शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

कोरोना काळातही लहान बालकांचे ९० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST

धुळे - कोरोना काळातही जिल्ह्यातील ९० टक्के बालकांना यशस्वीपणे लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल ...

धुळे - कोरोना काळातही जिल्ह्यातील ९० टक्के बालकांना यशस्वीपणे लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंतची ही माहिती आहे. मार्चअखेरपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्राप्त करायचे असते. आत्ताच ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून अजून अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत प्राप्त उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण करण्यात यशस्वी होऊ, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी दिली.

बीसीजी, पेंटा, पेंटा २, पेंटा ३, ओरल पोलिओ ०, ओरल पोलिओ १, हिपेटायटीस बी आदी महत्त्वाच्या लसी बालकांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळातही सुरू होते लसीकरण -

जिल्ह्यात कोरोना काळातही लसीकरण सुरू होते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून लहान बालकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण करण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची चांगलीच कसोटी लागली होती. कारण यावेळी बाहेर गावाहून परतणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. त्यांचे सर्वेक्षण करणे व बालकांचे लसीकरण अशी दुहेरी जबाबदारी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने पार पडली.

म्हणून गरजेचे असते लसीकरण -

बालकांना जन्मापासून एक वर्षापर्यंत प्राथमिक लसीकरण करणे गरजेचे असते. त्यामुळे लहान मुलांना होऊ शकणाऱ्या घटसर्प, गोवर, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ या आजारांपासून संरक्षण मिळते. बी.सी.जी. ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून वापरली जाते. जन्माताच किंवा एक - दोन दिवसात ही लस बाळाला दिली जाते. तसेच बालकाच्या जन्मानंतर तीन महिन्यांपर्यंत त्रिगुणी लस दिली जाते. खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसीचा समावेश यात होतो.

महानगरातून आलेल्या बालकांचे लसीकरण -

कोरोनामुळे पुणे, मुंबई व परराज्यात वास्तव्याला असलेले जिल्ह्यातील अनेक कुटुंबे परत गावाकडे आले होते. त्या कुटुंबातील लहान बालकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. या बालकांची नोंदणी आरोग्य विभागाकडे नव्हती मात्र लसीकरण सुरु झाल्यानंतर आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून त्यांना लस देण्यात आली.

आता पुढे काय -

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत उद्दिष्ट प्राप्त करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ९० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकते.

प्रतिक्रिया -

लसीकरणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जिवाणू व विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण महत्वाचे असते. नियमानुसार वेळोवेळी लसीकरण करावे.

- डॉ. तुषार कानडे, बालरोग तज्ज्ञ

लसीकरणाला बालकांचे कवच कुंडल म्हटले आहे. शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातून लस घ्या. मात्र लस टाळू नका. काही शंका असल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. महेश अहिरराव, बालरोग तज्ज्ञ