शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

विरोधकांनी जि.प.त सत्तांतराची स्वप्ने पाहू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या ...

जिल्हा परिषद, पंचायत समितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयामुळे धुळे जि.प.तील १५ व पंचायत समितीच्या ३० अशा एकूण ४५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी संभाव्य पोटनिवडणूक, रणनीती याबाबत जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वच प्रश्नांची समर्पक उत्तरे देत विरोधकांचाही समाचार घेतला. त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असा...

प्रश्न - न्यायालयात भूमिका मांडली का?

डॉ. रंधे - सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे ४५ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. जि.प.च्या वतीने आम्हीही पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी पुढील आठवड्यात होईल. काय निर्णय लागतो याची प्रतीक्षा आहे.

प्रश्न - पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली का?

डॉ. रंधे - निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र, पोटनिवडणूक लागल्यास आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू.

प्रश्न - सर्व जागांवर विजयाची खात्री आहे का?

डॉ.रंधे - भाजपच्या ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे, ते सर्व ४-५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेले होते. त्यामुळे त्या जागांवर आमचा विजय निश्चित आहे. मात्र, गेल्या वेळी ज्या जागांवर आमचा पराभव झाला त्या जागाही आम्ही जिंकू.

प्रश्न - जि.प.त सत्तांतर होईल, असे विरोधक म्हणत आहेत?

डॉ. रंधे - विरोधकांकडे अगोदरच संख्याबळ कमी आहे. पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भाजपच्याच ताब्यात राहणार आहे. विरोधकांनी जिल्हा परिषदेत सत्तांतराचे स्वप्न पाहू नये.

प्रश्न - कुठल्या बळावर आपल्याला विजयाची खात्री आहे?

डॉ. रंधे - आम्हाला जि.प. सत्तेत येऊन वर्षाचाच कालावधी झालेला आहे. वर्षभरात अनेक विकासकामे केली आहेत. या कामांची पावती आम्हाला पोटनिवडणुकीत निश्चितच मिळेल.

प्रश्न - महाविकास आघाडीचा काही परिणाम होईल का?

डॉ. रंधे - महाविकास आघाडीचा भाजपवर कुठलाच परिणाम होणार नाही. नागारिकांचा भाजपवरच विश्वास आहे.