे प्रयत्न या विभागाकडून केले जात आहेत. असे झाले तर शुक्रवारी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल.