शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

दमदार पाऊस होऊनही धरणांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST

जून व जुलै या दोन महिन्यात तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाला होता़ जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे ...

जून व जुलै या दोन महिन्यात तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाला होता़ जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी केली़ सुरुवातीच्या नक्षत्रातील दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या़ त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली़ मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमेजू लागली होती़ पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटू लागली़ शिरपूर तालुक्यातील १ लाख ४ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ९९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे़ ९५़७५ टक्के खरीप पिकांची लागवड झाली आहे़

ॲागस्ट महिन्याच्या सुरवातीलाही तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले़. तशातच १७ रोजी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला, काही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़ दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीदेखील सलग असे ३ दिवस पाऊस झाला़ त्यामुळे कोमजलेली पिकेदेखील टवटवीत दिसू लागलीत़ मात्र पुन्हा २१ ऑगस्टनंतर पावसाने दांडी मारली़ ३० ॲागस्ट रोजी पुन्हा पाऊस झाला़ गेल्या ३ दिवसापासून शहरासह तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे़

१ सप्टेंबर रोजी झालेला पाऊस व कंसात आतापर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर ६० मिमी (४९५), थाळनेर- २७ (३१९), होळनांथे- २१ (२८४), अर्थे- ६० (३६८), जवखेडा-२० (३०६), बोराडी- ५४ (४६४), सांगवी-५७ मिमी (३८१) आतापर्यंत झाला आहे़

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या करवंद धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता १८़२६ दलघमी असताना आतापर्यंत या पावसाळ्यात १२़०१ दलघमी पाण्याचा साठा म्हणजेच ६५़७७ टक्के पाण्याने भरले आहे़ आतापर्यंत ४२५ मिमी पाऊस धरण परिसरात झाला असून गतवर्षी या दिवसाअखेर ७८१ मिमी पाऊस झाला होता़ अनेर धरणाची ४९़२७ दलघमी क्षमता असताना ३३़११ म्हणजेच ६७़२० टक्के पाण्याने भरले आहे़ गतवर्षी या धरण परिसरात ६७० मिमी पाऊस झाला असताना यावर्षी आतापर्यंत केवळ २४० मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ तसेच तालुक्यातील बहुतांशी लघु प्रकल्पातदेखील पाण्याचा ठणठणाट आहे़