शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 9 हजार 542 रेशनकार्ड धारकांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:41 IST

 सुनील साळुंखे शिरपूर : सार्वजनिक धान्य प्रणाली अंतर्गत कुणीही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून कुठल्याही ...

 सुनील साळुंखेशिरपूर : सार्वजनिक धान्य प्रणाली अंतर्गत कुणीही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून कुठल्याही धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रास्त धान्य दुकानांमधील लाभार्थ्यांना आता कुठल्याही दुकानातून आधारकार्ड नोंदणी क्रमांकाच्या सहाय्याने धान्य खरेदी करता येत आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ९ हजार ५४२ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.पूर्वी रास्त दर धान्य दुकानातून धान्य नेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या परिसरातील दुकानातूनच धान्य खरेदी करावे लागत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेरील भागात राहणाऱ्यांना धान्याचा लाभ घेता येत नसे.लाभार्थी आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाकडून पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावातच नव्हे तर अगदी महाराष्ट्र आणि त्याबाहेरील काही राज्यांमध्येही पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेता येत आहे. लॉकडाऊनच्या काळात या सुविधेचा लाभ सर्वाधिक मिळाला आहे.आदिवासी व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदारांकडून रेशन कार्डधारकांना अनेकदा वेठीस धरले जाते. तसेच नियमानुसार धान्य सुध्दा दिले जात नाही. त्यामुळे रेशनकार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात अनेकदा खटके उडतात. यामुळे अनेक रेशनकार्डधारक अर्ज करून दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानात आपले कार्ड जोडून त्या स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्याची उचल करीत असतात.अशा आहेत तक्रारीलॉकडाऊनच्या काळात प्राधान्य तसेच अंत्योदय शिधा पत्रिकाधारकांना शासनाने विशेष बाब म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर या काळात नियमित धान्याबरोबरच मोफत धान्याचा पुरवठा केला. मात्र, या काळात काही दुकानदारांनी काही लाभार्थ्यांना या धान्यापासून वंचित ठेवले. तसेच काही ठिकाणी मृत्यू झालेल्यांच्या नावावरही धान्य दिले.लॉकडाऊन काळात गरीब लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने मोफत धान्य दिले़ मात्र, काही दुकानदारांनी या योजनेत भ्रष्टाचार केला. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने बोटावर मोजण्याएवढ्या दुकानांवर कारवाई केली.