शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST

अतुल जोशी धुळे : गेल्या काही वर्षांपासून कपाशीखालोखाल सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या पिकाला भावही चांगला ...

अतुल जोशी

धुळे : गेल्या काही वर्षांपासून कपाशीखालोखाल सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या पिकाला भावही चांगला मिळतो. मात्र, सोयाबीनवर आलेल्या ‘मिली बग’मुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नांचा पुन्हा एकदा चुराडा झाला आहे.

अनियमित पाऊस, वातावरणातील बदलाचा शेतीला फटका बसू लागला आहे. पीक वाढू लागले की, त्यावर विविध कीडरोगांचाही प्रादुर्भाव होत असतो. यामुळे उत्पन्नात घट येते. तसेच शेतात उत्पन्न आले की, भावही घसरतात. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही.

सध्या कपाशीला चांगला भाव मिळतो. त्याखालोखाल आता सोयाबीनला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल वाढलेला आहे. मात्र या पिकालाही आता ‘मिली बग’ने ग्रासलेले आहे.

काय आहे मिली बग?

मिली बग हा रस शोषण करणारा किडा आहे. तो कापूस, भेंडी, सोयाबीन आदी पिकांच्या कोवळ्या भागावर बसतो. त्याचा रस शोषत असतो. तसेच द्रव्य बाहेर टाकत असतो. पांढऱ्या रंगाचा हा किडा असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होते.

मिली बग रोखण्यासाठी ही घ्यावी काळजी

n मिली बग रोखण्यासाठी एक टक्का साबणाच्या द्रावणाची फवारणी करावी. नंतर आंतरप्रवाही औषध फवारल्यास त्यामुळे ही कीड नियंत्रणात येते.

n हे कीड सर्व प्रथम बांधावर आढळून येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे बांध स्वच्छ केल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही?

सोयाबीनला भाव चांगला मिळतो. त्यामुळे त्याची लागवड केली. मात्र, या पिकावरही मिली बगचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने खर्च निघेल की नाही, याची शक्यता कमी वाटते.

-देविदास पाटील,

शेतकरी

कपाशीपाठोपाठ आता सोयाबीनला भाव मिळायला लागला आहे. परंतु आता या पिकालाही किडीने ग्रासलेले आहे. उत्पन्न कसे येईल, हे सांगता येत नाही.

-संजय पाटील

शेतकरी

मिली बगचा भाग कापावा

ज्या भागावर मिली बग आढळून येतो, तो भाग कात्रीने कापून टाकावा. तसेच कापून जमा झालेला कचरा जाळून टाकावा. म्हणजे मिली बगचा आणखी प्रादुर्भाव होऊ शकणार नाही. असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.