शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यात 9 हजार 542 रेशनकार्ड धारकांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:41 IST

 सुनील साळुंखे शिरपूर : सार्वजनिक धान्य प्रणाली अंतर्गत कुणीही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून कुठल्याही ...

 सुनील साळुंखेशिरपूर : सार्वजनिक धान्य प्रणाली अंतर्गत कुणीही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून कुठल्याही धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रास्त धान्य दुकानांमधील लाभार्थ्यांना आता कुठल्याही दुकानातून आधारकार्ड नोंदणी क्रमांकाच्या सहाय्याने धान्य खरेदी करता येत आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ९ हजार ५४२ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.पूर्वी रास्त दर धान्य दुकानातून धान्य नेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या परिसरातील दुकानातूनच धान्य खरेदी करावे लागत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेरील भागात राहणाऱ्यांना धान्याचा लाभ घेता येत नसे.लाभार्थी आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाकडून पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावातच नव्हे तर अगदी महाराष्ट्र आणि त्याबाहेरील काही राज्यांमध्येही पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेता येत आहे. लॉकडाऊनच्या काळात या सुविधेचा लाभ सर्वाधिक मिळाला आहे.आदिवासी व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदारांकडून रेशन कार्डधारकांना अनेकदा वेठीस धरले जाते. तसेच नियमानुसार धान्य सुध्दा दिले जात नाही. त्यामुळे रेशनकार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात अनेकदा खटके उडतात. यामुळे अनेक रेशनकार्डधारक अर्ज करून दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानात आपले कार्ड जोडून त्या स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्याची उचल करीत असतात.अशा आहेत तक्रारीलॉकडाऊनच्या काळात प्राधान्य तसेच अंत्योदय शिधा पत्रिकाधारकांना शासनाने विशेष बाब म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर या काळात नियमित धान्याबरोबरच मोफत धान्याचा पुरवठा केला. मात्र, या काळात काही दुकानदारांनी काही लाभार्थ्यांना या धान्यापासून वंचित ठेवले. तसेच काही ठिकाणी मृत्यू झालेल्यांच्या नावावरही धान्य दिले.लॉकडाऊन काळात गरीब लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने मोफत धान्य दिले़ मात्र, काही दुकानदारांनी या योजनेत भ्रष्टाचार केला. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने बोटावर मोजण्याएवढ्या दुकानांवर कारवाई केली.