शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

चोपड्याच्या दोघांचा कावठे शिवारात अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:36 IST

अपघाताची नोंद साक्री पोलीस ठाण्यात

धुळे : साक्री तालुक्यातील कावठे शिवारात फेरेजपूर फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मोरीत फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. यात चोपडा येथील दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली.सुरत येथून नामदेव राजाराम माळी (४०) आणि रितेश कैलास माळी (२३) (दोन्ही रा. तारामतीनगर, चोपडा) हे दोन्ही जीजे ०५- ईडब्ल्यू ६८४७ क्रमांकाच्या दुचाकीने साक्री तालुक्यातील म्हसाळे येथे लग्नासाठी आले होते. दोन दिवस ते अगोदर आल्यामुळे चोपडा येथे जाण्याचे त्यांनी ठरविले. साक्री तालुक्यातील कावठे शिवारात पेरेजपूर फाटाजवळील एका लहान पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्हीही मोरी पुलाच्या खाली फेकले गेले. अपघातातील नामदेव माळी आणि रितेश माळी या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.याप्रकरणी सुनील राजाराम माळी (३५, रा. तारामतीनगर, चोपडा) यांनी साक्री पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पी.एम. बनसोडे घटनेचा तपास करीत आहेत.