शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दोंडाईचा येथे १ हजार ३१७ दहावीचे विद्यार्थी परीक्षेविना पोहोचणार वरच्या इयत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत ...

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत मूल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असले तरी ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावयाची असेल त्यांनाही वेगळी संधी दिली जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ढ विद्यार्थीही आटोमॅटिक पास झाला आहे.

दरम्यान, अंतर्गत मूल्यमापन करण्यासंदर्भात गाईडलाईन शिक्षण मंडळ लवकरच जाहीर करणार आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणीही झाली नाही. तत्पूर्वी शासनाने पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यात १२ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोंडाईचात एकंदरीत पहिली ते अकरावीच्या वर्गात १८ हजार ७६२ विद्यार्थी विनापरीक्षा पुढील वर्गात जाणार आहेत. यात १ हजार ५८५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

इंग्रजी माध्यमासह मराठी माध्यमाच्या हुशार विद्यार्थ्यांनी दहावी वर्गाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन शिकवणी व ऑनलाइन वर्ग अटेंड करून फायदा झाला नसून, अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे,असे म्हटले आहे.

१: विरपाल गिरासे- पालक : वाढत्या कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय योग्य आहे. परंतु, मुलगा सलग चार-पाच तास अभ्यास करीत असतानाच त्याच्या अभ्यासाचे मूल्यमापन होणार नाही. तरीही आताच्या परिस्थितीत जीव महत्त्वाचा आहे.

२: संगीता पाटील - पालक

: मुलीने ऑनलाईन वर्गासह, खासगी ऑनलाईन शिकवणी वर्गातून अभ्यास केला. मागील वर्षाचे प्रश्नसंचही सोडविले होते. पुढील शिक्षणाचे नियोजन पण झाले होते. आता अंतर्गत मूल्यमापनने पास केले जाणार आहे. कोरोना असला तरी वेगळे नियोजन करून परीक्षा होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत पण करतो.

३:विनोद माळी : विद्यार्थी - कोरोनाचा संसर्ग पाहता शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्यासारख्या अनेक गरीब मुलांकडे शालेय व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल नाही. आमचा संपूर्ण अभ्यास झाला नव्हता.