शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

दोंडाईचा येथे १ हजार ३१७ दहावीचे विद्यार्थी परीक्षेविना पोहोचणार वरच्या इयत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत ...

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत मूल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असले तरी ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावयाची असेल त्यांनाही वेगळी संधी दिली जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ढ विद्यार्थीही आटोमॅटिक पास झाला आहे.

दरम्यान, अंतर्गत मूल्यमापन करण्यासंदर्भात गाईडलाईन शिक्षण मंडळ लवकरच जाहीर करणार आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणीही झाली नाही. तत्पूर्वी शासनाने पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यात १२ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोंडाईचात एकंदरीत पहिली ते अकरावीच्या वर्गात १८ हजार ७६२ विद्यार्थी विनापरीक्षा पुढील वर्गात जाणार आहेत. यात १ हजार ५८५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

इंग्रजी माध्यमासह मराठी माध्यमाच्या हुशार विद्यार्थ्यांनी दहावी वर्गाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन शिकवणी व ऑनलाइन वर्ग अटेंड करून फायदा झाला नसून, अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे,असे म्हटले आहे.

१: विरपाल गिरासे- पालक : वाढत्या कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय योग्य आहे. परंतु, मुलगा सलग चार-पाच तास अभ्यास करीत असतानाच त्याच्या अभ्यासाचे मूल्यमापन होणार नाही. तरीही आताच्या परिस्थितीत जीव महत्त्वाचा आहे.

२: संगीता पाटील - पालक

: मुलीने ऑनलाईन वर्गासह, खासगी ऑनलाईन शिकवणी वर्गातून अभ्यास केला. मागील वर्षाचे प्रश्नसंचही सोडविले होते. पुढील शिक्षणाचे नियोजन पण झाले होते. आता अंतर्गत मूल्यमापनने पास केले जाणार आहे. कोरोना असला तरी वेगळे नियोजन करून परीक्षा होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत पण करतो.

३:विनोद माळी : विद्यार्थी - कोरोनाचा संसर्ग पाहता शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्यासारख्या अनेक गरीब मुलांकडे शालेय व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल नाही. आमचा संपूर्ण अभ्यास झाला नव्हता.