शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ? कररचनेत बदल न केल्याने करधारकांना दिलासा : युवक, गृहिणी व शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

अर्थसंकल्पातून मोठ्या सवलती मिळालेल्या नाहीत, मात्र आयकरात वाढदेखील झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच रस्ते, रेल्वे व पायाभूत ...

अर्थसंकल्पातून मोठ्या सवलती मिळालेल्या नाहीत, मात्र आयकरात वाढदेखील झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांच्या निधीत महाराष्ट्राला झुकते माफ दिले आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल.

- नरेंद्र नहार, व्यापारी

कापसावरील कस्टम ड्युटी वाढवल्याने कापसाचे भाव काही प्रमाणात वाढतील. मात्र शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पूर्ण करण्यात कितपत यश मिळेल याबाबत शंका वाटते. कृषी क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद होईल अशी अपेक्षा होती. पण, कोणतीही तरतूद न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

- ॲड. प्रकाश पाटील, कृषीभूषण शेतकरी

स्टार्टअपबाबत मोठी घोषणा होईल अशी तरुणांना अपेक्षा होती. मात्र त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने तरुण व्यवसायाच्या संधी शोधात आहेत. व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याच्या योजनांचा लाभ कमी तरुणांना मिळतो.

- मनोज चिंचोरे, युवक

वाहनांचे सुटे भाग महाग होणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. मागील वर्षी ९ महिने पूर्णपणे व्यवसाय बंद होता. वाहन खराब झाल्यास दुरुस्तीसाठी जादा पैसे मोजावे लागतील, त्यामुळे निराशा झाली.

- गोपाल वाघ, ऑटोचालक

मागील वर्षीचीच कर रचना ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे आयकरातील सूट कमी होईल असे वाटत होते. मात्र त्यात बदल न झाल्याने दिलासा मिळाला आहे.

- राहुल अग्रवाल, व्यापारी

निराधार ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरावा लागणार नाही अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ही घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र बँकेत ठेवी असलेल्या ज्येष्ठांनाही आयकरातून सुटका मिळायला हवी होती.

- शांताराम पाटील, ज्येष्ठ नागरिक

कोरोनाकाळात आमचा रोजगार पूर्णपणे बुडाला होता. अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील व्यावसायिक कामगारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्याबाबत घोषणा झाली नाही.

- गौतम अमृतसागर, भाजीपाला विक्रेता

तांब्याच्या वस्तू महाग होणार आहेत. मात्र विम्याचे हफ्ते व विजेचे बिल स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली. सध्या विजेचे बिल जास्त येत आहे. विजेचे बिल कमी आले तर चांगले होईल.

- सुवर्णा पाटील, गृहिणी

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र व पायाभूत सुविधांच्या विकासाला अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. उद्योग क्षेत्राला गती मिळाली तर अधिक रोजगार निर्मिती व्हायला मदत होईल.

- योगेश सोनवणे, खासगी नोकरदार

अर्थसंकल्पात पेट्रोलवरील सेस वाढवण्यात आला आहे. त्याचा ग्राहकांना कोणताही तोटा होणार नाही. मात्र पेट्रोल व डिझेलवर कोरोना काळात लावलेला अधिभार कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र तशी कोणतीही तरतूद झाली नाही.

- राकेश जगताप, पेट्रोलपंप चालक