शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

महामार्गावर मोठ्या पाईप मोरीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

धुळे : शहराला वळसा घालून जाणाऱ्या सुरत-नागपूर महामार्गाच्या बायपास हायवेवर चितोड गावाजवळ मोठ्या पाईप मोरीचे काम भारतीय राष्ट्रीय राजमागर्ग ...

धुळे : शहराला वळसा घालून जाणाऱ्या सुरत-नागपूर महामार्गाच्या बायपास हायवेवर चितोड गावाजवळ मोठ्या पाईप मोरीचे काम भारतीय राष्ट्रीय राजमागर्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागाने युध्द पातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापासून चितोड गावातील नाल्याकाठच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या कामासाठी महामार्गावरची वाहतूक दोन दिवसांसाठी शहरातून वळवली आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात मोती नाल्याला आलेल्या पुरामुळे चितोड गावात नाला काठावरील वस्तीमध्ये पाणी शिरले होते. शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाल्याला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या रहिवाशांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आसरा घ्यावा लागला होता. महामार्ग चाैपदरीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित विभागाने उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोती नाल्यावर बांधलेली तात्पुरती पाईप मोरी सदोष असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. नुकसान भरपाईची मागणी केली होती. पाईप मोरीसाठी लहान आकाराचे पाईप वापरल्याने मोती नाल्याला आलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही. शिवाय उड्डाणपुलासाठी केलेल्या मातीच्या भरावामुळे पाणी अडविले जाते. त्यामुळे नाल्यात पाण्याची पातळी वाढून पाणी गावात शिरते, अशी रहिवाशांची तक्रार होती. गावातील ज्येष्ठ नेते गाैतम गायकवाड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशाने प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. कामात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एनएचएआयने पाईप मोरीचे काम हाती घेतले आहे. मोठ्या आकाराचे सहा पाईप टाकले जाणार आहेत. त्यामुळे नाल्याला आलेल्या पाण्याचा निचरा होईल. गुरुवारी दुपारी हे काम हाती घेतले. दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पाईपमोरीचे काम सुरू करण्यापूर्वी गुरुवारी सकाळपासून वळण रस्त्यावरील वाहतूक बंद करून वाहनांचा मार्ग शहरातून वळविण्यात आला होता. साक्रीकडून येणारी वाहने साक्री रोडने थेट शहरात येत होती तर मुंबई-आग्रा महामार्गावरून साक्रीकडे जाणाऱ्या वाहनांना स्टेशन रोडने वळविण्यात आले होते. त्यामुळे शहरातील साक्री रोड, स्टेशन रोड, शासकीय दूध डेअरी रोड आणि चितोड रोडवर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची बाब लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांची वाहने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी सूचना देत होती.

दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे वळण रस्त्याची वाहतूक दोन दिवस बंदच राहिले. अवजड वाहनांची वर्दळ शहरातून वाढेल. असे असले तरी एका दिवसात काम पूर्ण करण्याचे प्रयत्न या विभागाकडून केले जात आहेत. असे झाले तर शुक्रवारी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल.