शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शाळा बंदमुळे आवारात झाडेझुडपे वाढले, स्वच्छतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात ...

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या शाळा परिसरांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ॲानलाइन पद्धतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने, गेल्या दीड वर्षापासून स्वच्छता मोहीमच रखडलेली आहे. काही शाळांचा परिसर तेथील शिक्षक स्वच्छ ठेवत असले तरी काही शाळांच्या परिसरात झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येतात.

सध्या शाळेत विद्यार्थी येत नसले तरी शिक्षकांची उपस्थिती असते. येत्या काही महिन्यांत शाळा सुरू झाल्यास, विद्यार्थ्यांना याचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शाळांचा परिसर स्वच्छ होणे गरजेेेचे आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना वर्षभर काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे शाळेत नीटनेटकेपणा ठेवला जातो. वर्गखोल्यांमध्येही विशेष स्वच्छता करण्यात येत असते.

मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे खोल्यांमध्येही जळमटेशिवाय धूळ मोठ्या प्रमाणात झालेली असून, त्यांचीही स्वच्छता होणे गरजेेचे आहे.

जबाबदारी कोणाची?

ग्रामीण भागात गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती असते. तसेच शिक्षक-पालक संघ असतो. या समितीच्या माध्यमातून शाळांची कामे, शाळा सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात असते. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांविनाच शाळा असल्याने, अनेक शाळा अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडलेल्या आहे. अशा स्थितीत शाळा स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

शिक्षकांची उपस्थिती किती

जिल्हा परिषद शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांची उपस्थिती पूर्ण आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील खासगी प्राथमिक शाळाही बंद आहेत. मात्र त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत असतो. त्याचप्रमाणे जि. प. शाळांचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.