शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

कोरोना काळातही लहान बालकांचे ९० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST

धुळे - कोरोना काळातही जिल्ह्यातील ९० टक्के बालकांना यशस्वीपणे लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल ...

धुळे - कोरोना काळातही जिल्ह्यातील ९० टक्के बालकांना यशस्वीपणे लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंतची ही माहिती आहे. मार्चअखेरपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्राप्त करायचे असते. आत्ताच ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून अजून अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत प्राप्त उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण करण्यात यशस्वी होऊ, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी दिली.

बीसीजी, पेंटा, पेंटा २, पेंटा ३, ओरल पोलिओ ०, ओरल पोलिओ १, हिपेटायटीस बी आदी महत्त्वाच्या लसी बालकांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळातही सुरू होते लसीकरण -

जिल्ह्यात कोरोना काळातही लसीकरण सुरू होते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून लहान बालकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण करण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची चांगलीच कसोटी लागली होती. कारण यावेळी बाहेर गावाहून परतणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. त्यांचे सर्वेक्षण करणे व बालकांचे लसीकरण अशी दुहेरी जबाबदारी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने पार पडली.

म्हणून गरजेचे असते लसीकरण -

बालकांना जन्मापासून एक वर्षापर्यंत प्राथमिक लसीकरण करणे गरजेचे असते. त्यामुळे लहान मुलांना होऊ शकणाऱ्या घटसर्प, गोवर, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ या आजारांपासून संरक्षण मिळते. बी.सी.जी. ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून वापरली जाते. जन्माताच किंवा एक - दोन दिवसात ही लस बाळाला दिली जाते. तसेच बालकाच्या जन्मानंतर तीन महिन्यांपर्यंत त्रिगुणी लस दिली जाते. खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसीचा समावेश यात होतो.

महानगरातून आलेल्या बालकांचे लसीकरण -

कोरोनामुळे पुणे, मुंबई व परराज्यात वास्तव्याला असलेले जिल्ह्यातील अनेक कुटुंबे परत गावाकडे आले होते. त्या कुटुंबातील लहान बालकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. या बालकांची नोंदणी आरोग्य विभागाकडे नव्हती मात्र लसीकरण सुरु झाल्यानंतर आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून त्यांना लस देण्यात आली.

आता पुढे काय -

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत उद्दिष्ट प्राप्त करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ९० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकते.

प्रतिक्रिया -

लसीकरणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जिवाणू व विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण महत्वाचे असते. नियमानुसार वेळोवेळी लसीकरण करावे.

- डॉ. तुषार कानडे, बालरोग तज्ज्ञ

लसीकरणाला बालकांचे कवच कुंडल म्हटले आहे. शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातून लस घ्या. मात्र लस टाळू नका. काही शंका असल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. महेश अहिरराव, बालरोग तज्ज्ञ