शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

दोंडाईचा येथे १ हजार ३१७ दहावीचे विद्यार्थी परीक्षेविना पोहोचणार वरच्या इयत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत ...

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दहावी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील टर्निंग पॉईंट असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंतर्गत मूल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असले तरी ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावयाची असेल त्यांनाही वेगळी संधी दिली जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ढ विद्यार्थीही आटोमॅटिक पास झाला आहे.

दरम्यान, अंतर्गत मूल्यमापन करण्यासंदर्भात गाईडलाईन शिक्षण मंडळ लवकरच जाहीर करणार आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणीही झाली नाही. तत्पूर्वी शासनाने पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यात १२ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोंडाईचात एकंदरीत पहिली ते अकरावीच्या वर्गात १८ हजार ७६२ विद्यार्थी विनापरीक्षा पुढील वर्गात जाणार आहेत. यात १ हजार ५८५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

इंग्रजी माध्यमासह मराठी माध्यमाच्या हुशार विद्यार्थ्यांनी दहावी वर्गाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन शिकवणी व ऑनलाइन वर्ग अटेंड करून फायदा झाला नसून, अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे,असे म्हटले आहे.

१: विरपाल गिरासे- पालक : वाढत्या कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय योग्य आहे. परंतु, मुलगा सलग चार-पाच तास अभ्यास करीत असतानाच त्याच्या अभ्यासाचे मूल्यमापन होणार नाही. तरीही आताच्या परिस्थितीत जीव महत्त्वाचा आहे.

२: संगीता पाटील - पालक

: मुलीने ऑनलाईन वर्गासह, खासगी ऑनलाईन शिकवणी वर्गातून अभ्यास केला. मागील वर्षाचे प्रश्नसंचही सोडविले होते. पुढील शिक्षणाचे नियोजन पण झाले होते. आता अंतर्गत मूल्यमापनने पास केले जाणार आहे. कोरोना असला तरी वेगळे नियोजन करून परीक्षा होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत पण करतो.

३:विनोद माळी : विद्यार्थी - कोरोनाचा संसर्ग पाहता शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्यासारख्या अनेक गरीब मुलांकडे शालेय व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल नाही. आमचा संपूर्ण अभ्यास झाला नव्हता.