शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

शाळा बंदमुळे आवारात झाडेझुडपे वाढले, स्वच्छतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात ...

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या शाळा परिसरांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ॲानलाइन पद्धतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने, गेल्या दीड वर्षापासून स्वच्छता मोहीमच रखडलेली आहे. काही शाळांचा परिसर तेथील शिक्षक स्वच्छ ठेवत असले तरी काही शाळांच्या परिसरात झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येतात.

सध्या शाळेत विद्यार्थी येत नसले तरी शिक्षकांची उपस्थिती असते. येत्या काही महिन्यांत शाळा सुरू झाल्यास, विद्यार्थ्यांना याचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शाळांचा परिसर स्वच्छ होणे गरजेेेचे आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना वर्षभर काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे शाळेत नीटनेटकेपणा ठेवला जातो. वर्गखोल्यांमध्येही विशेष स्वच्छता करण्यात येत असते.

मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे खोल्यांमध्येही जळमटेशिवाय धूळ मोठ्या प्रमाणात झालेली असून, त्यांचीही स्वच्छता होणे गरजेेचे आहे.

जबाबदारी कोणाची?

ग्रामीण भागात गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती असते. तसेच शिक्षक-पालक संघ असतो. या समितीच्या माध्यमातून शाळांची कामे, शाळा सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात असते. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांविनाच शाळा असल्याने, अनेक शाळा अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडलेल्या आहे. अशा स्थितीत शाळा स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

शिक्षकांची उपस्थिती किती

जिल्हा परिषद शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांची उपस्थिती पूर्ण आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील खासगी प्राथमिक शाळाही बंद आहेत. मात्र त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत असतो. त्याचप्रमाणे जि. प. शाळांचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.